ट्रकचा टायर फुटल्याने त्याची धडक समोरून येणार्या कंटेनरला बसली होती. या अपघातात कंटेनर चालवत असणार्या ट्रकमालकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने मयत ट्रकमालकाच्या वारसांना तब्बल 1.15 कोटींची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शासनाने कडक निर्बंध घातले आहे. या निर्बंधांच्या अंमलबजावणीची पाहणी आज पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केली.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा संकुलात 78 बेडची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे, त्याची पाहणी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केली.
गोडोली गावाची यात्रा दरवर्षी उत्साहाने साजरी होत असते. मात्र, या वर्षी कोरोना महामारीच्या संकटातून वाचण्यासाठी गर्दी टाळणे महत्वाचे आहे. कोरोनाचा शिरकाव गोडोलीत होवू नये, याची काळजी घेण्यासाठी यंदा गोडोलीची यात्रा रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय गोडोली यात्रा कमिटी आणि शहर पोलीस ठाणे यांच्या बैठकीत झाला. गोडोलीचे देवस्थान भैरवनाथाचे मानकरी नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांनी ही माहिती दिली.
शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीतील मंगळवारपेठ बोगदा येथील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विजय ऊर्फ पिल्या राजू नलवडे वय 30 वर्ष रा. मंगळवार पेठ सातारा वारंवार गुन्हे करण्यात सरसावलेला असल्याने त्यास सातारा जिल्हयातून तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव शाहुपुरी पोलीस ठाणेकडून पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्फत उपविभागीय दंडाधिकारी (प्रांत) सातारा यांचेकडे पाठवण्यात आला होता. प्रस्तावाची सुनावणी पुर्ण होवून मिनाज मुल्ला उपविभागीय दंडाधिकारी यांनी विजय ऊर्फ पिल्या राजू नलवडे यास सातारा जिल्ह्यातून एक वर्षाकरीता तड
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सातारा जिल्ह्यात वळीव पावसाची हजेरी ही सातत्याने पाहायला मिळते. कुठे सोसाट्याच्या वार्यासह तर कोठे गारांचा सडा असेच काहीसे चित्र दिसत आहे.
सालपे, ता. फलटण येथील सालपे घाटात चालकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आतील मालासह ट्रक पळवून नेणारी 11 जणांची टोळी पोलिसांनी जेरबंद केली. स्थानिक गुन्हे शाखा, सातारा पोलिस आणि लोणंद पोलिसांनी संयुक्तरित्या ही कामगिरी यशस्वी करत चोवीस तासात गुन्ह्याचा छडा लावला व सर्व 11 आरोपींना अहमदनगर, सांगली जिल्हयातील वेगवेगळया ठिकाणाहून अटक करुन चोरीस गेलेला संपूर्ण 14.59 लाखांचा मुद्देमालदेखील हस्तगत केला.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने एक प्रेरणादायी आदर्श आज जगासमोर उभा आहे. कॅनडातील ब्रिटिश कोलंबियाने डॉ. आंबेडकरांना ‘समतेचे जागतिक प्रतीक’ असा बहुमान घोषित करून डॉ. आंबेडकरांचा जन्मदिन हा ‘समतादिन’ म्हणून साजरा करण्याचा नुकताच निर्णय केलाय. ही गोष्ट भारतासाठी गौरवपूर्ण असून आज डॉ. आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वानं अवघं जग अचंबित होताना दिसते आहे. अशा या महामानवाचा सातार्याला शैक्षणिक वारसा लाभला आहे. तो जपणं आणि चिरंतन तेवत ठेवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे,’ असे प्रतिपादन साहित्यिक अरुण जाव
‘जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कोणताही रुग्ण बेडपासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्ह्यातील ऑक्सिजन बेडची व व्हेंटिलेटरची संख्या वाढवा,’ अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केल्या.
सातारा येथील पॉवर हाऊसजवळ घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी चार महिन्यापासून फरार असणार्या सराईत गुंडाला शाहूपुरी पोलिसांनी जेरबंद केले आहे.