संपूर्ण राज्यात पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद हा नक्की कोणासाठी? याबाबतच्या चर्चांना आता गल्लोगल्ली ऊत आलाय. नक्की कोणाच्या भल्यासाठी हा बंद पुकारण्यात आला? याचे उत्तर सत्ताधार्यांनी द्यावे, अशी मागणी युवा राज्य फौंडेशन संघटनेचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी केली आहे.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे सगळीकडे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. अशावेळी रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठया प्रमाणावर भासत होती. त्याकाळात ऑक्सिजन अभावी अनेक रुग्ण दगावले.
सातारा जिल्ह्यातील पुनर्वसन कार्यालयात आर्थिक लाभासाठी चुकीचा कारभार होत असल्याचे समोर येत आहे. या कार्यालयातून फलटण तालुक्यातील जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. शासकीय गावठाणातील राखीव प्लॉट खातेदाराला वाटप करून त्यांची लगेच विक्रीही करण्यात आली आहे.
तमाम ओबीसी समाजाच्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांबाबत आज ओबीसी जनमोर्चाच्या वतीने फलटण तहसीलदार यांना शांततेच्या मार्गाने निवेदन देण्यात आले.
लोणंद व खंडाळा एमआयडीसी कंपनीत चोर्या करुन धुडगूस घालणार्या आंतरराज्यीय टोळीस लोणंद पोलिसांनी जेरबंद केले. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
चार दिवसांपूर्वी मायणी येथे सराफाच्या दुकानात घुसून पिस्टलचा धाक दाखवत सोने लुटण्याचा प्रयत्न करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) गजाआड केली. संशयित आरोपी म्हसवड जि.सातारा व सांगली येथील असून त्यातील एकजण सराफ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कुरिअर डिलिव्हरी बॉयची हातचलाखी करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला कराड गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या पाच आरोपींकडून दोन मोटर कार, एक लॅपटॉप, 8 मोबाईल, 14 वेगवेगळी आधार कार्ड, फसवणूकीकरता वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण पाच लाख 26 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लखीमपूर खिरी येथे घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. मात्र तेथील परिस्थिती हाताळण्यास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सक्षम आहेत. मराठवाड्यात पुरात वाहून गेलेली शेती, अतिवृष्टीग्रस्त भागात शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित आहेत. असे अत्यंत गंभीर प्रश्न महाराष्ट्रात आ वासून उभे आहेत महाविकास आघाडीने त्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा टोला भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी लगाविला.
कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील संबंधीत सर्व शासकिय यंत्रणांनी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.
सहकार क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या सातारा जिल्हा मध्य.सह.बँकेस भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बँकेच्या ग्राहकांना थेट मेंबरशिपद्वारे NEFT/RTGS ची सुविधा सुरु करणेस मान्यता दिली असून बँकेच्या कार्यपद्धतीवर पसंतीची मोहोर उमटवली आहे.