जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 82 बाधितांची नोंद झाली असून, एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 20 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
ख्रिसमस व नववर्षाच्या स्वागतासाठी जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले पाचगणी-महाबळेश्वर सज्ज झाले असून, नाताळ सणानिमित्त सलग जोडून सुट्या आल्याने दोन्ही गिरिस्थाने पर्यटकांनी बहरली आहेत. विविध पॉइंट पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यू असल्यामुळे अनेकांनी या गिरिस्थानावर सुट्टीचा आनंद एन्जॉय करण्यावर भर दिला आहे.
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 73 बाधितांची नोंद झाली असून, 107 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 61 बाधितांची नोंद झाली असून, 173 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 67 बाधितांची नोंद झाली असून, एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 108 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त दहिवडी कॉलेज व अक्षय रक्तपेढी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुरकवडी येथे दि.13 डिसेंबर रोजी वाळू उपसा करणार्या गाड्या पकडल्याने तलाठी व वाळूवाले यांच्यात धराधरी झाली होती. याबाबत यंत्रणा जागी झाल्यानंतर मात्र, एका पोलिसाने संशयितांना कारवाईची भीती दाखवत तीस हजारांचा मलिदा हाणत ‘अनमोल’ कामगिरी केल्याची चर्चा वडूज परिसरात सुरू आहे. आता यावर वरिष्ठ नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर किल्ले प्रतापगड परिसरात जिल्हा प्रशासने 144 कलम लागू केल्याने तसेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने यावर्षी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन अत्यंत साधेपणाने कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत शासनाच्या वतीने पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 42 बाधितांची नोंद झाली असून, 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 114 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
‘समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन विकासकाम करण्याचे महाविकास आघाडी शासनाचे धोरण आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील रखडलेल्या कामास गती देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काम करणार्या प्रत्येकाला मान-सन्मानाने वागविले जाईल,’ असे ठोस प्रतिपादन सहकार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.