आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबई येथे 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या कार्यामुळे मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. आज या घटनेस 190 वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या या महत कार्याची आठवण आपणास रहावी म्हणून प्रतिवर्षी 6 जानेवारी रोजी राज्यात ‘दर्पण दिन’ साजरा केला जातो.
हॅपी न्यू ईअर, इंग्रजी नववर्षानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा ! 2022 या नववर्षाचे स्वागत आणि 2021 या वर्षाला निरोप देण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहात. 31 डिसेंबर रोजी त्याचे आगळे वेगळे सेलिब्रेशन देखील ठरलेले असेल, असो. या आनंद सोहळयात नववर्षाचे स्वागत आप्तस्वकीयांबरोबरच करा. हा आनंद आपल्या आठवणीच्या गोड कूपीत जपून ठेवतांना काही अनर्थ होणार नाही याची काळजी घ्या. अगदी असेही म्हणेण की, हॅपी न्यू ईअर साजरा करा पण घरच्या घरी.. कारण कोरोना अजून संपलेला नाही..
पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात असल्यामुळे प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक आणि सर्व कुटुंबीय गुण्यागोविंदाने एकत्र नांदत होते. परंतु सध्या संयुक्त कुटुंब व्यवस्थाच संपल्यामुळे किंवा मोडकळीस आल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. त्यांची काळजी घेणारे कुणीच नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवन जगत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे.
घोषित असलेल्या गावठाणांपासून या गावांच्या सन 2011 च्या लोकसंख्येनुसार बिनशेती व बांधकाम परवानगी देण्याचे धोरण सुरू झाले. त्यापूर्वी कोणत्याही गावच्या महसुली हद्दीत कोठेही बिनशेती परवानगी दिली जात असे. या धोरणामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावच्या गावठाणाची अधिकृतता असणे अत्यंत आवश्यक व महत्वाचे झाले.
सातारची माती ही कसदार आहे. या मातीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इवल्या इवल्या पावलांचे ठसे उमटले आणि याच मातीतून त्यांनी प्रज्ञेच्या, विद्वत्तेच्या वैश्विक नभांगणात उंच भरारी घेतली. ते इतके उंच गेले की त्यांच्या कार्यकर्तृत्वाने अवघ्या जगाचे डोळे दीपले.
बघता बघता दिवाळी आली. घरातील प्रत्येकाच्या मनात मांगल्याचा नंदादीप तेवत ठेवणारी, प्रत्येक घर आणि प्रत्येक घरातलं प्रत्येक झाड आनंदाने नाचायला लावणारी दिवाळी, वर्षभरात किती अडचणी, खडतर प्रसंग आले तरीही दिवाळीच्या चार दिवसात पुन्हा नव्याने जगण्याची उमेद निर्माण करणारी दिवाळी.
‘मताधिकार हा प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर अधिकार आहे’, ‘प्रत्येक मत अमूल्य आहे’, अशा प्रकारची वाक्यं आपण अनेकदा वाचतो. आपण सामान्य परिस्थितीत राहत असू तर कदाचित संविधानाने देऊ केलेल्या या अधिकाराचं मूल्य, आणि या वाक्यांचं सत्त्व आपल्याला जाणवेलच असे नाही. पण ज्यांच्या पुढे रोजच्या जगण्याविषयी अनंत प्रश्न आहेत, अशा समाज घटकांसाठी हा अधिकार मिळवणे किंवा प्राप्त होणे, ही तुम्हा-आम्हांला वाटते तितकी सोपी बाब नसते.
सातारा - सातारारोड ,ता.कोरेगाव येथील यशवंत औद्योगिक वसाहती मध्ये असणाऱ्या गणेश फरसाण कंपनीला आज पहाटे अचानक लाग लागली .हि लागलेली आग इतकी भयानक होती कि संपूर्ण कंपनीच व सर्व साहित्य जळून खाक झाले. याबाबत सविस्तर माहिती अशी कि सातारारोड येथील यशवंत औद्योगिक वसाहती मध्ये नंदकुमार नामदेव कुलकर्णी व विनायक परशुराम गद्रे यांच्या मालकीची गणेश फरसाण कंपनी आहे. या कंपनीत फरसाण ,शेव ,प...
सातारा : तारळे, ता. पाटण येथील एका घरात जिल्हा विशेष शाखेच्या दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकून शौचालय आणि कारमध्ये लपवून ठेवलेल्या 103 किलो वजनाच्या 836 जिलेटीनच्या कांड्या हस्तगत केल्या. याप्रकरणी गोविंदसिंग बालुसिंग राजपुत (यादव) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात भारतीय स्फोटक कायदा अन्वये गोविंदसिंग बाळुसिंग राजपुत (यादव) याच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला आह...
फॅशनचा रंगच बदलून टाकणारी ब्राइट जादूकळसहश्रळसहीींट्राय आऊट करायला तर काहीच हरकत नाही हे मस्त ब्राइट कलर्स.श्रावणी बॅनर्जीआपण कुठले रंग वापरायचे हे पूर्वी स्किन कलरवर ठरत असे. सावळ्या मुली गडद रंगांचे कपडे घालत नसत. गहू वर्णीय सेमी गडद घेत, पण लाल, काळा, सफेद, गुलाबी, हिरवा रंग म्हणजे जणू गोर्या रंगांचीच मक्तेदारी. मात्र आता ही बुरसटलेली विचारसरणी बाजूला ठेवत तरुणाईचीफॅशनन...