‘गेल्या तीन वर्षांत बुधचे लोकनियुक्त सरपंच अभयसिंह राजेघाटगे यांनी कोट्यवधीची विकासकामे केल्यामुळे बुध गाव रोलमॉडेलच्या दिशेने वाटचाल करीत असून, बुधचा लवकरच कायापालट होईल,’ असा विश्वास शिवसेनेचे आ. महेश शिंदे यांनी व्यक्त केला.
मायणी (ता. खटाव) येथील पक्षी आश्रयस्थानाला नुकताच मायणी पक्षी संवर्धनाचा दर्जा मिळाला असून, हे मायणी पक्षी संवर्धन महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. जवळपास 65 हेक्टर क्षेत्र असलेल्या या पक्षी संवर्धन/वनक्षेत्राला गुरुवारी (दि. 1) सकाळी अकरा वाजता शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीवर वन कर्मचारी, मायणीतील युवक व ग्रामस्थांकडून वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने मायणीची वनसंपदा बचावली आहे.
वडगाव ज. स्वा ते रहाटणी रस्त्यालगत असलेले गुरवकीचे माळ या नावाने परिचित असलेल्या शिवारात दोन विद्युत पोल वाकलेले असून, ते पोल केव्हाही ढासळून अनर्थ होण्याची शक्यता दिसून येत आहे. तत्पूर्वीच विद्युत महामंडळाने त्या पोलांची दुरुस्ती करावी, अशी मागणी त्या शिवारातील शेतकर्यांकडून केली जात आहे.
राजकारणात समाजकारणाची आस असणार्र्या लोकांचे कार्य हे शाश्वत विकासाची गंगा निर्माण करणारे असते, असे म्हटल्यास वावगे ठरत नाही आणि असे कार्य हे भावी पिढीसाठी आदर्श निर्माण करते, ही वस्तुस्थिती आहे. अशाच ध्येयवादी धोरणासाठी परिचित असणारे बुधाच्या लोकनियुक्त सरपंचांनी केलेल्या पारेषणमुक्त ग्रामपंचायत या कामाची प्रशंसा आज खटाव तालुक्यात होत आहे.
खटाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या आरोपीस तत्काळ अटक करून प्रकरण दडपणार्या अधिकारी आणि राजकीय पुढार्यावर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी आज जनता क्रांती दलाने केली आहे. याबाबत आज खटाव तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले. तसेच 26 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पुसेगाव येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेश जाधव, उपाध्यक्षपदी बाळासाहेब जाधव तर सचिवपदी मोहनराव जाधव यांची निवड करण्यात आली.
‘वीज वितरण कंपनीकडून सध्या शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांकडून चुकीच्या पद्धतीने वसुली केली जात आहे. कंपनीने ही पिळवणूक तातडीने थांबवावी,’ अशी मागणी भूमाता शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मराज जगदाळे यांनी तहसीलदारांकडे निवेनाद्वारे केली आहे.
भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. वैभव माने, जिल्हा सचिव अनिल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज शहरात महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करण्यात आला. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याची मागणी ही यावेळी करण्यात आली.
गणेशवाडी (ता. खटाव) येथे फळबाग व ऊस शेतीस आग लागून लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे. याप्रकरणी वेगवेगळे दोन गुन्हे नोंद झाले आहेत.
खटाव तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत असून, तालुक्यातील शेतकर्यांना, लोकांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली असल्याने उरमोडीचे पाणी खटाव तालुक्यात सोडावे, अशी मागणी आज नगरसेवक शहाजीराजे गोडसे मित्र मंडळाने केली आहे. याबाबत तहसीलदार किरण जमदाडे यांना लेखी निवेदन दिले आहे.