क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य ऊर्जा व प्रेरणा देणार असून, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. हा महिला शिक्षण दिन संपूर्ण भारतात साजरा व्हावा यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे अन्न अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
भारताच्या सैन्याने स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीत पाकिस्तान सैन्याला धूळ चारून पाकिस्तान पासून बांगलादेश या स्वतंत्रदेशाची निर्मिती केली होती. आज 16 डिसेंबर रोजी या ऐतिहासिक घटनेला एकोणपन्नास वर्षे पूर्ण होऊन पन्नासावे वर्षे लागत आहे. याच घटनेचे औत्सुक्य साधून लोणंद येथील श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या 41 सदस्यांनी तारकर्ली-मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने समुद्रामध्ये सुमारे 321 फूट तिरंगा ध्वज फडकावून भारतीय सैन्याच्या शौर्याला आगळावेगळा सलाम करून समुद्रामध्ये विजय दि
लोणंद येथील लोणंद रनर्स ग्रुप व भैरवनाथ डोंगर ग्रुपचे सदस्य राजेंद्र शेळके व संतोष कोकरे यांनी आळंदी ते पंढरपूर 246 किमी अंतर फक्त 40 तास 29 मिनिटांत पूर्ण करून ‘इंडिया रेकॉर्ड बुक’मध्ये नाव नोंदण्यास पात्र ठरले आहे. त्यांच्या या कामगिरीचे सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांकडून कौतुक करण्यात येत आहे.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील विक्रम मोहिते यांची आ.रोहितदादा पवार विचारमंचच्या खंडाळा तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
खंडाळा : शिरवळ येथील जिल्हा चेक नाक्यावरील सारोळा पुलावरुन पडून युवक बेपत्ता झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शिरवळ पोलिस व महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्याकडून नदीमध्ये शोधकार्य सुरु आहे. दशरथ सिंग अमरसिंग सिंग (वय 18, राजस्थान) असे पाण्यात पडलेल्या बेपत्ता तरुणाचे नाव आहे.