जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 66 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा मृत्यू झाला तर 85 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
‘सातारा जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना 2021-2022 मूळ 264 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यात 110.50 कोटी वाढ करून 375 कोटी रुपयांच्या निधीच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती देऊन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून सातारा शहरात सैनिक स्कूल सुरू झाले आहे. या सैनिक स्कूलचा राज्यासह देशात नावलौकिक वाढावा यासाठी येथील इमारती व इतर कामांसाठी वेगळ्या निधीची तरदूत अर्थ संकल्पात करण्यात येईल,’ अशी ग्वाहीही वित्त व नियोजन तथा उपमुख्यमंत्री अजित पवा
तालुक्यातील विविध क्षेत्रांतील वजनदार व धनिकांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग करणार्या ‘हनी ट्रॅप’ टोळीची फलटण तालुक्यामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू असून, पोलीस विभागही यापुढे अशा टोळ्यांवर कारवाई करण्याच्या मनस्थितीत असून गोपनीय पद्धतीने सर्व प्रकारची माहिती घेण्यासही सुरुवात झाली आहे. पुढील काळात निश्चितच या प्रकारच्या टोळ्यांवर कारवाई होणार आहेत.
महाबळेश्वर-पाचगणी राज्यमार्गावरील भिलार वॉटर फॉल नजीकच्या डोंगररांगेमध्ये शुक्रवारी सकाळी वणवा लागला. वार्याचा वेग अधिक असल्याने ही आग वेगाने पसरत गेली.
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 86 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा मृत्यू झाला तर 47 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
येथील पिंप्रद येथे जमिनीमध्ये झोपडी टाकल्याचा राग मनात धरून झोपडी पेटवून दिल्याने या झोपडीत झोपलेल्या महिलेचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘स्पर्धेच्या युगात युवकांनी मैदानी खेळाची जोपासना करत आपले करिअर घडवावे,’ असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी केले.
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 92 बाधितांची नोंद झाली असून, 62 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
येथील बसस्थानकामध्ये शेजारीशेजारी उभ्या असलेल्या शिवशाहीच्या एका बसला अचानक आग लागली. त्यानंतर ही आग पेटत जावून पाचही गाड्यांनी पेट घेतला. काही वेळातच धडाडून पेटलेल्या पाचही गाड्या जळून खाक झाल्या असून कोट्यवधी रुपयांचा नुकसान झाले आहे. सुदैवाने काही जीवित हानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस चौकशी करत आहेत. या आगीमुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 60 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 105 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.