खटाव तालुक्यामध्ये वाळू उपशाने तसेच गौण खनिज उत्खननमुळे नदीपात्र व पुलाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने तहसीलदार किरण जमदाडे यांनी कारवाईचे आदेश देताच आज गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणारी तीन वाहने तहसीलदार जमदाडे यांच्या पथकाने पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
खटाव तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या निढळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बायडाबाई संतोष ठोंबरे तर उपसरपंचपदी श्रीकांत बबन खुस्पे यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीनंतर श्री सिद्धिविनायक ग्रामविकास पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.
अखिल सातारा प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा कोंडवे (सातारा) येथे पार पडली. या सभेत जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्यांच्या उपस्थितीत नूतन जिल्हाध्यक्षपदी संजीवन रामचंद्र जगदाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
येथील दि वाई अर्बन बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी यांना सहकार क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल नुकतेच नवी दिल्ली येथील प्रमोटिंग अॅचिव्हमेंट फाउंडेशनचा भारत निर्माण पुरस्कार मिळाला आहे. स्टर्लिंग मेरीट एक्सलंट परफॉरमन्स अॅड आऊटस्टॅडिंग कॉन्ट्रीब्युशन इन द फिल्ड ऑप को. ऑपरेटिव्ह बँक डेव्हलपमेंट या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे, माजी अध्यक्ष व वाई अर्बन परिवाराचे प्रमुख अरूण देव यांच्या हस्ते चावलानी यांचा सत्कार
यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुका मोठ्या चुरशीने पार पडल्या. यात अनेक युवा वर्गाची राजकारणात झालेली एन्ट्री गावच्या विकासाला पारंपरिक चाकोरीमधून आधुनिक विकासाच्या परिवर्तनाकडे नेणारी ठरणार आहे. याप्रमाणेच अनफळे (ता. खटाव) या दुर्लक्षित असणार्या छोट्याशा गावाच्या विकासासाठी गावातील सुपुत्र स्वप्नील कांबळे यांनी पत्रकारितेच्या प्रवाहातून थेट निवडणुकीत बिनविरोध होत राजकारणात एन्ट्री केली आहे.
दोन कथित ’देवऋषी’च्या भूत लागल्याच्या सल्ल्याला भुलून पालकांनी योग्य वैद्यकीय उपचार न केल्यामुळे चौदा वर्षीय मुलीचा हकनाक बळी गेल्याची बातमी आज प्रसिध्द झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती.
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 176 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 136 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा राज्य यांच्यावतीने कोव्हिड -19 लसीकरण तसेच आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर बहुमाध्यम चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. शुक्रवार दि. 26 फेब्रुवारी 2021 रोजी सातारा जिल्ह्यात बहुमाध्यम जनजागृती अभियानाची सुरुवात येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या समोर करण्यात आली.
गेली दोन महिन्यांपासून शहरातील स्वामी विवेकांनद नगर, अनंत मंगल कार्यालय, महाराजा मंगल कार्यालय या भागात मोपेड मोटार सायकलवरून जाणार्या महिला व मुलीच्या हातातील पर्स, अथवा गाडीचे बास्केट, हॅण्डेलला लावलेली पर्स उचलून व जबरदस्तीने हिसकावून जाणार्या एका आरोपीस व त्याकडून मुद्देमाल विकत घेणार्या तीन जणांना अटक करून नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात शहर पोलिसांना यश मिळाले आहे.
‘पुणे-सातारा महामार्गावर वेळे खंबाटकी घाट पायथ्याला उभा असलेला छत्रपती शिवरायांच्या पन्नास फुटी अश्वारूढ पुतळ्याला व सातारा राजधानी सेल्फी पॉइंटला कोण हात लावेल, त्याची माझ्याशी गाठ आहे. पुतळ्याला स्पर्श केला तरी त्याला किंमत मोजावी लागेल. खबरदार स्वतः मी अश्वारुढ पुतळ्याच्या तिथे उभा राहतो, बघूया कोणाची हिंमत आहे त्या पुतळ्याच्या जवळ यायची,’ असा इशारा छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खा. उदयनराजे भोसले यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अतिक्रमण विभागाला दिला.