पुणे जिल्ह्यातील एका आमदाराला युवतीच्या साह्याने हनी ट्रॅपमध्ये अडकवून पैसे उकळण्याचा कट तिघा युवकांनी रचला होता. परंतु, संबंधित युवतीनेच आमदारांच्या पुतण्याला याची माहिती दिल्याने कट उघडकीस आला.
‘कोरोनामुळे अर्थव्यवस्था अडचणीत असताना सहकार क्षेत्रातील अग्रेसर असणारी शिवशक्ती सहकारी पतसंस्था लि., शिवथरने सन 2020-2021 या आर्थिक वर्षात चांगली कामगिरी केली आहे. विविध अडचणीवर मात करत शिवशक्ती पतसंस्थेने आपला प्रगतीचा आलेख उंचावत ठेवून संस्थेची परंपरा कायम राखली आहे. सन 2020-2021 या आर्थिक वर्षात संस्थेत ढोबळ नफा 2 कोटी 4 लाख झाला असून निव्वळ नफा 1 कोटी 18 लाख झाला आहे,’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रभाकर साबळे यांनी दिली.
जिल्ह्यात संचारबंदी कडक केली असली तरी काहीजणांना अत्यावश्यक, वैद्यकीय, अंत्यसंस्कार कार्यक्रम अशा कारणांसाठी आंतरजिल्हा किंवा शहरांतर्गत प्रवास करावा लागतो. त्यांना परवानगी देण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून ऑनलाईन ई-पास देण्यात येणार आहेत. त्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात कोवीड ई-पास कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती पोनि विजय कुंभार यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने कोरोना बाधित रुग्णांना उपचार मिळणे अवघड झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल्सला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाला पाहिजे, याची काळजी जिल्हा प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी वजा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील सर्व भाजीमंडई आणि रस्ते शनिवारपासून बंद करण्यात येणार आहेत. सध्या संचारबंदीची योग्य अंमलबजावणी होत असूनही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने नियम आणखी आवळण्याचा निर्णय पोलीस प्रशासन आणि सातारा नगरपालिकेकडून घेण्यात आला आहे.
कारी (ता. सातारा) येथील विलास जगन्नाथ भातुसे (वय 45) यांच्या घराला सुमारे 2.30 ते 3च्या दरम्यान अचानक आग लागल्याने संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी आले. घरातील दस्तऐवजासह गहू, ज्वारी, हरभरा यांसह जवळपास 100 कोंबड्या आगीत जळून खाक झाल्या. सदर घटनेत विलास भातुसे यांच्या पायाला भाजले असता अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
‘वनांना वारंवार लागणारी आग (वणवे) रोखण्यासाठी विविध ठिकाणी जाळ रेषा निर्मिती करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वनांचे किती महत्त्व आहे, हे समाजाला वनविभागाने पटवून देऊन वारंवार लागणारे वणवे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात,’ अशा सूचना पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे देशभरात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोरोनाग्रस्त सहायता समिती, टास्क फोर्स बनवण्यात आला आहे.
‘मेढा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून देण्याबरोबरच या नगरीचे सर्वप्रकारचे प्रश्न ज्या-त्या वेळी सोडवले आहेत. सातारा-महाबळेश्वर रस्त्यावरील प्रमुख शहर असलेल्या मेढा नगरीचा कायापालट करण्यासाठी यापुढेही प्रयत्न करणार असून, या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेमुळे संपूर्ण देशात हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मृत्यूच्या प्रमाणातही चिंताजनक वाढ झाली आहे. जम्बो कोविड केअर सेंटर, सातारा जिल्हा रुग्णालयासह सर्वच खासगी रुग्णालयांमध्येही बेड शिल्लक नसल्याने रुग्ण दगावत आहेत. या भयावह परिस्थितीला कुठेतरी आळा बसावा, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उदात्त हेतूने आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटुंबीयांनी पुष्कर मंग