जिल्ह्यात 22 लाख 79 हजार 500 नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. मात्र, आजमितीस जिल्ह्यात पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 31 लाख 17 हजार 885 एवढे लसीकरण झाले असून ते उद्दिष्टपैकी 88 टक्के एवढे झालेले आहे. यामध्ये सातारा प्रथम, कराड द्वितीय व फलटण तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे यांनी मिळवलेला हा विजय महत्वपूर्ण आहे. त्यामुळं त्यांचा सत्कार करण्यासाठी आज इथं आलो होतो. आगामी नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, अशी भावना आहे. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे मतही विचारात घेतलं जाईल.
जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी ने आघाडी धर्म सोयीस्कर पणे पाळला मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना जिल्हा पातळीवर स्वबळावर च लढणार आहे. येथील स्थानिक समीकरणे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आहेत. राष्ट्रवादीने जर येथे आघाडी धर्म पाळला नाही तर आम्हालाही सर्व पर्याय खुले आहेत असा स्पष्ट इशारा शिवसेनेचे आमदार तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
केंद्र सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आज संसदेत तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. परंतु, फक्त कायदे मागे घेऊन चालणार नाही. तर धोरणे बदलाने गरजेचे असून जोपर्यत केंद्र सरकार आपले धोरण बदलत नाही; तोपर्यत हे सरकार शेतकऱ्यांचे आहे की नाही, यावर प्रश्नचिन्ह राहणार असल्याचे मत शालेय शिक्षण राज्यमंत्री आ. बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
एखाद्या गावाचा विकास करावा याचा आदर्श राज्याला घालून दिलेले ग्रामविकासाचे प्रणेते व हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद, मुंबई, सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटिज पुणे व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने पवार यांचा सत्कार सोहळा मंगळवार दि. 30 रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.
चांदनी चौक ते मंगळवार तळे रस्त्याच्या खडीकरणाचे काम ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे रेंगाळले आहे . नगरसेवकांकडून पाठपुरावा होऊनही केवळ कामाच्या सबबी दिल्या जात असल्याने सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होऊ लागली आहे .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने संपूर्ण राज्याकरिता नव्याने सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून त्यानुसार सातारा जिल्ह्याकरिता जिल्हा प्रशासनातर्फे नव्याने आदेश पारित केले आहेत ते आदेश 30 नोव्हेंबर रोजीच्या 00.00 वाजल्या पासून ते पुढील आदेश होईपर्यंत लागू राहतील.
१९७१ बांगला मुक्ती संग्रामातील जवानांसाठी व शहिद जवानांच्या स्मरणार्थ जयहिंद फौंडेशनच्या वतीने संपूर्ण देशभर शौर्याजंली यात्रा सुरू करण्यात आली आहे. या शौर्ययात्रेचे कराड शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी उद्यानात जंगी स्वागत करण्यात आले.
तडीपारीचा आदेश डावलून ओगलेवाडी परिसरात आलेल्या एका संशयितास कराड शहर पोलिसांनी अटक केली. पोलीस अधीक्षक यांच्याकडून कराड शहर पोलीस ठाणे अंतर्गत ओगलेवाडी दुरक्षेत्र हद्दीतील रेकॉर्डवरील ११ संशयीतांच्या टोळीला 6 महिन्याकरता तडीपार करण्यात आले होते. मात्र, तडीपारीचा आदेश डावलून ओगलेवाडी परिसरात आल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. सागर सुभाष सुर्यवंशी (वय २५) रा. हजारमाची ता. कराड असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
ओगलेवाडी, ता. कराड येथील चौकात तीन ऊसतोडणी मजूरांमध्ये किरकोळ कारणावरुन आपसात हाणामारी झाली. शनिवारी २७ रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.