संपूर्ण देशात व महाराष्ट्रात वाढत्या रुग्णसंख्येवर वेळेत नियंत्रण मिळावे आणि कोरोनाची साखळी लवकरात लवकर खंडित व्हावी, यासाठी म्हासुर्णे कोरोना दक्षता कमिटी व म्हासुर्णे पोलीस पाटील संभाजी माने यांनी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. त्यास गावातील नागरिक आणि व्यापार्यांनी पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे बाजारपेठेसह सर्व रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.
‘कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी लोकांनी स्वत:ला शिस्त लावून घेतल्यास या संकटावर मात करणे अवघड नाही. ग्रामस्तरावर लोकांनी स्वत:हून पुढाकार घेतल्यास संसर्गाची चेन ब्रेक होण्यास मदत होईल. परंतु, हे काम करत असताना कोणी गावचे राजकारण पुढे आणू नका, असे करणार्याला पाप लागेल,’ असे मत खटावचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी व्यक्त केले.
मांडवे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सागर चंदनशिवे यांची बिनविरोध निवड झाल्याने अखेर गावास गावकारभारी मिळाला.
उपविभागीय अधिकारी माण-खटाव यांच्या आदेशान्वये वडूज शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर वडूज नगरपंचायत व प्रशासकीय अधिकार्यांनी शहरामध्ये शुक्रवार, दि. 23 ते 30 एप्रिलअखेर ‘जनता कर्फ्यू’ जाहीर करण्यात आला असून, याबाबतचा निर्णय हुतात्मा स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला.
‘गेल्यावर्षी आपण सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाला हरवलं होत. त्यावेळी हा अनुभव पूर्णपणे नवा होता. अनपेक्षित शत्रूशी दोन हात करत असताना शासकीय यंत्रणा आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोनाला हद्दपार करण्यात यश मिळाले होते. आपल्यावर पुन्हा एकदा तीच वेळ आली असून स्थानिक प्रशासन, नागरिकांनी कोरोनाबद्दल संवेदनशील राहून कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे,’ असे मत आ. महेश शिंदे यांनी व्यक्त केले.
येथील ग्रामीण रुग्णालयातील अपुर्या कर्मचारी वर्गाचा फटका आता कोरोना संसर्ग परिस्थितीमध्ये चांगलाच बसू लागला आहे. कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित मृतदेह उचलण्यासाठी कर्मचारीच नसल्याने याठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकार्यांनाच अन्य कर्मचार्याला सोबत घेऊन कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह उचलावे लागत आहेत.
‘खटाव तालुक्यात दररोज सरासरी किती नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत. सद्य:स्थितीतील उपाययोजना, उपलब्ध साधन सामग्री याचा आरोग्य विभाग व प्रशासनाने रोजच्या रोज आढावा घ्यावा. तसेच रुग्ण व नातेवाइकांची इतर ठिकाणी होणारी धावपळ कमी करण्याचा प्रयत्न करावा,’ असे आवाहन आ. शशिकांत शिंदे यांनी केले.
शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने निढळमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत कृती समितीने बुधवार, दि. 21 रात्री 8 वाजल्यापासून 30 एप्रिलपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने पुसेगावात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सध्या गावात बाजारपेठेतील काही व्यापार्यांसह तब्बल 51 जण अॅक्टिव्ह रुग्ण असल्याने बुधवार, दि. 21 पासून सोमवारपर्यंत सहा दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय पोलीस, ग्रामपंचायत, व्यापारी आणि दक्षता समितीने घेतला.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून यात खटाव तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. सध्या गावोगावी विविध उपाययोजना करून देखील रुग्ण आटोक्यात येण्याचे प्रमाण कमी होत नसल्याने खटाव तालुका कोरोनाचा हॉट स्पाट बनतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यत: भोसरे, खटाव, वडूज, पुसेगाव, औंध आदी गावांत कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून कोरोना थोपवण्यास पुढाकार घेतला पाहिजे.