कराड तालुक्यातील माळवाडी (मसूर) येथील विश्वकर्मा दादासाहेब चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च येथील प्रभारी संचालक व प्राध्यापिका अपर्णा सावंत (रा. बेलदरे) यांनी भारती विद्यापीठाची व्यवस्थापन विषयातील पीएचडी पदवी संपादन केली आहे.
सातारा : कराड तालुक्यातील माळवाडी (मसूर) येथील विश्वकर्मा दादासाहेब चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च येथील प्रभारी संचालक व प्राध्यापिका अपर्णा सावंत (रा. बेलदरे) यांनी भारती विद्यापीठाची व्यवस्थापन विषयातील पीएचडी पदवी संपादन केली आहे.
'बँकिंगच्या पारंपारिक आणि पर्यायी चॅनेलच्या संदर्भात ग्राहकांच्या समाधानावरील अभ्यास' हा त्यांच्या पीएचडी साठीच्या प्रबंधाचा विषय होता. त्यांना डॉ. प्रल्हाद मुदलकर यांचे मार्गदर्शन लाभले. पीएचडी पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


