सातार येथील खेळाडू स्नेहांजली राजेंद्र ननावरे यांची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट (प्रथम श्रेणी) पदासाठी निवड झाली आहे. प्रशिक्षणासाठी त्या एझीम (केरळ) येथील नौदल अॅकॅडमीमध्ये जाणार आहे. सामान्य कुटुंबातील स्नेहांजलीने आई- वडिलांची क्रीडा परंपरा पुढे चालू ठेवत भारतीय सैन्यदलात उच्चपदावर जाण्याचे स्वप्न आज पूर्ण केले.
सैदापूर येथे राहणारे आणि सैन्य दलातून निवृत्त झालेले लष्करी अधिकारी २0१९ मध्ये मुंबइला गेले होते. त्यावेळी त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी परवाना असलेले पिस्टल, सोन्याचा राणीहार, लक्ष्मीहार असा सुमारे ३.२१ लाखांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यत तक्रार दाखल झाल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला होता.
वाई तालुक्यातील आसले येथील एकाने भावकीतील एकाचा खून केल्याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुरुदत्त वाघ (वय ४२) असे शिक्षा झालेल्याचे नाव असून त्याची सुनावणी पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांच्या न्यायालयात सुरु होती.
सातारा तालुक्यातील शिवथर येथे सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात एक महिला जखमी झाली आहे. मनिषा साबळे (वय ३३) असे जखमी महिलेचे नाव असून चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
खेड ग्रामपंचायतीचे प्रशासक दळवी यांचे नियंत्रणाखाली ग्रामसेवक शंकर माने यांनी खेड ग्रामपंचायतीचे नगरपंचायती मध्ये वर्गीकरण कारणेबाबतचा ठराव एकतर्फी घेतला असून खेड ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे अठरा हजाराच्या आसपास असताना राजकिय दबावापोटी अवघे शंभर नागरिकांना घेऊन सभा पार पाडण्यात आली.
कामावर येऊ इच्छिणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना अडवू नका अन्यथा गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सातारा बस स्थानकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला.
जिल्ह्यात 22 लाख 79 हजार 500 नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. मात्र, आजमितीस जिल्ह्यात पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 31 लाख 17 हजार 885 एवढे लसीकरण झाले असून ते उद्दिष्टपैकी 88 टक्के एवढे झालेले आहे. यामध्ये सातारा प्रथम, कराड द्वितीय व फलटण तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे यांनी मिळवलेला हा विजय महत्वपूर्ण आहे. त्यामुळं त्यांचा सत्कार करण्यासाठी आज इथं आलो होतो. आगामी नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, अशी भावना आहे. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे मतही विचारात घेतलं जाईल.
जिल्हा बॅकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी ने आघाडी धर्म सोयीस्कर पणे पाळला मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना जिल्हा पातळीवर स्वबळावर च लढणार आहे. येथील स्थानिक समीकरणे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आहेत. राष्ट्रवादीने जर येथे आघाडी धर्म पाळला नाही तर आम्हालाही सर्व पर्याय खुले आहेत असा स्पष्ट इशारा शिवसेनेचे आमदार तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
केंद्र सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आज संसदेत तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. परंतु, फक्त कायदे मागे घेऊन चालणार नाही. तर धोरणे बदलाने गरजेचे असून जोपर्यत केंद्र सरकार आपले धोरण बदलत नाही; तोपर्यत हे सरकार शेतकऱ्यांचे आहे की नाही, यावर प्रश्नचिन्ह राहणार असल्याचे मत शालेय शिक्षण राज्यमंत्री आ. बच्चू कडू यांनी व्यक्त केले.