रायगड पावसाचे अपडेट : रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट असल्यामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमार आणि नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सातारा जिल्ह्यामध्ये बुधवारी वाई, खंडाळा, भुईंज तसेच सातारा तालुक्यातील लिंब, नागठाणे, खिंडवाडी येथे महामार्ग परिसरात सुमारे अर्धा ते पाऊण तास जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे सातारकरांची मात्र चांगलीच पळापळ झाली.
लागवडी पासून पाऊस आणि ढगाळ वातावराणामुळे खटाव तालुक्यातील झेंडू उत्पादक शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. सुर्यप्रकाशाअभावी बागा फुलल्या नसल्याने उत्पन्नात मोठी घट होणार असल्याने उत्पादन खर्चही निघेल की नाही, या चिंतेने शेतकरीवर्ग ग्रासला असून बुधच्या काही भागात पाऊस व वार्यामुळे अनेक झेंडूचे फड झोपले असून झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
सायंकाळी मुसळधार पावसाने सातारा शहर परिसराला झोडपून काढल्यामुळे तब्बल तासभर जनजीवन ठप्प झाले होते. धो धो पाऊस पडल्यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच पळापळ झाली. दुसरीकडे रस्त्यावर बसलेल्या साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे फार मोठे नुकसान झाले.
सातारा शहराला सलग दुसर्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले. गुरुवारी दुपारनंतर वातावरणात मोठा बदल होत संपूर्ण परिसर अंधारून गेला. ढगांनी दाटी केल्यानंतर चार वाजल्यापासून या पावसाला जोरदार सुरुवात झाली.
शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करु नये, योग्य प्रमाणात पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.
ढगाळ वातावरण, बोचरी हवा आणि पावसाच्या रिपरिप सरी अशा विचित्र वातावरणाचा अनुभव सातारकर घेत आहेत. बुधवारी सकाळपासून जोरदार पावसाने सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागाला झोडपले. अचानक आलेल्या पावसाने सातारकरांच्या कामाचा खोळंबा तर झालाच, शिवाय प्रकृतीच्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे.
खटाव तालुक्यातील पुसेगावसह कटगुण, निढळ व इतर गावांत मंगळवारी (दि. 27) वादळी वार्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. उन्हाळ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे थोडा का असेना गारवा मिळाला.
कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन परिसरात आज दुपारी दोनच्या सुमारास अवकाळी पावसाची हजेरी लावत अक्षरशः गारांचा पाऊस झाला आहे. रस्त्यावर आणि शेतात बर्फाचा खच साठला होता. मात्र, गारपिटीमुळे कांदा उत्पादक, कलिंगड व द्राक्षबागांबरोबर इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मोळ (ता. खटाव) व डिस्कळ, पसूचामळा या ठिकाणी बुधवारी दुपारी जोरदार गारांचा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गुरुवारी दिवसभर खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोळ-डिस्कळ परिसरात सोसाट्याचा वार्यासह गारांचा पाऊस झाला. पुसेगाव निढळ परिसरात दिवसभर वादळी वातावरण होते. त्यामुळे शेतकर्यांची त्रेधातिरपीट उडाली. सध्या शेतामध्ये ज्वारी, गहू काढायला आला आहे. त्याचे मोठे नुकसान या पावसामुळे झाले आहे. आंब्याच्या मोहोर गळून पडला आहे. छोटे-छोटे झाडाला लागलेले आंबे गळून पडल्यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकर्यांची घेवडा काढणीची लगबग सुरू असताना, काल कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात आसनगाव, अनपटवाडी, राऊतवाडी, शहापूर व परिसरात तब्बल अडीच तास ढगफुटी सारखा वळवाचा पाऊस पडल्याने उत्तर भागातील पिकांचे आणि शेताचे मोठे नुकसान झाले आहे.
खानापूर तालुक्यात गेली दोन तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी , कमळापूर (ता.खानापूर ) येथील येथील रामापूर - कमळापूर या दोन गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे.