यावर्षी शोभन नाम संवत्सर सुरू झाले. यानिमित्त सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने घराच्या पुढे बांबूच्या मोठ्या गुढ्या उभारून या नववर्षाचे स्वागत केले.
वाई शहरातील घरफोडीची उकल करण्यात वाई पोलिसांना यश आले असून या घरफोडीतील तीन जण ताब्यात घेण्यात आले आहेत.
वाई, ता. वाई येथील धोम कॉलनीत घरफोडी करून स्टीलचे नळ, गॅसचे दोन बर्नर असा २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
वाई, ता. वाई येथे तीन घरफोडी करणाऱ्या संशयिताला सहा तासात वाई पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून २ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून शेखर उर्फ चिंग्या अशोक घाडगे, वय ३३ रा. सोनजाई नगर वाईन असे त्याचे नाव आहे.
वाई, ता. वाई येथे दुचाकी जाळून चारचाकी वाहनांची तोडफोड करणाऱ्या चार जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात वाई पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले. विजय मच्छिंद्र धोत्रे, वय २१, समीर पठाण, वय १९ दोघेही रा. सिद्धनाथवाडी, ता. वाई अशी दोघांची नावे असून दोन अल्पवयीन मुलांचा त्यामध्ये समावेश आहे.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोवईनाका परिसरातील एका लॅब समोरून कॉलेज वरून घरी निघालेल्या युवतीचे काही बुरखाधारी व्यक्तींकडून अपहरणाचा प्रयत्न अश्या आशयाच्या ब्रेकिंग न्यूज समाज माध्यमांवर धडकल्या.
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
धोम कॉलनी येथे बंगल्याचे रंगकाम करत असताना शिडीवरून पाय घसरून पडल्याने प्रकाश नारायण दुर्गावळे (रा कुसगाव) यांचा मृत्यू झाला.
राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात परखंदी (ता वाई) हायस्कूलचा विद्यार्थी यश ज्ञानेश्वर शिंदे व मार्गदर्शक विज्ञान शिक्षक तथा मुख्याध्यापक प्रसाद यादव यांनी तयार केलेल्या मल्टीपर्पज केटरिंग मशीन या उपकरणाला राष्ट्रीय सुवर्णपदक मिळाले आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्राचा प्रथमच गौरव झाला आहे
मागील आठवड्यात भरतगाव (ता सातारा) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दोन महिला शिक्षिकांमध्ये मारामारी झाली होती. दोन्ही महिला शिक्षकांनी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीही दाखल केल्या आहेत. या दोन्ही शिक्षिकांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी निलंबन केले आहे.
वाई शहरातील लोकमान्य टिळक ग्रंथालयाच्या समोर लावलेली दुचाकी दि. 2 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता दुचाकी चोरटय़ाने चोरुन नेली. हा दुचाकी चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आला. परंतु तब्बल 12 दिवस तो चोरटा पोलिसांना सापडला नाही. अखेर दुचाकी मालकाने अज्ञात चोरटय़ाविरुद्ध वाई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील वाई पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने महाबळेश्वरातून चोरीला गेलेल्या पाच हिरो होंडा स्प्लेंडर व एक बुलेट अशा सहा दुचाक्या जप्त केल्या असून दोघांना अटक केली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या या कारवाईचे जिल्हा पोलीस प्रमुख अजय बन्सल यांनी कौतुक केले आहे.
वाई ते सातारा जाणाऱ्या एसटी बस आणि गॅसचा ट्रक यांच्यामध्ये दुपारी बावधन ओढ्यानजिक अपघात झाला. या अपघातात १८ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
वाई तालुक्यातील लोहारे पिंपळाचा मळा येथे विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
वाई-पाचगणी दरम्यान असणाऱ्या पसरणी घाटात कारमधून प्रवास करणाऱ्या जावली तालुक्यातील बहीण-भावंडांना दुचाकी आडवी मारून त्यांच्याकडून भर रस्त्यात गळ्यातील चैन, रोख रक्कम असा दोन लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. याप्रकरणी पाचगणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवासात संतुलन बिघाडल्यानं परदेशी महिलेनं बसमधून पुढं जाण्यास नकार देत गोंधळ घातला. ती पलायन करीत असताना महामार्गावरील धावत्या वाहनाला धडकल्यानं जखमी झालेल्या महिलेवर भुईंज पोलिसांनी उपचार करुन तिला न्यायालयाच्या आदेशानं येरवडातील मनोरुग्ण रुग्णालयात दाखल केलं. नाबूनजीओ लाँय बीरुनगी (वय 40) रिपब्लिक ऑफ युगांडा असं तिचं नाव आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील मूळ गावी दरे तांब (ता. महाबळेश्वर) येथे वाई पोलीस उपअधीक्षक कार्यालयाकडून नियमित पोलीस बंदोबस्त असल्याचे उपअधीक्षक डॉ शीतल जानवे-खराडे यांनी सांगितले.
नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटात सामील झालेल्या बंडखोरांच्या विरोधात साताऱ्यात पोवई नाक्यावर शनिवारी शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांनी जोरदार निदर्शने केली. 'शिवसेनेत गद्दारांना थारा नाही, बंडखोर आमदारांचा निषेध असो' अशी घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या बंगल्याकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.
पोवई नाक्यावरील जिल्हा रुग्णालय मार्गावर सेंट पॉल शाळेच्या परिसरात 37 वर्षीय इसमाला एका अज्ञात युवकाने लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांच्याकडील पंधराशे रुपये रोख रक्कम आणि त्याचे एअरटेल कंपनीचे सिम कार्ड चोरुन नेल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार दिनांक 10 जून रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान घडला आहे.
बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल बाळगल्याने पसरणी, ता. वाई येथील एका व वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मॅप्रो फूड स कंपनीत ४१ लाख रुपये किंमतीच्या डाय व यांत्रिक मोटारी चोरणाऱ्या वाई शहरातील दोघांना वाई पोलिसांनी शहर परिसरातून अटक केली. गौरव गुळुंबकर व जय घाडगे अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांनी चोरलेला मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
वाई तालुक्यातून दोन युवती बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या ‘किसनवीर’ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निकालात आ. मकरंद पाटील यांच्या शेतकरी बचाव पॅनेलने मुसंडी मारली असुन सर्वच्या सर्व 21 जागांवर तब्ब्ल तीन हजारच्या वर मताधिक्याने मोठा व दणदणीत विजयी मिळवत पंधरा वर्षांची मदन भोसले यांची सत्ता उलथवून टाकली आहे.
उन्हात दोन मिनिटे उभे राहिले तर माणसाचा जीव कासावीस होतो. अशा वेळी शिवारात वणवा लावून अनेक जीवजँतु व सरपटणाऱ्या प्राण्यांचा बळी जात आहे. त्यामुळे वणवा लावणाऱ्यावर वन विभागाने कडक कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. चार दिवसांपूर्वी वाशिवली व किरुंडे येथे वणवा लावल्या प्रकरणी वाई वन विभागाने दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.
हनीट्रॅप च्या जाळ्यात अडकवून बदनामीची भीती दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या एका महिलेसह दोघांना वाई पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. पुनम हेमंत मोरे व हेमंत विजय मोरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वाई येथील यशवंत नगर परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सोमजाई नगर येथील १७ वर्षाच्या सावत्र मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी सावत्र पित्यास अटक केली आहे.
सुरूर, ता. वाई येथूनदोन ट्रकच्या डिझेल टाकीमधुन एकाने डिझेलची चोरी केल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
'काशीनाथाचं चांगभलं'च्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत साताऱ्यातील बावधन (ता. वाई) येथील भैरवनाथाची बगाड यात्रा उत्साहात पार पडली. सकाळी दहाच्या सुमारास बगाड्याला बगाडावर चढवून बगाड मिरवणुकीला सुरुवात झाली.
भुईंज (ता वाई) येथील किसनवीर सहकारी साखर कारखानामधील कामगारांना २५ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांनी कारखान्याच्या गेट समोर ठिय्या आंदोलन पुकारले. या आंदोलनात सुमारे ४०० पेक्षा अधिक कामगार सहभागी झाले.
महिला दिनानिमित्त वाई पोलीस ठाण्याचे कामकाज महिला अधिकारी व कर्मचारी यांनी पाहिले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी दिली.
वाई-मेणवली रस्त्यावर हॉटेल राजयुग जवळून पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अवैध पिस्तूल जप्त केले आहे. यावेळी सातारा येथील एक तडीपार गुंड पळून जाण्यात यशस्वी ठरला.
खानापूर, ता. वाई येथील दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व किराणा साहित्य चोरून नेल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
हरिहरेश्वर बँक घोटाळ्याची व्याप्ती वाढली असून बनावट कर्ज प्रकरण दाखवून ४ कोटी ४९ लाख रुपयांचा गैरव्यवहार आणखी एक गुन्हा अजित खामकर, नंदकुमार खामकर यांच्यासह १८ जणांवर दाखल झाला आहे.
वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात महाडला जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसला नागेवाडी फाट्यावर सोळा नंबर बस स्टॉप जवळ आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वाई, ता. वाई येथे अज्ञात चोरट्यांनी मोबाईल शॉपी फोडून सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या ३७ कोटी ४६ लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे संस्थापक नंदकुमार खामकर यांच्यासह २९ जणांवर गुन्हा दाखल असून याप्रकरणात पाच जणांना आज आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
वाई, ता. वाई येथील हरिहरेश्वर बॅंकेत ३८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून आठ दिवसांमध्ये ठेवी परत न दिल्यास आम्ही आत्मदहन करणार असल्याचा इशारा ठेवीदारांनी दिला आहे.
सातारा शहराची हद्दवाढ होऊन सुमारे दोन वर्षे उलटली तरी अद्यापही सातारा शहराच्या नवीन प्रभागात घंटागाडी सेवा अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. याचे मूळ कारण आरोग्य विभागाचे घंटागाडीचे टेंडर प्रशासकीय घोळा मध्ये अडकून पडले आहे. फाईल जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर असूनही अद्याप त्यावर सही झालेली नाही.
फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी अमोल विजय मराठे, वय २७, रा. पसरणी, ता. वाई याच्या विरोधात पोलीस पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा पालिकेच्या महसुलाला राजकीय दबावातून गळती लावण्यात काही शुक्राचार्य धन्यता मानतं आहे. पोवई नाक्यावरील एका बड्या धेंडांच्या थकबाकी वसुली बाबत पालिकेची प्रचंड चालढकल सुरु असून त्या व्यावसायिकाने ठेवलेले भाडेकरूंची नोंद पाहणी पत्रकावर आणले जाऊ नये यासाठी राजकीय दबाव आणला जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरणं दडपण्याचा जोरदार आटापिटा सुरु असून या राजकीय पाट्यामध्ये पालिका कर्मचारी मात्र विनाकारण पिसले जात आहेत.
सातारा जिल्ह्यातील सहा नगर पालिकांचा पाच वर्षाचा कार्यकाल संपल्याने प्रशासकीय राजवट लागू झाली. मात्र नगरविकास विभागाकडून याबाबतचे निर्देश सोमवारी उशिरापर्यंत लागू झाले नव्हते. या पालिकांमध्ये प्रशासक नेमण्याच्या हालचाली गतीमान झाल्या असून, नगरविकास विभागाच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
बेकायदेशीर कारवाया करणार्या आणि समाजाला त्रास देणार्या विविध गुन्ह्यातील सहाजणांना एका वर्षा करीता पुर्ण सातारा जिल्हा हद्दीतून हद्दपारचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जारी केला आहे.
कुर्ला, मुंबई येथील एका विवाहित महिलेला मुल होण्यासाठी एकाने वाई, जि. सातारा येथील आपल्या बहिणीच्या घरी तसेच यवतमाळ, जि. यवतमाळ येथील चुलत्यांच्या घरी घेऊन जात आयुर्वेदिक औषध देण्याच्या आमिषाने त्या महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून विठ्ठल गणपत पवार याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
तीन महिन्याचा पगार, वीस वर्षाचा लाभ, सर्व सातवे वेतन आयोगाचा फरक असे एकूण २ लाख ७७ हजार ६८५ रुपयांचे बिल पारीत केल्याचा मोबदला व पुढील बिल काढण्यासाठी लाचेची मागणी करुन १ हजार रुपयांची लाच स्वतः स्वीकारताना वाई येथील उपकोषागार कार्यालयातील उपकोषागार सुधाकर शंकर कुमावत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
वाई शहरातील दोन मुले बेपत्ता झाल्यानंतर वाईस सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती शाळांच्या आवारात मुलांची आणि काळजी घेण्याचे आवाहन वाई च्या पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने देखील केले होते या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले. त्यांनी तांत्रिकदृष्ट्या तपास केला, पण बेपत्ता झालेली ही दोन मुले पैसे संपल्यावर पनवेल मध्ये सापडली.
वाई शहराच्या विकासामध्ये विद्यमान, माजी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष, नगरसेवक-माजी नगरसेवक, यांनी महत्वाची भूमिका बजावली असून, त्यांचा आज कृतज्ञता गौरव सोहळा वाई नगरपरिषदेने आयोजित केला आहे. ही कोतुकास्पद बाब आहे. त्याचा आदर्श जिल्ह्यातील इतर नगरपरिषदांनी घ्यावा, असे प्रतिपादन सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
वाई हत्याकांड सुनावणीमध्ये मंगल जेधे खून प्रकरणातील माफीचा साक्षीदार असलेल्या ज्योती मांढरे हिचा उलटतपास पूर्ण झाला असून आता उर्वरीत साक्षी, पुरावे घेतले जाणार आहेत. तसेच सलमा शेख प्रकरणात ज्योतीच्या उलट साक्षीला सुरुवात करावी, असे आदेश कोर्टाने बचाव पक्षाला दिले. दरम्यान, या खटल्याची पुढील सुनावणी दि. 20 डिसेंबर रोजी होणार आहे.
अभिनेत्री कंगणा रानावत हिने भारतीय स्वातंत्र्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ साताऱ्यात शिवसेनेने शनिवारी पोवई नाक्यावर घोषणाबाजी केली. सेनेच्या नियोजित जोडे मारो आंदोलना पूर्वीच पोलिसांनी हस्तक्षेप करत पुतळा ताब्यात घेतल्याने आंदोलकांचा मात्र हिरमोड झाला.
संपूर्ण भारतात कोरोना महामारीमूळे मार्च २०२० ते आजपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे बहुतांश: उद्योगधंदे, व्यापार, रोजगार बंद झाल्यामुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. उत्पन्नाचे आर्थिक स्त्रोत बंद झाले आहेत.
प्रत्येक शहराची एक खास ओळख असते. सातारा शहर हे तर ऐतिहासिक शहर असून पोवई नाका हे सातारा शहराचे महत्वाचे ठिकाण मानले जाते. याच पोवई नाक्यावर आठ रस्ते एकत्र येतात. कराड, कोरेगाव, माण, फलटण, खंडाळा, वाई, महाबळेश्वर तालुक्यातून याच ठिकाणी प्रथम प्रवेश होतो.
आनेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
शस्त्रबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी चार जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. उशिरा पर्यंत खंडाळा, शिरवळ, बावडा व भादे गटाची मतमोजणी सुरु असून या चारही गटात राष्ट्रवादीने आघाडी मारली आहे.
येथील महागणपती घाटावर परप्रांतीय तरुणावर दोन्ही हातात तलवारी घेऊन ठार मारण्याच्या उद्देशाने तलवार हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी व शहरातील सहा मद्य विक्रीच्या दुकानात तोडफोड करून दहशतीने दुकाने बंद केल्याप्रकरणी अजय गोपी घाडगे यास पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
देशभक्त क्रांतिवीर किसन वीर यांचे सुपुत्र सातारा जिल्ह्याचे जेष्ठ नेते, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तसेच किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सुरेश (आण्णा) किसन वीर (वय ८२) यांचे आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सातारा येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पाचवड, ता. वाई येथील विराट नगर परिसरात वास्तव्य करणाऱ्या तिघांच्या विरोधात भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाई तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर ३२ वर्षीय तरुणाने महाबळेश्वर आणि वाई तालुक्याच्या परिसरात वेळोवेळी बलात्कार केल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी संशयित आरोपी राजेंद्र महादेव रांजणे (वय ३२) याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केले आहे.
वाई, दि. २८: भारतामध्ये सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. यावर महाराष्ट्र शासन विविध उपाययोजना करीत आहे. आपल्या सातारा जिल्हयातही कोरोनाचा कहर सुरू आहे. यावर जिल्हाधिकारी यांनी सातारा जिल्हयात कडक लॉकडाउन केलेले आहे. या कोरानाचा पार्श्वभुमीवर आज वाई नगरपरिषदेची विशेष सभा व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे पार पडली. पहिल्यांदाच या कठीण परिस्थितीमध्ये दोन्ही आघाड्यांनी गट-तट न पाह...
लाखानगर वाई येथे दारु विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलिसांनी छापा टाकून युवकास ताब्यात घेतले. त्या युवकाकडून सुमारे इंडिका कारसह एक लाख बारा हजार 840 रुपयांचा ऐवज हस्तगत केला असून त्या युवकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंडणीच्या उद्देशाने आलेल्या गज्या मारणे टोळीशी संबंधित तेरा जणांची न्यायालयाने तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. गुरुवारी वाई पोलिसांनी पुणे महाबळेश्वर रस्त्यावर भीमनगर वाई तपासणी नाक्यावर सर्वांना ताब्यात घेतले होते.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी व जिल्हा बंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या चौदा जणांना वाई पोलिसांनी भीम नगर तिकटण्यात ताब्यात घेतले. हे सर्व जण पैशाच्या वसुली साठी आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
‘सध्या सर्वत्र सुरू असलेल्या कोरोना वैश्विक महामारीवर मात करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपाययोजनांना मदत करण्यासाठी वाई अर्बन बँक परिवाराच्या वतीने 100 बेड कोरोना केअर सेंटरकरिता वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, तहसीलदार रणजितसिंह भोसले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहेत,’ अशी माहिती दि वाई अर्बन को. आँप. बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे यांनी दिली.
जिल्हाबंदी आदेश झुगारून महाबळेश्वरच्या सहलीवर येणे मुंबई येथील पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. पालिकेच्या विशेष पथकाने पर्यटकांना व पर्यटकांना आसरा देणार्या हॉटेलवर दंडात्मक कारवाई करून 55 हजारांचा दंड शुक्रवारी वसूल केला. पालिकेच्या मुख्याधिकार्यांच्या या धाडसी कारवाईचे शहरातून चांगलेच कौतुक केले जात आहे.
कोरेगाव शहर आणि तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी धडक कारवाईस सुरुवात केली आहे. मंगळवारी सकाळी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 101 वाहनांवर कारवाई करत 20 हजारांहून अधिक दंड वसूल केला आहे. शासनाच्या निर्बंधांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने खळबळ उडाली आहे.
फरांदवाडी (ता. फलटण) येथे तावडी फाट्यावर आज दुपारी फलटण शहर पोलिसांनी दोन लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. निखिल सतीश कदम (वय 26, रा. झडकबाईचीवाडी, ता. फलटण) याच्या ताब्यात असलेली मारुती सुझुकी कंपनीची ओमनी गाडी क्र. (एमएच 11 सीजी 4840) मधून प्रतिबंधित असलेले अन्न पदार्थ (विमल नावाचा गुटखा) एकूण किंमत रुपये 1,95,000 सह विनापरवाना वाहतूक करीत असताना मिळून आला आहे. त्याच्या ताब्यातून प्रतिबंधित अन्नपदार्थ व गाडी असे मिळून 4,95,000 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
फलटण शहरातील भर बाजारपेठेत एका कापड दुकानदाराने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ‘हम करे सो कायदा’ या उक्तीप्रमाणे जुन्या इमारतीची तोडफोड करीत अनधिकृतपणे मुख्य रस्त्यांपर्यंत लोखंडी जिना टाकला असल्याचे वृत्त दै. ‘मुक्तागिरी’ने प्रसिद्ध करताच संबंधित जिना पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी आदेश देताच पालिकेच्या अधिकार्यांनी व कर्मचार्यांनी काढून टाकला असून, दै.‘ मुक्तागिरी’च्या वृत्ताचे सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे.
पाचगणी बाजारपेठेवर नगरपालिका, पाचगणी पोलीस ठाणे आणि महसूल विभागाच्या संयुक्तिक पथकाची करडी नजर असून या पथकाने दोन दिवसांत पर्यटक, व्यापारी, ग्राहक व नागरिकांकडून मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे या नियमांचे पालन न केल्याने दोन दिवसात तब्बल 9200 रुपयांचा दंड वसूल केला.
प्रशासनाने आवाहन करून देखील पुसेगाव (ता. खटाव) बाजारपेठेत कोणत्याही नियमाचे पालन न करता नागरिक बिनधास्त वावरत असल्याने या ठिकाणी कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. येथील वाढत्या कोरोना आलेखाची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने शुक्रवार (दि. 2) पासून पुसेगावसह परिसरात विनामास्क फिरणार्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सातारा यांच्या 27/3/2021च्या आदेशान्वये एका पेक्षा पाच लोकांनी एकत्र येऊन संसर्ग वाढीला मदत करण्याच्या कारणावरून काल शुक्रवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान खोमन गुळाचा चहा या हॉटेलमध्ये पाच पेक्षा जास्त म्हणजे दहा ते बारा लोक एकत्र येऊन सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करत व्यवसाय करणारे रणजित रामचंद्र कांबळे यांचे दुकान सील करून पालिका व पोलीस प्रशासनाने म्हसवडच्या व्यावसायिकांना जोर का झटका दिल्याची चर्चा म्हसवड परिसरात सुरू आहे.
‘किसन वीर साखर कारखाना यंदा आपला 50वा गळीत हंगाम साजरा करीत आहे. कारखान्याची सूत्रे शेतकरी सभासदांच्या विश्वासावर हाती घेतल्यानंतर सभासद, कर्मचारी आणि कारखान्यासाठी उपयुक्त घटकांनी घेतलेल्या सहकार्याच्या भूमिकेमुळे कार्यस्थळावर अनेक नवनवीन प्रकल्प उभे करता आले. याचा विशेष आनंद मला व माझ्या व्यवस्थापनास आहे, परंतु गेल्या काही वर्षात साखर उद्योग अनेक अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. नैसर्गिक आणि आर्थिक संकटामुळे आपल्या उत्पादकतेवर प्रतिकूल परिणाम झाला. या कठीण परिस्थितीमध्ये शेतकरी सभासद व कामगारांन
महामार्ग पोलीस केंद्र, भुईंज येथे पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस कोल्हापूर विभाग शिंत्रे यांच्या हस्ते ज्या हायवे वॉरियर्स मृत्युंजय दूत यांनी अपघातामध्ये जखमींना तत्काळ मदत करून हॉस्पिटलमध्ये दाखल केले, अशा मृत्युंजय दूतांचा फुलाचे झाड व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
गुरेघर (ता. महाबळेश्वर) येथील ग्रामपंचायत शॉपिंग सेंटरमधील दुकान गाळ्यामध्ये राहुल प्रकाश सणस (वय 43, रा. 245 गंगापुरी, ता. वाई) यांचे दुकान असून, हे दुकान व शेजारील पाच दुकाने दि. 20 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री 9 वाजल्यापासून दि. 21 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 6च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी व त्यांचे शेजारील असे एकूण पाच दुकानांचे शटर कशाच्यातरी सहाय्याने उचकटून आत प्रवेश करून दुकानाच्या गल्ल्यातील एकूण 4200 रुपये रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेल्याची घटना घडली होती.
खटाव तालुक्यामध्ये वाळू उपशाने तसेच गौण खनिज उत्खननमुळे नदीपात्र व पुलाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने तहसीलदार किरण जमदाडे यांनी कारवाईचे आदेश देताच आज गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणारी तीन वाहने तहसीलदार जमदाडे यांच्या पथकाने पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
येथील दि वाई अर्बन बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी यांना सहकार क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल नुकतेच नवी दिल्ली येथील प्रमोटिंग अॅचिव्हमेंट फाउंडेशनचा भारत निर्माण पुरस्कार मिळाला आहे. स्टर्लिंग मेरीट एक्सलंट परफॉरमन्स अॅड आऊटस्टॅडिंग कॉन्ट्रीब्युशन इन द फिल्ड ऑप को. ऑपरेटिव्ह बँक डेव्हलपमेंट या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे, माजी अध्यक्ष व वाई अर्बन परिवाराचे प्रमुख अरूण देव यांच्या हस्ते चावलानी यांचा सत्कार
‘बँकिंग ग्राहकांच्या बदलत्या गरजा ओळखून दि वाई अर्बन को. आँप. बँकेने शताब्दी वर्षाचे औचित्य साधून आकर्षक (डायनॅमिक) वेबसाईट बँकेचे ज्येष्ठ संचालक डॉ. विनय जोगळेकर यांच्या हस्ते सुरू केली आहे. बँकेचे सभासद, खातेदार, कर्जदार व हितचिंतक यांनी नव्या आकर्षक स्वरूपातील वेबसाईटला अवश्य भेट द्यावी,’ असे आवाहन बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक आणि टोपलीभर ताज्या रसरशीत भाज्या, फळझाडांचे रोप देऊन पाहुण्यांचे स्वागत, वयाच्या 82व्या वर्षी देखील ताठ कण्याने दररोज रानात मजुरीने राबणार्या झिंगराअक्का कुंभार या कष्टकरी वृद्धेला प्रमुख पाहुण्या म्हणून व्यासपीठावर मानाचं स्थान आणि साडीचोळी देऊन सन्मान, अशा अनोख्या आणि शेतकरी, कष्टकर्यांच्या शेतमालाचा, श्रमाचा गौरव करणार्या कृतीने भुईंज येथील साक्षी इरिगेटर्सचे नव्या वास्तूत दिमाखात स्थलांतर झाले.
वाई येथील ब्राह्म समाजाच्या इमारतीत असलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची मुलींची शाळा पाडल्याप्रकरणी वाई न्यायालयाने वाई पोलिसांना ब्राह्म समाजाच्या अध्यक्षा मीनल राजेंद्र साबळे त्यांचे पती राजेंद्र सर्जेराव साबळे व अन्य सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
‘बचतगट चळवळीने महिलांना दिलेली शक्ती महत्त्वाची आहे. या शक्तीतून एकत्र आलेल्या भीमजननी बचतगटास भक्कम पाठबळ देऊ. महिलांनी निर्भयपणे आणि एकजुटीने काम करावे. काही अडचण आल्यास पोलीस दल महिलांच्या पाठीशी आहे,’ अशी ग्वाही पोलीस उपअधीक्षक शीतल जानवे-खराडे यांनी दिली.
सहकार व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल येथील दि वाई अर्बन को ऑप. बँकेचे अध्यक्ष सीए चंद्रकांत काळे यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते लेक्सिकॉन भारत लीडरशीप अॅवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला.
‘आज जगात भारत देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली बलाढ्य देश म्हणून पुढे येत आहे. नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली रोजगार, शेतकरी हिताचे घेतलेले निर्णय, उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्रात देशाने घेतलेली भरारी आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी व त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वांनी व विशेषतः युवा पिढीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन डॉ. सुरभी भोसले-चव्हाण यांनी केले.
पाचगणी नगरपालिका हद्दीतील सर्व स्टॉल धारकांचे लॉकडाऊन काळातील पाच महिन्यांचे भाडे माफ करावे, अशी मागणी पाचगणी श्रमजीवी स्टॉल युनियनच्यावतीने पालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर व नगराध्यक्षा लक्ष्मी कर्हाडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणी प्रस्ताव गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी राज्य शासनाने सुरुवातीचे अनेक जाचक नियम व अटी रद्द करून त्यामध्ये अनेक बदल केलेले आहेत.
येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरु असणार्या रुग्णाने आजाराला कंटाळून व नैराश्यातून रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य सेविकेला धक्काबुक्की व मारहाण करत पळून जाऊन कृष्णा नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केली. संचित कोविडं रुग्णालयानजीक आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
कोरोनासारख्या भयंकर रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. या भीषण परिस्थितीत आशाताईंनी आपला जीव धोक्यात घालून शासनाने दिलेल्या कामाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत कोविड विरुद्धच्या लढाईत आघाडीवर आहेत. या संकटाशी सामना करताना त्यांच्या या लढाईला बळ देण्यासाठी ‘भाजपाचा जिल्हा महिला मोर्चा’च्या अध्यक्षा डॉ. सुरभी भोसले-चव्हाण यांच्या माध्यमातून राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व
करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, गणेश मंडळांनी एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यावर भर द्यावा असे आवाहन वाई विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी केले.