वडूज येथील झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे पावणे चार लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची फिर्याद वडूज पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या पदाधिकारीपदी सभासद परिवर्तन पॅनलच्या संचालकांना संधी मिळाली असून चेअरमनपदी नवनाथ जाधव यांची, तर व्हाईस चेअरमनपदी शशिकांत सोनवलकर यांची निवड करण्यात आली आहे. 18 विरुद्ध 3 अशा मताधिक्याने पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या.
वडूज येथे घरफोडी झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
वडूज ता खटाव येथील सामान्य शेतकरी भिमराव मारुती गोडसे यांना एका जंगली वानराने कमरेला धारदार नखे लावून गंभीर जखमी केले. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे सणासुदीला शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.
पन्नास खोके... या सरकारचं करायचे काय... शिंदे सरकार हाय हाय...शेतक-यांना दिलासा देत नाय.. अशा घोषणा देत खटाव तालुक्यातील वडूज येथे शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आलं. शिवसैनिकांनी वडूज तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुजलेल्या शेतातील पिकाचे तोरण बांधून सरकारचा निषेध नोंदवला.
खटाव तालुक्यातील वडूज या ठिकाणी शिवसेनेचा आक्रमक चेहरा असलेले शिवसेना तालुकाप्रमुख शहाजीराजे गोडसे व कट्टर शिवसैनिक युवराज पाटील, बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संतप्त शिवसैनिकांनी मंत्री एकनाथ शिंदे, शुभराज देसाई, आ. महेश शिंदे यांच्या फोटोला उलटे टांगून लाल मिरच्यांची धुरी दिली.
आरंभ प्रशिक्षण केंद्राचा वडूज अंगणवाडी सेविका मार्फत भव्य दिव्य शुभारंभ करण्यात आला. बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी लहान मुलांच्या मानसिक बदल, त्यांची आवडनिवड व इतर गोष्टींच्या बाबत योग्य पद्धतीने अंगणवाडी सेविका यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले.
संपूर्ण खटाव तालुक्याचे लक्ष लागलेल्या वडूज विकास सोसायटी पंचवार्षिक निवडणुकीत सर्व पक्षीय चेहरा असलेल्या शेतकरी परिवर्तन विकास पॅनेलच्या शिट्टीने बारा जागा जिंकून दहा वर्षाने परिवर्तन करून बाजी मारली. कपबशीला एका जागी यश मिळाले.
मायणी (ता. खटाव) येथे मागासवर्गीय मृत व्यक्तीची बनावट सही व कागदपत्रे तयार करून जमिनीचा करार केल्याच्या गुन्ह्यात दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. त्याबाबत अटकपूर्व जामीन अर्ज वडूज न्यायालयाऐवजी अन्य न्यायालयात चालवण्यासाठी भाजपचे आ. जयकुमार गोरे यांच्यावतीने सातारा जिल्हा न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. तो फेटाळला आहे. आता जामिनाबाबत वडूज न्यायालयातच सुनावणी होणार आहे.
दुष्काळी भागात वैभवशाली वास्तू उभ्या राहत आहेत. येथील मुले हुषार असून शैक्षणिक मेहनतीने देशाच्या कानाकोपऱ्यात उच्च पदस्थ अधिकारी म्हणून सेवा बजावत आहे. तर काही जण सोन्याच्या दलाईचे काम करीत आहेत, असे प्रतिपादन माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
खटाव तालुक्यातील वडूज मधील अत्याधुनिक जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करा, अशी मागणी मनसेचे जिल्हा संघटक (स्वयंरोजगार) सुरज लोहार यांनी खटाव तहसिलदार यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
पोलीस खात्यात सेवा करताना आनंदराव जगताप यांनी घड्याळाच्या काट्याकडे पाहीले नाही. नवीन सहकार्यांना मार्गदर्शन केले. ज्या ठिकाणी त्यांनी नोकरी केली तेथे आपल्या कामाचा ठसा उमटवला. प्रामाणिकपणा व समर्पीतपणा या दोन्ही गुणांमुळे त्यांच्या बद्दल पोलीस व समाज यांच्यात आदर्श प्रतिमा निर्माण झाली त्यांचे कार्य साऱ्यांकरीता प्रेरणादायी व दीपस्तंभाप्रमाणे राहील, असे प्रतिपादन कोरेगावचे पोलीस उपअधिक्षक गणेश किंद्रे यांनी व्यक्त केले.
आपल्या मंत्रीपदाचा आणि राज्य सहकारी बँकेच्या सत्तेचा गैरवापर करून अजितदादा, अशोक चव्हाण यासारख्या अनेक मंत्र्यांनी राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने गिळले. त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा काहीही अधिकार नाही. हजारो शेतकरी सभासदांची त्यांनी फसवणूक केली आहे.
वडूज परिसरात सकाळी मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या नागरिकांना आज मॉर्निंग वॉक चांगलेच महागात पडले. विनामास्क व विनाकारण सकाळी फिरल्याच्या कारणावरून पोलीसांनी ५६ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून तब्बल २९ हजार रूपयांचा दंड वसूल केला. आज पहाटे वडूज शहर परिसरातील पेडगाव रोड, भागांत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व नियम मोडणाऱ्या नागरिकांवर सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी ...
आपत्ती व्यवस्थापन बैठकीत खटाव प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी रस्त्याकडेला असणारी झुडपे काढण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र संबंधित विभागाने अजून काहीच कार्यवाही केली नसल्याचे चित्र आहे. याबाबत प्रांताधिकारी जनार्दन कासार यांना संपर्क साधला असता या संदर्भात अहवाल मागवून घेऊ तसेच प्रत्यक्षात कामास सुरुवात नसेल तर त्यांना पुन्हा एकदा या विभागाला सूचना दिल्या जातील अशी प्रतिक्रिया श्रीफ कासार यांनी दिली
सातारा जिल्ह्यातील माण खटाव तालुक्यातील ६ हजाराहून अधिक लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते. तर आता पुन्हा एकदा त्यांनी गोंदवले येथे स्व खर्चाने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू केले आहे. सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव तसेच लॉकडाऊन मुळे। सर्वच ठिकाणचे व्यवसाय धंदे बंद असल्याने सर्व सामान्य लोकाचे जग...
मातृभूमीशी ऋणानुबंध कायम ठेवण्यासाठी... वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर शहरी भागांत वैद्यकीय व्यवसायाच्या चांगल्या संधी होत्या, मात्र आपल्या ग्रामीण भागाशी असणारी नाळ कायम ठेवण्याचे संस्कार आई वडीलांनी दिले होते. त्यामुळे आपल्या मातृभूमीशी असणारे ऋणानुबंध कायम ठेवण्यासाठी अवघ्या ३० दिवसांत हॉस्पिटल व कोव्हिड सेंटरची उभारणी करण्यात आली असल्याचे डॉ. सचिन साळुंखे यांनी सांगितले.
खटाव तालुक्यातील गावांना विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. या आवाहनाला तालुक्यातील ग्रामपंचायतींनी साथ दिली असून आता पर्यंत तालुक्यातील ८६ बाधित गावांपैकी ७१ गावात विलगीकरण कक्ष सुरू झाले आहेत. तसेच उर्वरित गावांनीही विलगीकरण कक्ष सुरू करण्याची प्रक्रिया राबविल्याची माहिती तहसीलदार किरण जमदाडे यांनी दिली. तालुक्यात कोरोना बाधित रूग्णां...
वडूज शहरातील तसेच प्रभागातील नागरिकांना उपचार वेळेत मिळावे यासाठी स्व खर्चातून मोफत रुग्णवाहिका सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असून लवकरच मोफत रुग्णवाहिका सुरू करणार असल्याचे माजी स्वीकृत नगरसेवक काकासाहेब बनसोडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून सदैव संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग अशी ख्याती झालेल्या महाराष्ट्र भर ख्याती झालेल्या रॉयल कारभार ग्रुपने वेगळा ठसा उमटवला आहे. याबाबत माहिती अशी की कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात रुग्णांना ओकक्सिजन बेड रेमडी सिवर व इतर आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी नातेवायकाना धावाधाव करावी लागते याची जाणीव ठेवून तसेच नातेवाईकांच्या आग्रहाखातर रॉयल कारभार ग्रु...
सध्या तालुक्यातील अनेक ठिकाणी रुग्ण उपचार घेत आहेत. लोकवर्गणीच्या माध्यमातून रुग्णांना अंडी, बिस्कीट, फळे व इतर सकस आहार देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे. - किरण जमदाडे, तहसीलदार खटाव ( वडूज )
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून प्रशासन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त कोणी बाहेर पडू नयेत अशा सूचना आहेत. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळल्यास आपणाला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. - किरण जमदाडे, तहसीलदार खटाव ( वडूज )
तालुक्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्या प्रसंगात ऑक्सिजन सिलेंडरसाठी तहसिलदार किरण जमदाडे यांच्याकडून विचारणा करण्यात आली. त्यावेळी आपण तातडीने कारखान्यावरील २० सिलेंडर उपलब्ध करून दिले. गेली २० ते २५ वर्षे आपण तालुक्यातील जनतेची प्रामाणिकपणे सेवा करीत आलो आहे. नियतीने संधी दिल्यास आगामी काळातही जनतेला चांगली सेवा देऊ. - प्रभाकर घार्गे (माजी आमदार)
येथील बबनराव सरतापे हे सर्वसामान्य पानपट्टी चालक आहेत. व्यवसायाबरोबर ते मनापासून हनुमानाची उपासनाही करतात. दरवर्षी ते हनुमान जयंतीदिवशी अनाथ शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान वाटप, गोरगरिबांना मदत करत असतात.
उपविभागीय अधिकारी माण-खटाव यांच्या आदेशान्वये वडूज शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर वडूज नगरपंचायत व प्रशासकीय अधिकार्यांनी शहरामध्ये शुक्रवार, दि. 23 ते 30 एप्रिलअखेर ‘जनता कर्फ्यू’ जाहीर करण्यात आला असून, याबाबतचा निर्णय हुतात्मा स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला.
येथील ग्रामीण रुग्णालयातील अपुर्या कर्मचारी वर्गाचा फटका आता कोरोना संसर्ग परिस्थितीमध्ये चांगलाच बसू लागला आहे. कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित मृतदेह उचलण्यासाठी कर्मचारीच नसल्याने याठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकार्यांनाच अन्य कर्मचार्याला सोबत घेऊन कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह उचलावे लागत आहेत.
‘खटाव तालुक्यात दररोज सरासरी किती नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत. सद्य:स्थितीतील उपाययोजना, उपलब्ध साधन सामग्री याचा आरोग्य विभाग व प्रशासनाने रोजच्या रोज आढावा घ्यावा. तसेच रुग्ण व नातेवाइकांची इतर ठिकाणी होणारी धावपळ कमी करण्याचा प्रयत्न करावा,’ असे आवाहन आ. शशिकांत शिंदे यांनी केले.
शहरात आज ड्रिंक ऍन्ड ड्राईव्ह बाबत कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षत घेता कोणीही गर्दी करून थांबू नये, मास्क न वापरता शहरात फिरू नये, सोशल डिस्टनसीग चे पालन करावे. रात्री ८ नंतर कोणीही बाहेर संचार करू नये - मालोजीराव देशमुख
वडूज शहरात रात्री ८ वाजल्यानंतर कोणी ही बाहेर पडू नका अन्यथा कारवाईला सामोरे जाल असा इशारा वडूज पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी दिला आहे. सध्या जिल्हयात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आज पासून रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यत जमावबंदी व संचार बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्या आदेशाचे सर्वांनी पालन करायचे आहे. असे ...
येथील महावितरणच्या उपविभाग अंतर्गत वडूज शहर शाखा अंतर्गत थकबाकीदार ग्राहकांकरिता वीजबिल धडक वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. वीजबिल भरा नाहीतर वीज पुरवठा तत्काळ खंडित या धोरणानुसार प्रत्यक्ष ग्राहकांची भेट घेऊन व ग्राहकास ऑनलाइन प्रणालीद्वारे वीजबिल भरण्यास प्रेरित करून थकीत ग्राहकांचे वीजबिल भरून घेण्यात येत आहे. तसेच थकीत वीजबिल न भरणार्या ग्राहकांचा वीजपुरवठा तत्काळ खंडित करण्यात येत आहे.
‘व्हॉलीबॉल व इतर खेळांसाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावणार्या राष्ट्रीय खेळाडू जावेद बाशुमियाँ मनोरे यांना राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळावा,’ असे मत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. बंडा गोडसे यांनी व्यक्त केले.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडीनंतर खटाव-माण तालुक्यांतील 120 पैकी 68 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने निर्निवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. तर काही ठिकाणी समविचारी पक्षांसोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्तेत असल्याची माहिती निवृत्त आयुक्त व खटाव माण राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
येथील जे. सी. शहा पेट्रोल पंपावरून दुचाकीच्या डिक्कीतील अडीच लाख रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. आज दुपारी तीन वाजता घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. घडलेली सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
‘शहरी लोकांच्या सुविधेसाठी मोठमोठे हॉस्पिटले असतात. मात्र, तुलनेने ग्रामीण भागात आरोग्याच्या अत्याधुनिक सोयी नाहीत. खासगी हॉस्पिटलच्या माध्यमातून अशा प्रकारच्या चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे,’ असे मत कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले.
वडूज येथे शासनाचे नियम व अटींचे पालन करीत शिवजयंती सोहळा सर्व प्रकारची काळजी घेत संपन्न झाला. येथील बॉक्सर ग्रुप आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा समिती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करीत येणारे संकट दूर होऊन ही प्रजा सुखी व्हावी, यासाठी नतमस्तक झाले. सकाळी 11 वाजता पारंपरिक पद्धतीने वाकेश्वर येथील संतोष संभाजी फडतरे यांच्या ‘सर्जा राजाची’च्या बैलजोडी सजवून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली. जय जिजाऊ जय शिवराय, असा जयघोष करीत शहरातून भव्य मिरवणूक
पुसेसावळी ता खटाव येथे होत असलेल्या वाहतूक कोंडी मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या ठिकाणी वडूज कराडरस्त्यावर नेहमीच वर्दळ असते त्यामुळे रस्त्यावर अस्तव्यस्त पणे वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडी निर्माणहोत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तातडीने वाहतूक कर्मचारी नेमून ही वाहतूक कोंडी सुरळीत करावी अशी मागणी होताना दिसत आहे. पुसेसावळीतुन बाहेर पडण्यासाठी बाह्य रस्ता असतानाही ...
वडूज : येरळा धरणाच्या जुन्या नदीपात्रात मगर असल्याचे आज काही नागरिकांना दिसून आले. त्यानंतर आज रात्री वनविभाग तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. येरळा नदी पात्रात मगर असल्याचे समजताच परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे नदी पात्रात पाण्यात वाढ झाली होती. त्यामुळे येरळा धरणातील पाणी पातळीवाढून धरण पूर्...
पृथ्वीराज बाबांशी झालेल्या समक्ष भेटीनंतर रणजितसिंह देशमुख यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश निश्चित झाला. बुधवारी सकाळी ११ वाजता काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,पृथ्वीराज चव्हाण आणि राज्यातील काँग्रेसचे मंत्री , वरिष्ठ नेते यांच्या उपास्थितीत रणजितसिंह देशमुख काँग्रेस पक्षात स्वगृही प्रवेश करणार आहेत.
तत्कालीन खटाव तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांची सांगली अप्पर तहसीलदार म्हणून बदली झाल्यानंतर खटाव तहसीलदार म्हणून किरण जमदाडे यांच्याकडे जबाबदारी देण्यात अली होती. मात्र तत्कालीन तहसीलदार डॉ अर्चना पाटील या सांगलीला हजर होऊन ही खटावला तहसीलदार हजर झाले न्हवते. किरण जमदाडे यांच्याकडे सोलापूर जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षाचे प्रमुख, संजय गांधी योजना, बार्शी तहसीलदार पदाचा पदभ...
खटाव तालुक्यात चालू सप्ताहात विविध शासकीय कार्यालयासह अनेक गावांत कोरोनाचा घट्ट विळखा पडत चालला आहे. शुक्रवारी एकाच दिवशी तालुक्यातील 41 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना संसर्गजन्य आजारामुळे आठवडाभरात सुमारे 12 जणांचे बळी गेले आहेत.
उंबर्डे, ता. खटाव येथील एका विहिरीत कोल्हा पडला असल्याची माहिती ग्रामस्थांनी वडूजच्या वनविभागास दिल्यानंतर त्या कोल्ह्यास विहिरीतून बाहेर काढून जीवदान देण्यात आले.