राज्यातील अपघातांचा आढावा घेतला असता सातारा जिह्यात गत महिन्यात तब्बल 90 अपघात झाले असून त्यात किमान 47 जण मृत्युमुखी पडले आहेत. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी इतर यंत्रणांच्या समन्वयातून 42 ब्लॅकस्पॉट वरुन 8 सध्या शिल्लक आहेत.
वाहतुकीसाठी असणाऱ्या नियमांचे पालन केले जात नाही. सीट बेल्ट बांधणे, हेल्मेट वापरणे, बेगमर्यादेचे उल्लंघन करणे असे प्रकार अद्याप सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी केले.
सर्व नियम सर्वसामान्य जनतेसच का? अशा प्रश्न नागरिकांना पडला असून शहरामध्ये पार्किंगची सुविधा नाहीत पण नो - पार्किंग मधील वाहने उचलणेसाठी टोविंग व्हॅन आहेत. जेथे पॅर्जिंगचे आरक्षण आहे तिथे धनदांडगे, राजकारणी लोकांनी अनौपचारिक ताबा मारला असलेमुळे तिथे वाहने पार्किंग होऊ शकत नाही परिणामी सदरची वाहने जागा मिळेल तिथे पार्क होतात
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!