84 मुले दुबई मध्ये अडकले आहेत. हे विद्यार्थी ग्लोबल इमर्शन कार्यक्रमासाठी गेले होते,सगळे विद्यार्थी सुखरूप आहेत.
अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट कोर्स वोकेशनल बोर्ड यांच्या वतीने आयोजित व्यवस्थापन प्रशिक्षणाचे एक वर्षाचे विद्यावेतन थकल्याने या प्रशिक्षणातील 22 विद्यार्थिनींना सातत्याने पायपीट करावी लागत आहे. वोकेशनल बोर्ड आणि संबंधित जनता सहकारी बँक यांच्यामध्ये विद्यावेतनाच्या प्रश्नावरून टोलवाटोलवी सुरू आहे. या प्रश्नी तातडीने न्याय न दिल्यास साखळी उपोषणाचा इशारा विद्यार्थिनींनी दिला आहे.
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे मोठ्या उत्साहात शाळा प्रवेश दिन संपन्न झाला. यादरम्यान समता सैनिक दालाच्या वतीने बिगूल वाजवून मानवंदनाही देण्यात आली.
रयत शिक्षण संस्था व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या महाविद्यालयातील बँक मॅनेजमेंट विभागाच्या वतीने 8 मार्च ते 17 मार्च या कालावधीत ई-बॅंकिंग सेवांबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले.
या सोहळ्यात विद्यापीठातील ९६१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये १३ जणांना कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. तर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध अधिविभागात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
क्लासमध्ये कोयता आणणाऱ्या त्या सहा विद्यार्थ्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भारतीय संविधान हे या देशातील १३५ कोटी लोकसमुहाच्या जगण्याचा मुलाधार आहे. या संविधानाबद्दल प्रथमतः विद्यार्थ्यांना साक्षर करायला हवे. आपले हक्क - अधिकार कोणते ? कर्तव्ये काय आहेत हे शाळा - महाविद्यालयातून त्यांना सांगणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांसाठी दिले जाणारे शालेय शिक्षण ही त्यांची अंतिम जाणीव नाही. त्या जाणीवांपलीकडची समृद्धता आणि त्याची व्यापक वैचारिक दृष्टी तयार करण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिका कवयित्री डॉ. अरुणाताई ढेरे यांनी व्यक्त केली.
सातारा ते कोरेगाव रस्त्यावर खावली गावनजिक स्कूल बसने अचानक पेट घेतला होता. मात्र, ही बाब बसचालकाच्या लक्षातही आली नव्हती. तो विद्यार्थ्यांना घेवून गाडी चालवत निघालाच होता. सुदैवाने सातारा पोलीस दलातील एक कर्मचारी डयुटी संपवून दुचाकीवरुन घराकडे निघाले होते. त्यांना बसमधून धूर येत असल्याचे दिसल्यानंतर मग पोलीस कर्मचाऱ्याने स्कूल बसचालकाला बस थांबवण्यास सांगितले आणि क्षणाचाही विलंब न करता बसमधील विद्यार्थी शालेय साहित्यासह बाहेर काढले.
विद्यार्थी वर्गाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर निवडावे. आपला कल पाहून शाखा निवडावी. केवळ आपल्या जवळच्या मित्राने एखादी शाखा निवडली म्हणून आपण ती शाखा निवडू नये. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. करीअर च्या अनेक वाटा आहेत. आपल्याला जी योग्य वाटते ती वाट आपण निवडावी.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडण -घडणीसाठी ज्ञानाबरोबरच सातत्याने सुसंस्काराचे धडे दिले पाहिजेत, असे प्रतिपादन प्रा. श्रीधर साळुंखे यांनी केले.
तब्बल दोन वर्षाच्या कोरोना च्या कालखंडानंतर बुधवारी सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी सुमारे जिल्ह्यात ठिकाणी उपस्थिती दर्शवून शाळेचा पहिला दिवसाचा आनंद विद्यार्थ्यांनी द्विगुणित केला. शाळेत गुरुजनांनी विद्यार्थ्यांचे पुष्प आणि गोड खाऊ देऊन स्वागत केले.
युक्रेन देशामध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी सातारा जिल्ह्यातील एकूण 22 विद्यार्थी हे या देशामध्ये निवासी होते. युध्द काळापूर्वी 3 विद्यार्थी सुखरुप मायदेशी परतले होते. परंतू, 19 विद्यार्थी युध्द काळात युक्रेनमध्ये अडकले होते.
युक्रेन देशात सातारा जिल्ह्यातुन वेगवेगळ्या महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या १९ विद्यार्थ्यांपैकी ५ विद्यार्थी आज त्यांच्या घरी सुखरूप परतले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाचे आभार मानले असून उर्वरित १४ विद्यार्थी लवकरच जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्हा पोलीस व गुरुकुल स्कूल यांच्या संयुक्त सहकार्याने सातारा शहरात निर्भय निर्भया फलक उभारण्यात आले आहेत. गुरुकुल शाळा परिसरातील निर्भया पथक फलकाचे अनावरण सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते करण्यात आले. सहाय्यक पोलिस अधिक्षक आंचल दलाल यांच्या पुढाकाराने ही योजना राबवण्यात आली आहे.
येथील विद्यानगर परिसरातील सद्गगुरू घाडगे महाराज महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी करत गोंधळ घातला. तसेच जोरदार घोषणाबाजीही केली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच गोंधळ घालणार्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.
गेल्या दीडदोन वर्षांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा, महाविद्यालये ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये सुरू झाली. प्रत्यक्ष वर्गात अध्ययन अध्यापन होत असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षकवर्गही जोमाने कामाला लागला, दिवाळीच्या सुट्टी नंतर विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्र परीक्षा ऑफलाइन घेण्याचे नियोजनही केलेले होते, मात्र एसटी बसेसच्या संपामुळे विद्यार्थ्यांना शाळेत तसेच महाविद्यालयात येणे शक्य नसल्याने पुन्हा एकदा विदयार्थ्यांना ऑनलाइनच परीक्षा द्याव्या लागत आहेत.
भारत सरकार सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय विकलांग व्यक्ती विभागाकडून दिव्यांग व्यक्तींकरिता महत्वाच्या सहा शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित केल्या आहेत. या केंद्रीय शिष्यवृत्तीसाठी इ. 9 वी ते महाविद्यालयीन विभागात शिक्षण घेणारे दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून संबंधित संस्थांनी दि. 15 डिसेंबर पर्यंत अर्ज पडताळणी करणे आवश्यक आहे.
महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प हे शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थीनी व महिला यांना स्वसंरक्षण करण्यासाठी व त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपयोगी ठरतील, असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केले.
‘सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवणारा शिक्षक हाच देशाचा खरा आधारस्तंभ आहे. ज्ञान मंदिरातील काळ्या फळ्याच्या माध्यमातून विद्यार्थी जीवनात रंगभरणी करण्याचे काम शिक्षक करीत असतो. एक शिक्षक ते देशाचे राष्ट्रपती हा खडतर प्रवास आपण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,’ असे मत विश्वंबर बाबर यांनी व्यक्त केले.
चालू शैक्षणिक वर्षामध्ये शैक्षणिक शुल्कामध्ये ३० टक्के कपात करण्यात यावी. यासह विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्य