वाई-वाठार रस्त्यावरील शांतीनगर येथे झालेल्या भीषण अपघातात खानापुर, ता.वाई येथील किशोर चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला.
पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाचे कर्मचारी मार्कशीटसाठी विद्यार्थ्यांकडून पैशाची मागणी करत असल्याचं समोर आलं आहे. या सगळ्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
नागठाणे येथील गट नंबर 702 या सरकारी जागेवरील 14 कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्याविषयी शासन निर्देश असतानाही अद्याप त्यांना घरकुले मिळाली नाहीत, याबाबतच्या मागणीसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण सुरू करण्यात आले.
या सोहळ्यात विद्यापीठातील ९६१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये १३ जणांना कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. तर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध अधिविभागात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात शेतातून घरी जात असताना मधुकर तत्याबा मोरे (माजी सैनिक) यांचा नातू राहुल प्रकाश मोरे यास गावच्या पोलीस पाटील विक्रांत आनंद जाधव आणि शिपाई महेंद्र धोंडीबा जाधव यांनी जातीवाचक शिवागळ करत मारहाण केली होती.
जिल्ह्यातील मुस्लीम समाजबांधवांनी आषाढी एकादशी दिवशीच आलेल्या बकरा ईद या पारंपारिक सणाला फाटा देत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला आहे. त्यांच्या या सौहार्द्रतेचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
सातारा पालिकेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचा अमृत योजनेतील तृतीय पुरस्कार नुकताच प्राप्त झाला. शहराचा हा लौकिक कायम राखण्यासाठी शाहूनगर कार्यक्षेत्रामध्ये उद्योजक सागर भोसले यांचे जय सोशल फाउंडेशन ऐन पावसाळ्यात कामाला लागले आहे. चला शाहूनगर परिसर स्वच्छ ठेवूया हा संदेश घेऊन या फाउंडेशनचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन कचरा गोळा करणार आहेत.
‘अग्निपथ’ या केंद्र शासनाच्या योजनेवरुन काही राज्यात उद्रेक निर्माण झाल्याने सातारा जिल्ह्यातील सोशल मिडीया पोलिसांच्या रडारवर आला आहे. कायदा व सुव्यवस्था निर्माण होतील असे मेसेज फॉरवर्ड करु नयेत. अन्यथा संबंधित व्यक्ती व ग्रुप ऍडमिनवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. दरम्यान, सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन एसपी अजयकुमार बन्सल यांनी केले आहे.
थोर स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब उंडाळकर यांच्या नावाने स्वर्गीय विलासकाकांनी सुरू केलेले उंडाळेचे व्यासपीठ राष्ट्रीय विचाराचे व्यासपीठ असून या व्यासपीठावरून समाज बांधणीचे महत्त्वपूर्ण काम झाले असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
एका युवकाने तरूणीचे बनावट फेसबुक, इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून तिची अश्लिल छायाचित्रे प्रसिद्ध केल्याची घटना घडली. हे कृत्य करणाऱ्या युवकास सातारा सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अमोल संपत बाबर (वय 26) रा. शहापूर ता. कराड असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
सामाजिक व माहीती अधिकार कार्यात काम करणाऱ्या महारुद्र तिकुंडे यांच्यासारखे लोकांची रेकी होणे हे इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचे लक्षण असून मा. पोलीस अधीक्षक, सातारा यांनी वैयक्तिक लक्ष घालून संबंधीतांचा शोध घेणे आवश्यक आहे. अशाच प्रकारे डॉ. दाभोलकर, पानसरे यांनी केलेल्या निवेदनाचा पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष घातले असते तर असा घातपात झाला नस्ताआता पण प्रशासनाने या निवेदनास गांभीर्याने घेणेची गरज आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी बेळगाव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पडसाद उमटू लागले असून अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आलीय. या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्र राज्यातही उमटण्यास सुरुवात झालीय. याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनीही कर्नाटक प्रशासनाला कडक शब्दांत इशारा दिलाय.
सातारा पालिका व शाहूपुरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी शहरातील आठ दुकानदारांवर फिजिकल डिस्टन्सचे पालन न केल्याप्रकरणी कारवाई केली. संबंधितांकडून प्रत्येकी पाचशे असा एकूण चार हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेने जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर भरवले होते. या शिबिरामध्ये 30 रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपली समाजाविषयी असणारी तळमळ जोपासली आहे. यावेळी विविध मान्यवरांनी भेटून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आहे.
सोशल मीडियावर खोटी कागदपत्रे बनवून साखर कारखान्याची बदनामी होईल, अशी पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी २६ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत कारखान्याच्या प्रशासन विभागातील क्लार्क रणजीत कदम यांनी फिर्याद दिली आहे. ओमकार अरुण साळुंखे रा. रेठरे खुर्द ता. कराड असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
कराड तालुक्यातील गावांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास निधी योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयामार्फत राबवणाऱ्या येणाऱ्या योजनेमध्ये तालुक्यातील ५ हजार लोकसंख्येच्या वरच्या गावांना केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून गावच्या विकासासाठी हातभार लावावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली आहे.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे सगळीकडे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. अशावेळी रुग्णांना ऑक्सिजनची गरज मोठया प्रमाणावर भासत होती. त्याकाळात ऑक्सिजन अभावी अनेक रुग्ण दगावले.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी पारगाव (ता.खटाव) येथील तलावाची पाहणी करून पाणी सोडण्याचा शुभारंभ केला होता. त्यांच्यानंतर पहिल्यांदाच राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी येथील तलावाची पाहणी करून, उरमोडी जलसिंचन प्रकल्पाचे पाणी पारगाव तलावात सोडण्याचा शुभारंभ पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आला.
तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूरमध्ये महिलांनी गौराईचा आगमन पूजन सोहळा उत्साहात साजरा केला. याप्रसंगी शिंगणापूरमधील काही महिलांनी गौराई सणात समाज प्रबोधन, धार्मिक स्थळे, विवाह सोहळा, पर्यावरण समतोल, पाणी अडवा पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा, प्रदूषणमुक्त परिसर संकल्पना, श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा व पारंपरिक जुन्या रूढी-परंपरा, तसेच कोरोना बचाव देखावा असे सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले होते.