रायगड पावसाचे अपडेट : रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट असल्यामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमार आणि नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Cyclone Fengal: बंगालच्या उपसागरात तयार झालेले 'फेंगल' चक्रीवादळ बुधवार 27 नोव्हेंबर रोजी तामिळनाडूच्या (Tamilnadu) किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या काळात तामिळनाडूतील कुड्डालोर आणि मायिलादुथुराई या भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) चेन्नईसह अनेक जिल्ह्यांमध्ये यलो आणि रेड अलर्ट जारी केला आहे. चक्रीवादळामुळे किनारी भागात जोरदार वारे, तसेच मुसळध...
पुणे शहर परिसरात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने आज पुणे शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट कोर्स वोकेशनल बोर्ड यांच्या वतीने आयोजित व्यवस्थापन प्रशिक्षणाचे एक वर्षाचे विद्यावेतन थकल्याने या प्रशिक्षणातील 22 विद्यार्थिनींना सातत्याने पायपीट करावी लागत आहे. वोकेशनल बोर्ड आणि संबंधित जनता सहकारी बँक यांच्यामध्ये विद्यावेतनाच्या प्रश्नावरून टोलवाटोलवी सुरू आहे. या प्रश्नी तातडीने न्याय न दिल्यास साखळी उपोषणाचा इशारा विद्यार्थिनींनी दिला आहे.
आयटक सलग्नित महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचे दिनांक 18 व 19 नोव्हेंबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल येथे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
साताऱ्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील विजय गुरव या शिक्षकाला एका विद्यार्थ्यांच्या पालकाने आणि मित्रानी किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली.
गुरुकुल स्कुलच्या अमोल जाधव यांची राष्ट्रीय पॅरा योगासन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून अंध विभागातून राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
सातारा शहरातील नगरपालिकेच्या तीन पडझड झालेल्या शाळांची पालिका अधिकारी व पालकांनी आज पाहणी करून चर्चा केली.
मागील आठवड्यात भरतगाव (ता सातारा) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दोन महिला शिक्षिकांमध्ये मारामारी झाली होती. दोन्ही महिला शिक्षकांनी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीही दाखल केल्या आहेत. या दोन्ही शिक्षिकांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी निलंबन केले आहे.
गुरूकुल प्रायमरी स्कूल शाहुनगर सातारा येथे आमच्या पाल्याचे आर.टी.ई या योजनेअंतर्गत दर्जेदार शिक्षण घेत असून याबाबत आम्ही पुर्ण समाधानी आहोत आमच्या पाल्याचे आर.टी.ई अंतर्गत शिक्षणाच्या बाबत शासनाने पालकत्व स्विकारले आहे.
दिवंगत आईच्या स्मृती जपताना विसापूर, ता. खटाव येथील सावंत कुटुंबीयांनी शाळेला ५१ हजारांची देणगी दिली आहे. त्यांच्या शैक्षणिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे व ते पिल्यावर विद्यार्थी गुरगुल्याशिवाय राहणार नाही, असं म्हटलं जाते. मात्र सर्व सोयींनीयुक्त शाळेची प्रशस्त इमारत असून देखील पुरेशा शिक्षकांच्या अभावामुळे शिक्षणच मिळत नसेल तर त्यांनी काय करायचे व जाब कोणाला विचारायचे, असा प्रश्न खटावच्या पश्चिमेला असलेल्या गादेवाडीच्या ग्रामस्थांना पडला आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांपेक्षा मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढत आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले विद्यार्थ्यांनी उच्चपदावर गवसणी घातल्याचे आपण पाहतो. विलासपूर शाळेचा पट चांगला आहे. या शाळेला भौतिक सुविधा देण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू, अशी ग्वाही युवा नेते संग्राम बर्गे यांनी दिली.
रयत शिक्षण संस्थेचे प्रशासन कर्मवीर आण्णांच्या आचार विचाराना तीलांजली देत प्रवेश फी, दाखल्यांच्या नावाखाली भरमसाठ फी जमा करत, रयतेची दिवसाढवळ्या डोनेशन च्या नावाखाली अक्षरशः लूट करत आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शालेय संस्थांना निवेदन दिले.
नवीन शैक्षणिक वर्ष सन 2022-23 नुकतेच सुरु झाले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा यांचेमार्फत विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे.
तब्बल दोन वर्षाच्या कोरोना च्या कालखंडानंतर बुधवारी सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी सुमारे जिल्ह्यात ठिकाणी उपस्थिती दर्शवून शाळेचा पहिला दिवसाचा आनंद विद्यार्थ्यांनी द्विगुणित केला. शाळेत गुरुजनांनी विद्यार्थ्यांचे पुष्प आणि गोड खाऊ देऊन स्वागत केले.
शिरवडे ता. कराड येथे पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ओंकार दत्तात्रय माने (वय १४) त्याचे नाव आहे. ओंकार ज्योतिर्लिंग विद्यालयात सहावीच्या वर्गात शिकत होता. ओंकार मित्रांसोबत पोहण्यास गेला होता. त्याच्या निधनाची बातमी समजताच शिरवडे गावावर शोककळा पसरली.
राजकारणाच्या मैदानात अल्पावधीतच चुणूक दाखवून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी अशक्यप्राय विजय मिळवून इतिहास घडवला होता. क्रिकेटच्या मैदानातही केवळ २ चेंडूत एका षटकारासह ६ धावा काढून आपल्या आंबेघर संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर सातारा जिल्ह्यात आज ३ हजार ७१३ म्हणजेच ९७.६१ टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यात किती महाविद्यालय सुरू झाली याबाबतची माहिती रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.
वीटभट्टीवर काम करणाऱ्या मुजरांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काटेवाडी, ता. खटाव येथील सर्वोदय सामाजिक संस्थेने आनंदवन बिनभिंतीची शाळा सुरु केली आहे. संत गाडगेबाबाच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पुसेगाव येथील मुलाणी यांच्या वीटभट्टीवर ही शाळा सुरु करण्यात आली आहे. यामुळे वीटभट्टी कामगारांच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळाली आहे.
वडोली-निळेश्वर, ता. कराड येथे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सदस्य निवडीवरून झालेल्या वादावादीचे रूपांतर मारामारीत झाले. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरु असुन आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगीतले.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नगरपालिका शाळा क्र. १० जवळ संरक्षक भिंतीसाठी काढलेल्या खड्यात पडून एका ४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी ८ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास उजेडात आली.
येथील सैनिक स्कूलमधील सात फूट चंदनाचे झाड अज्ञात तीन चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना रविवार, दि. 5 रोजी रात्री दीडच्या सुमारास घडली. याबाबत विरेश कुमार वय 45, रा. सैनिक स्कूल, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर तीन अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. त्यानुसार सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता दि. 1 डिसेंबरपासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तसेच शहरी भागातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा एकनाथ गायकवाड यांनी दिली.
ज्या श्री. छ. प्रतापसिंह हायस्कूलमध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्या शाळेतील शिक्षकांनी तसेच दलित शक्ती केंद्र संर्स्थेतर्फे विविध उपक्रमांच्या माध्यमातून संविधान दिन साजरा झाला. यावेळी विद्यार्थ्यांच्या मनात संविधानाची स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही तत्वे रुजावित यासाठी माहितीपत्रकाच्या माध्यमातून संविधानाची माहितीही देण्यात आली.
आष्टा येथे सोमवार सकाळी साडे आठच्या सुमारास मर्दवाडी रोडवर मिरजवेस कडून एक पिवळ्या रंगाची टाटा मॅजिक कंपनीची स्कुल व्हॅन भरधाव वेगाने पूल संरक्षक दगडाला थटून कॅनॉलमध्ये कोसळल्यामुळे १३ जण जखमी झाले आहेत.
जिजामातानगर, ता. कराड येथील प्राथमिक शाळेत पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करण्याची ऑनलाईन कार्यशाळा संपन्न झाली. टाकाऊ पासून टिकाऊ या पद्धतीचे हे आकाशकंदील विद्यार्थ्यांनी स्वतः घरी तयार केले. यामध्ये सर्व इयत्तांचे सर्व विद्यार्थी ऑनलाईन स्वरूपात सहभागी झाले होते. सदर, कार्यशाळेत बनवलेले आकाशकंदील शाळेत जमा करण्यात आले.
अवघ्या सात विद्यार्थींनीवर येथील करंदीकर वाड्यात सुरू झालेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कन्या शाळेचे शताब्दी वर्ष शुक्रवार दि 22 पासून सुरू होत आहे. यानिमित्ताने महोत्सवाच्या पूर्व दिनी सातार्यात पोवई नाका ते राजवाडा ते कन्या शाळा अशी मशाल फेरी काढण्यात आली. या मशालीचे कन्या शाळा शिक्षक वृंद परिवाराच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नांतून सातारा तालुक्यातील सहा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या नवीन आठ वर्ग खोल्या बांधण्यासाठी निधी मंजूर झाला आहे.
येथील सैनिक स्कूल कै. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून उभे राहिले आहे. या सैनिक स्कूलच्या विकास कामांसाठी राज्य शासनाने 300 कोटींची तरतूद केली आहे. या सैनिक स्कूलचा टप्प्याटप्प्याने विकास करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री यांनी आज सैनिक स्कूलच्या पाहणी दरम्यान सांगितले.
सातारा येथील ऐतिहासिक सैनिक स्कूलच्या अंतर्गत विकास आणि अधिक सुसज्जतेसाठी भरीव निधीची गरज होती. हा प्रश्न आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सुटला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात सातारा सैनिक स्कूलसाठी 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हावासीयांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आभार मानले आहेत.
वाई येथील ब्राह्म समाजाच्या इमारतीत असलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची मुलींची शाळा पाडल्याप्रकरणी वाई न्यायालयाने वाई पोलिसांना ब्राह्म समाजाच्या अध्यक्षा मीनल राजेंद्र साबळे त्यांचे पती राजेंद्र सर्जेराव साबळे व अन्य सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.