सातारा तालुक्यात चार ग्रामपंचायतीसाठी मतमोजणीची प्रक्रिया तहसील कार्यालयात पार पडली. निकाल हाती येताच विजयी उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 133 ग्रामपंचायत पैकी 50 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर 18 ग्रामपंचायती अंशतः बिन विरोध झाल्या आहेत. प्रत्यक्ष निवडणूक 64 ग्रामपंचायतीमध्ये लागली असून थेट सरपंचाच्या 57 पदासाठी 146 जन रिंगणात आहेत. 63 गावातील 380 जागांसाठी 817 उमेदवार रिंगणात असल्याचे ग्रामपंचायत विभागातून सांगण्यात आले.
सातारा जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने 318 पैकी एकहाती 98 ग्रामपंचायती जिकल्या आणि भाजपा सातारा जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष ठरला आहे.
सातारा जिल्ह्यात रविवारी २५९ ग्रामपंचायतीसाठी ९२६ मतदान केंद्रावर सदस्यपदासाठी ३ हजार ८९४ अन सरपंचपदासाठी २४२ जागावर ६४८ जणांमध्ये थेट निवडणुक झाली. यासाठी प्रत्यक्ष मतदान हे ८२ टक्के झाल्याचे ग्रामपंचायत निवडणुक विभागातून सांगण्यात आले.
शाश्वत विकासाच्या नऊ सुत्रावर आधारित ग्रामपंचायत विकास आराखड्याच्या माध्यमातून शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करावीत, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले.
खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बुध ग्राम पंचायतीच्या वतीने बुध स्टॅण्ड परिसर, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, स्मशानभूमी तसेच ईदगाह शाळा व परिसरात २५० झाडे लावून वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.
ग्रामपंचायत स्तरावर पाणीपुरवठा योजनांची लोकवर्गणी जमा करण्यासाठी विशेष अभियान सुरू करावे असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी केले.
सातारा जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराबाहेर निदर्शने करून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यामार्फत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना मागण्यांचे निवेदन पाठवले.
सातारा जिल्ह्यात शिवसेनेने आपली पाळेमुळे खोल रुजवली असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अलीकडील इतिहासात शिवसेनेचे २ संचालक निवडून आले आहेत. हे त्याचेच द्योतक असून भविष्यात विकास सेवा सोसायटी, ग्रामपंचायती, नगरपंचायती, पंचायत समिती, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना धनुष्यबाणाच्या चिन्हावर सामोरे जावा अशा सूचना पर्यटनमंत्री, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिल्या.
खेड ग्रामपंचायतीचे प्रशासक दळवी यांचे नियंत्रणाखाली ग्रामसेवक शंकर माने यांनी खेड ग्रामपंचायतीचे नगरपंचायती मध्ये वर्गीकरण कारणेबाबतचा ठराव एकतर्फी घेतला असून खेड ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे अठरा हजाराच्या आसपास असताना राजकिय दबावापोटी अवघे शंभर नागरिकांना घेऊन सभा पार पाडण्यात आली.
राजकारणात समाजकारणाची आस असणार्र्या लोकांचे कार्य हे शाश्वत विकासाची गंगा निर्माण करणारे असते, असे म्हटल्यास वावगे ठरत नाही आणि असे कार्य हे भावी पिढीसाठी आदर्श निर्माण करते, ही वस्तुस्थिती आहे. अशाच ध्येयवादी धोरणासाठी परिचित असणारे बुधाच्या लोकनियुक्त सरपंचांनी केलेल्या पारेषणमुक्त ग्रामपंचायत या कामाची प्रशंसा आज खटाव तालुक्यात होत आहे.
टाकेवाडी (ता. माण) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरंपचपदाच्या निवडीवर अनपेक्षितपणे राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रदेश चिटणीस दादासो काळे यांनी बाजी मारली. त्यांचे खंदे समर्थक नीलेश अंकुश दडस यांची सरपंचपदी तर सीमा शिवाजी ताटे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली असून, ग्रामपंचायतीवर राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा रोवण्याचे काम दादासो काळेंनी करून दाखवले.
‘सातारा तालुक्यातील भाटमरळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी महिलांना गावचा कारभार करण्याची संधी दिली आहे. सातही जागांवर महिला बिनविरोध झाल्या असून, महिलाराज असलेल्या या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा कायापालट होईल. गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू,’ असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी खराडे, ता. कराड येथील ग्रामपंचायतीने गावातील सार्वजनिक वाचनालयाला चौदाव्या वित्त आयोगातून स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट देऊन वाचन संस्कृतीला बळ दिले आहे.