सातार्यातील प्रतापगंज पेठेत गुरुवारी रात्री आग लागल्याने खळबळ उडाली. सुदैवाने यामध्ये कोणाला दुखापत झाली नसून घरगुती साहित्याचे मात्र नुकसान झाले आहे.
फुकट दारू दिली नाही म्हणून एकाने रात्रीच्यावेळी वाईन शॉप पेटवून दिले. नारायणवाडी (ता. कराड) येथे ही घटना घडली. याप्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंबाटकी घाटामध्ये दत्त मंदीर जवळ दुपारी एक वाजता पुढील जाणारा मालट्रकचा ब्रेकफेल झाल्याने घाटात मागे एम. जी. हेक्टर या महागडया गाड्या घेऊन जात असलेल्या कंटनेरला धडक दिल्याने डिझेल टाकी फुटुन कंटेनरने तत्काळ पेट घेतला. यामध्ये कसलीही जीवित हानी झाली नाही. मात्र यामध्ये एकुण सहा एमजी हेक्टर गाड्या व कपडयाचे रोल तसेच दोन मालगाड्या असे मिळुन अंदाजे दोन ते तीन कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे.
विवाहानंतर फोडलेल्या फटाक्यांमुळे आग भडकली. या आगीत एका गोडाऊनसह दोन दुकाने जळून खाक झाली. कराडातील कोल्हापूर नाका परिसरात असलेल्या जाधव आर्केडमध्ये रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
खंडाळा तालुक्यातील मोर्वे-वाघोशी रस्त्यावर मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद कोंडे हे आपल्या चारचाकी वाहनाने प्रवास करत असताना त्यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. ही घटना मंगळवारी दुपारी सव्वा च्या दरम्यान घडली.
इंदोली येथे मध्यरात्री ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अज्ञातांनी आग लावली. यामध्ये नवा कोरा ट्रॅक्टर जळून खाक झालाय. दरम्यान ही आग कोणी लावली याबाबत उलटसुलट चर्चा सुरुवात झालीय. ऊस दर प्रश्नांवर शेतकरी संघटनांनी गनिमी कावा सुरू केल्याच शेतकऱ्यांमधून बोललं जात आहे.
उत्तरेकडून थंडगार वारे वाहत असल्याने सातारा जिल्ह्यातही याचा परिणाम झाल्याने पारा घसरला आहे. शनिवारी सातारा शहराचे किमान तापमान १३.०२ अंशापर्यंत खाली आले होते. तर महाबळेश्वरचा पाराही १२.०५ अंश नोंदला गेला. यामुळे जिल्ह्यातील गारठ्यात आणखी वाढ झाली असून जागोजागी शेकोट्या पेटल्याचे दिसून येत आहे.
सातारा - लोणंद मार्गावर खाद्याचे साहित्य घेवून जाणाऱ्या ट्रकची धडक महावितरण कंपनीच्या विजेच्या पोलला बसली. त्यामुळे विद्युत प्रवाह ट्रकमध्ये गेल्याने ट्रकने पेट घेतला. या आगीत ट्रकमधील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. स्थानिकांनी लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ही घटना वडूथ ता. सातारा येथे घडली. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.
दुचाकी पेटवल्या प्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सुनेला बाहेर का जातेस, म्हणून घरात डिझेलने पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल भिलार येथे सासू, सासरा व नवऱ्याविरोधात पांचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अदालत वाडा परिसरातील शनिवार पेठेत खळग्या मारुती समोर असणाऱ्या देवधर वाड्याला मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता भीषण आग लागून या वाड्याचे मोठे नुकसान झाले. या आगीमध्ये इलेक्ट्रिक साहित्य तसेच संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. सुदैवाने या आगीमध्ये जीवित हानी झाली नाही. मात्र या वाड्यात राहणाऱ्या देवधर कुटुंबियांचे मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आरेदरे, ता. सातारा येथे शॉर्टसर्किटने आग लागली. या घटनेमध्ये कडब्याच्या गंजी, उकिर्डे, तीन झाडे जळून भस्मसात झाली. त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
सातारा येथील सदर बझार परिसरात असणाऱ्या कांगा कॉलनी येथे एकाने दुचाकी पेटवून दिल्याने ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मलकापूर - नांदलापूर येथील भरवस्तीतील भंगारच्या दुकानाला आज पहाटे अचानक भीषण आग लागली. शेजारीच असलेला टँकरही त्यात पेटला. आगीमध्ये दुकानाचे मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाला तासभर केलेल्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीमध्ये दुकान व साहित्य भस्मसात झाले.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाई वनपरिक्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी वाई ते व्याहळी रस्त्याने गस्त करीत असताना पसरणी गावच्या हद्दीत आळेवाट या ठिकाणी टेम्पो क.एम एच -०८८०७४१ टेम्पोसह जळाऊ लाकडे वन खात्याने ताब्यात घेतली.
चव्हाणवाडी, ता.पाटण येथे एका अज्ञाताने शेतातील बांध जाळण्यासाठी लावलेल्या आगीत १३ गवताच्या गंजी जळून खाक झाल्या. तसेच बाजूला असलेल्या छप्पराला आग लागून त्यात असणाऱ्या म्हशीचाही भाजून मृत्यू झाला. यामध्ये शेतकऱ्याचे तब्बल दोन लाखांचे नुकसान झाले.
नेले, ता.सातारा येथे अज्ञातांकडून दोन एकर खोडवा उसासह ज्वारीच्या कडब्याची गंज जाळण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत अज्ञाताविरोधात तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर संबंधितांवर कडक कारवाईची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
मानवी पार्थिवाच्या दहनासाठी कोट्यावधी वृक्षांची कत्तल होते. याला पर्याय म्हणून झाडांचा पडलेला पालापाचोळा, ऊसाच्या चोयट्या, बगॅस आदी. बायोवेस्टमधून ‘अग्निकाष्ठ’ नावाचे सरपण उपलब्ध करण्यात आले आहे. या सरपणामुळे लाकडाची बचत होणार असून पर्यायाने वृक्षतोड थांबून पर्यावरणाचा र्हास टळणार आहे. यासाठी मानवी पार्थिवाच्या दहनासाठी ‘अग्निकाष्ठ’ सरपण वापरावे, असे आवाहन अग्निकाष्ठ सरण समितीकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
जाखणगाव येथील पट्टावस्ती येथे घराला आग लागून एका महिलेचा भाजून मृत्यू झाल्याची फिर्याद सुनिल नामदेव राऊत (वय ३५ वर्षे) यांनी पुसेगाव पोलीस स्टेशनला दिली आहे.
येथील न्यायालय व बापूजी साळुंखे पुतळा परिसरातील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या वस्तीला शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत १४ घरे जळून खाक झाली होती. या जळीत घरांचे महसुल विभागाच्या वतीने पंचनामे करण्यात आले. यामध्ये यात 14 घरांतील संसारोपयोगी साहीत्य, कपडे, रोख रक्कम व दागिने असे एकुण साडे चौदा लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील कोंडवे येथील पुरातन कालातील असलेल्या गाडे वाड्याला रात्री अचानक आग लागली. या आगीमध्ये वाड्यामधील तीन घरातील घरगुती साहित्य जळून गाडे कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले असून मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.
येथील कृष्णा पुलावर उसाने भरलेल्या बैलगाडीला अचानक आग लागली. ही बाब इतर वाहन चालकांनी बैलगाडी चालकाच्या निदर्शनास आणली. त्यानंतर त्याने तात्काळ बैलांना बैलगाडीपासून वेगळे केल्याने अनर्थ टळला. बुधवार 16 रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, या घटनेने काही काळ पुलावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी ती सुरळीत केली.
कळंत्रेवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत मळी वाहतूक करणाऱ्या टॅंकरने अचानक पेट घेतला. शनिवारी 15 रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे पुढील दुर्घटना टळली. दरम्यान, कराड नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाला पाचारण केल्यानंतर सुमारे तासाभरानंतर ही आग आटोक्यात आली.
सातारा शहरातील तामजाई नगर येथील शिवामृत अपार्टमेंट मध्ये रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका फ्लॅटला भीषण आग लागली. यामध्ये फ्लॅटमधील संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे. विश्वनाथ धनावडे यांच्या मालकीचा हा फ्लॅट असून काल हे कुटुंब गावी गेले आहे.
बनवडी येथील ऊस तोडण्यासाठी सांगली जिल्ह्यातील एका साखर कारखान्याची ऊस तोड मजुरांची टोळी गावात आली आहे. मंगळवारी ऊस तोड मजूर गावातील एका शेतकऱ्याच्या उसाची तोडणी करण्यासाठी गेले होते. या मजुरांपैकी सोमय्या वरवी यांना 11 महिन्याची नंदिनी नावाची मुलगी होती. सोमय्या यांच्या पत्नीने ऊस तोडणी सुरू असताना नंदिनीला झोळीत झोपवून ती फडात गेली.
गेल्या 48 तासांत भारतीय टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये जसे नाट्य रंगते, तसेच नाट्य भारतीय क्रिकेटमध्येही कर्णधारपदावरून रंगले. बीसीसीआयचे उच्च पदस्थ पदाधिकारी आणि निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्यास सांगितले. मात्र, कोहलीने त्याबाबत कोणतेही प्रत्युत्तर न दिल्यामुळे त्याची कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली, अशी चर्चा आहे.
लग्न झाल्यानंतर दुसर्याच वर्षी पत्नीला पेटवून देवून तिचा खून केल्याप्रकरणी राजेश उर्फ राजू गणपत शिंदे (वय 30, रा.खांबील पोकळे ता.महाबळेश्वर) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश मंगला धोटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान, ही घटना 2017 मध्ये घडलेली आहे.
निढळ, ता. खटाव येथील रुग्णाला त्रास जाणवू लागल्याने शेजारील रहिवाश्याने त्यांच्या कडील चारचाकीतून त्या व्यक्तिला पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी दुपारी एक च्या सुमारास आणले. रुग्ण दवाखान्यात गेल्यावर गाडी वळवताना इंजिनजवळील बॅटरीजवळ शॉर्टसर्किट होऊन गॅस किट असलेल्या गाडीने पेट घेतला. या आगीत चारचाकी जळून खाक झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला आज सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. या आगीत होरपळून १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यूमुखी पडलेले सर्वजण ५० ते ८५ वयोगटातील आहेत.
फटाक्यातील कार्बन आणि सल्फर हे विषारी वायूंची क्षेणी तयार करतात. मात्र, ते वनस्पती आणि प्राण्यांसाठी हानिकारक असल्याने मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी शहरात फटाके उडविण्यास प्रतिबंध घालले आहेत.
सातारा जिल्ह्याला सह्याद्रीने वेढले आहे. याबाबत प्रत्येकाचा उर भरुन येतो. सातारा तालुक्यातही अनेक ठिकाणी सह्याद्रीच्या रांगा पाहायला मिळतात. आपल्या तालुक्याला जल, जमीन आणि जंगल ही त्रिवेणी संगम असणारी पर्वणी लाभली आहे. हा त्रिवेणी संगम आपल्याला ऊर्जा देऊन जातो.
वारुंजी फाटा, ता. कराड येथे बेकरीला आग लागल्याची घटना घडली. गुरुवारी 28 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये रोख रक्कम, खाऊचे पदार्थ व फर्निचर असे सुमारे 7 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी गाडीला अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यामुळे यामध्ये संपूर्ण गाडी जळून खाक झाली. ही घटना पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यानजीक रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली. यामध्ये कसलीही सुदेवाने जीवित हानी झाली नाही.
माजगाव (ता. पाटण) येथे पती-पत्नीच्या घरगुती भांडणातून पतीने स्वतःचे घर पेटविल्याने शेजारील नऊ घरांना भीषण आग लागली. ही घटना सायंकाळी घडली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने दहा घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, दागिने, रोख रक्कम, शेतीची औजारे जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
सातारा येथील हुतात्मा स्मारक परिसरात असलेल्या अग्निशमन दल व घंटागाड्या सातारा नगरपालिकेच्या प्रशासनाने तात्काळ हलविण्यात याव्यात अन्यथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तिरंगा विकास प्रतिष्ठानच्या प्रमुख हर्षदा शेडगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
मुंबईहून कोल्हापूर याठिकाणी 24 हजार लिटर पेट्रोल-डिझेल भरून निघालेल्या टँकरचे पाठीमागील टायर फुटून लागलेल्या आगीमध्ये टँकरचे साधारणपणे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना तातडीने आग नियंत्रणात आणण्यासाठी पावले टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्याच्या यंत्रणेला देखील त्यांनी निर्देश दिले आहेत. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत. पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून अजित पवार यांनी घटनेची संपूर्ण माहिती घेतली आहे. तातडीची वैद्यकीय मदत व अन्य साह्य करण्याच्या सूचन
माण तालुक्यातील राणंद गावातील शिवाजीनगरमध्ये घरातील विजेच्या शॉर्ट सर्किटने आग लागून दोन घरे जळून खाक झाली आहेत. रात्री साडेनऊच्या सुमारास ही आग लागली होती. आग लागल्याचे समजताच गावातील नागरिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. मात्र, घरात गॅस सिलिंडर असल्याने त्या ठिकाणी वातावरण भयभीत झाले होते.
वाई तालुक्यातील जोशी विहीर येथे चार चाकी जळून खाक झाली.