सदानंद दादोबा काशीद हे जखमी झाले आहेत. त्यांची पत्नी सुनीता सदानंद काशीद, त्यांचा भाऊ चंद्रकांत दादाबो काशीद, मेव्हणा अशोक नामदेव सुर्यवंशी आणि बदली गाडी चालक योगेश कदम हे जागीच ठार झाले आहेत.
हे जळजळ कमी करण्यात, पेशींची वाढ आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. व्हिटॅमिन डी ची कमी पातळी ऑस्टिओपोरोसिस, मधुमेह, हृदयरोग आणि काही प्रकारच्या कर्करोगासह अनेक रोगांमध्ये वाढ करू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 पदार्थांबद्दल सांगणार आहोत.
देशातील उद्योगपतींची अब्जो रूपयांची वीज थकबाकी असताना त्यांना महावितरण अभय देत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या व देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याची वीज तोडणी करण्याचा सपाटा सातारा जिल्ह्यातील मुजोर महावितरण अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे.
अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाने अत्याचार करत तिचा खून केला. त्यानंतर मुलाच्या आईने त्यास मदत केल्याप्रकरणी नेर, ता. खटाव येथील सविता निलेश काशिद वय ३४ या महिलेला वडूज येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने ४ वर्षे साधी कैद व १ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली.
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. यावेळी उदयनराजे यांनी मुर्मू यांना सातारा भेटीचे आमंत्रण दिले.
शरीरात व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात आणि ते पोकळ होऊ लागतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या शरीराला प्रत्येक जीवनसत्व आवश्यक आहे. ज्यामुळे तज्ज्ञ देखील आपल्याला हेल्दी फूड खाण्याचा सल्ला देतात. परंतु या सगळ्यात शरीरासाठी जास्त गरजेचं आहे. ते म्हणजे व्हिटॅमिन डी. कारण, व्हिटॅमिन-डी तुमच्या शरीरासोबतच मेंदूसाठीही खूप महत्त्वाचे आहे.
दोन वर्षापूर्वी कोरोनामुळे झालेला लॉकडाउन यामुळे बांधकाम क्षेत्र अडचणीत आलेले आहे. त्यातच रशिया- युक्रेन युद्धामुळे आता कंबरडे मोडण्याची वेळ बांधकाम व्यावसायिकांवर आली आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कुठे बंद कामांना सुरुवात झाली असताना युद्धामुळे भयानक दरवाढीचे संकट कोसळले आहे.
मायणी - विटा मार्गावर दुचाकीस्वाराचा अपघात होऊन झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला.
येथील नगरपालिका संचालित जीवनधारा कोविड सेंटर ची विनाकारण बदनामी केली जात आहे. ती थांबवावी, अशी मागणी करणारे निवेदन विटा नगरपालिकेच्या नगरसेवकांनी प्रातांधिकारी संतोष भोर यांना निवेदन दिले आहे. प्रसिद्ध दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व तालुका प्रशासनाच्या आग्रहामुळे तालुका व विटा शहरातील कोविड रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था व्हावी. यासाठी ...
आळसंद तलावातून विटा शहरासह आळसंद , खंबाळे गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत आहे. सध्या तलावातील पाणी साठा खालावला आहे. ताकारी योजनेतून आळसंद तलावात भरण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार अनिल बाबर यांनी सांगितले. आळसंद ( ता.खानापूर ) येथील आळसंद तलावातील पाणीसाठा कमालीचा खालावला आहे. त्या पार्श्वभूमीवर ते पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. आम...
‘आई-वडील मुलांना चांगले संस्कार आणि शिक्षण देत असतात. शिक्षणामुळे जीवनात गती प्राप्त होते. प्रतिकूल परिस्थितीत मुलांना चांगले शिक्षण देऊन सुसंस्कारित केलेल्या आईच्या स्मृती जपण्याचे मुलाणी कुटुंबाचे काम नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल,’ असे प्रतिपादन औंधचे सपोनि उत्तमराव भापकर यांनी केले.
शिवगान स्पर्धेमुळे, शिवरायांच्या शौर्य, ध्यर्य, पराक्रम, बुद्धिचातुर्य, स्वयंशिस्त आदी गुणांचा प्रसार होऊन ते अंगीकारण्याची जाणीव जागृती झाली आहे. आगामी काळात शिवगान स्पर्धा अधिक व्यापक पद्धतीने आयोजित करण्यात आमचे नेहमीच सहकार्य राहील. तसेच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज एकमेवाद्वितीय राजे होते. त्यांच्या राज्यशैलीचे अनुकरण केल्यास भारत देश महासत्ता बनेल,’ असा आशावाद खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवरायांचा इतिहास उजेडात आणण्याबरोबरच त्यांचा मानवी कल्याणाचा विचार महात्मा जोतिराव फुल्यांनी महाराष्ट्राच्या मातीत रुजवला. रायगडावरील छत्रपतींची समाधी शोधून जगातील पहिली जयंती त्यांनी साजरी केली. शिवरायांवरील पहिला पोवाडाही म. फुल्यांनी लिहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्र लिहिताना पत्राची सुरुवात जयशिवराय या शब्दाने करत असत. त्यामुळे छ. शिवराय समजून घ्यायचे असतील तर म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधी वाचले पाहिजेत,’ असे प्रतिपादन साहित्यिक अरुण जावळे यांनी केले.
विटा : मानसिंग को ऑप बँकेचा फाऊंडेशन डे साजरा करण्यात आला, फाऊंडेशन डे निमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी काही ना काही तरी सामाजिक कार्य करण्यात येते यावेळी दुधोंडी येथील स्मशानभूमीची स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले होते, यावेळी स्मशानभूमीची स्वच्छता करून जी गतवर्षी वृक्षारोपण केले होते त्याची स्वच्छता करून त्या वृक्षांना लागवड सोडून मान्यवरांच्या हस्ते पाणी घ...
विटा : येथील प्रतिथयश डॉ. विलासराव महादेव साळुंखे (वय ७७) यांचे निधन झाले. शिवप्रताप उद्योग समूहाचे अध्यक्ष, नॅशनल गोल्ड अॅन्ड सिल्व्हर रिफायनरी असोसिएशन चे अध्यक्ष प्रतापराव साळुंखे यांचे बंधू होत. त्यांच्यामागे पत्नी एक मुलगा, मुलगी , सुना , नातवंडे व तीन भाऊ असा परिवार आहे. शिवप्रताप को - आॅप मल्टीस्टेट पतसंस्थेच्या निर्मिती मध्ये त्यांचा महत्त्वपुर्ण सहभाग होता. सामाजिक कार...
खानापूर तालुक्यात गेली दोन तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी , कमळापूर (ता.खानापूर ) येथील येथील रामापूर - कमळापूर या दोन गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे.
स्वच्छतेतील सन्मानासाठी देशातील निवडलेल्या ४२ शहरामध्ये विटा शहराची निवड झाली आणि हरएक विटेकरांनी स्वच्छतेसाठी केलेल्या कष्टाचे चीज झाले. शहरात स्वच्छतेची गतीमान लोकचळवळ उभा करण्यात आम्ही यशस्वी झालो. सलग तीन वर्षे विटेकरांनी स्वच्छता हा संस्कार बनवत प्रत्येकाने या स्वच्छतेच्या चळवळीत बहुमोल योगदान दिले आहे. विटा शहराचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा होणार सन्मान हरएक विटेकर नागरिकाचा गौरव आहे. - सौ. प्रतिभा वैभव पाटील, नगराध्यक्षा, नगरपरिषद विटा