मानवी पार्थिवाच्या दहनासाठी कोट्यावधी वृक्षांची कत्तल होते. याला पर्याय म्हणून झाडांचा पडलेला पालापाचोळा, ऊसाच्या चोयट्या, बगॅस आदी. बायोवेस्टमधून ‘अग्निकाष्ठ’ नावाचे सरपण उपलब्ध करण्यात आले आहे. या सरपणामुळे लाकडाची बचत होणार असून पर्यायाने वृक्षतोड थांबून पर्यावरणाचा र्हास टळणार आहे. यासाठी मानवी पार्थिवाच्या दहनासाठी ‘अग्निकाष्ठ’ सरपण वापरावे, असे आवाहन अग्निकाष्ठ सरण समितीकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!