कोयना धरणाचे बॅक वाटर असणाऱ्या शिवसागर जलाशयातून जीवघेणा प्रवास करणाऱ्या शाळकरी मुलांची विदारक परिस्थिती समोर आल्यानंतर महिला आयोगासह न्यायालयही अलर्ट झाले. तथापि, शासनस्तरावर सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने अंमलबजावणी झाली नाही. सातारचे सामाजिक कार्यात निस्वार्थपणे अग्रेसर असणारे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी मात्र उत्तम दर्जाचे सेफ्टी लाईफ जॅकेट प्रत्यक्ष त्या मुलांच्या शाळेत जाऊन त्यांना भेट दिले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!