ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात इम्पिरीकल डेटा केंद्र शासनाने द्यावयाचा आहे, असे सांगण्यात महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्ष घालवली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचा त्यांचा डाव होता. विशेषतः यामध्ये महाआघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी आघाडीवर होता, अशी घणाघाती टीका आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत केली.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!