terribleaccidentofwarkaris

esahas.com

वारकर्‍यांच्या दिंडीचा भीषण अपघात

आळंदी येथील संजीवन समाधी सोहळ्यासाठी येत असलेल्या पायी पालखीच्या दिंडीत एक टेम्पो घुसल्याने झालेल्या अपघातात 30 वारकरी जखमी झाले. ही घटना जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील मावळ तालुक्यातील साते फाटा येथे आज (दि.२७) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दोन महिला वारकर्‍यांचा मृत्यु झाला आहे. तर 30 जण जखमी झाले आहेत.