ओबीसीमधून राज्यातील मराठा समाजबांधवाना सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या धारदार लढाईला सातारा जिल्ह्यातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने सातारा जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंदला जिल्ह्यातून अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!