‘कोरोनामुक्ती’मध्ये आपल्याला चांगले यश मिळत आहे. सातारा जिल्ह्याने आठ हजार पेक्षा जास्त रुग्णांना बरे केले आहे. देशात हा विचार केला तर 28 लाखांचा टप्पा आपण गाठला आहे.आपल्या महाराष्ट्रात तब्बल सहा लाख रुग्ण बरे झाले आहेत. संपूर्ण चित्र दिलासादायक आहे. आता गाफीलपणा बाळगू नये, सर्व प्रकारची काळजी घ्यावी,’ असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी एका पत्रकाद्वारे केले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!