soiltestingisaneedofthehourtoincreaseproductivity

esahas.com

उत्पादन वाढीसाठी माती परीक्षण ही काळाची गरज 

‘वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नाची गरज वाढली आहे. ती पूर्ण करण्यासाठी शेतकरी मर्यादेपेक्षा जास्त रासायनिक खतांचा वापर करत आहेत. त्यामुळे जमीन नापीक होत चालली आहे. मातीतील मूलद्रव्यांचे प्रमाण कमी झाल्याने मातीचा कस कमी होत चालला आहे. मातीत मीठ फुटण्याचे प्रकार घडतात, मातीची उगवण क्षमता, मातीचा कस, उत्पादन क्षमता कमी होतेय त्यामुळे माती परीक्षण ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन रत्नाई कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी अक्षय सत्रे याने केले.