तामिळनाडू मधील कृष्णगिरी जिल्ह्यतील तल्ली येथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम रविवार, दि. 22 फेब्रुवारी रोजी प्रतिमेची मिरवणूक करून साजरी करण्यात येणार आहे.
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वाई येथे शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शिवप्रेम केवळ एकदोन दिवसांपुरते न दाखवता शिवरायांचे आचार, विचार आणि त्यांनी अनेकविध प्रसंगांमधून दिलेले लाखमोलाचे संदेश नित्य जोपासणाऱ्या निसर्गसेवक मावळ्यांनी आगशिवगडावर हरित व निसर्गवर्धक शिवजयंती साजरी केली.
कराड शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या निर्बंधांमुळे गेली दोन वर्षे शिवप्रेमी, दुर्गप्रेमी, नागरिकांना शिवजयंती उत्सव साजरा करता आला नव्हता. परंतु, यावर्षी कोरोना संसर्ग कमी झाल्याने शासनाने काही प्रमाणात निर्बंध शिथिल केल्याने लोकांमध्ये शिवजयंतीचा उत्साह दिसून आला.
छत्रपती शिवरायांचा इतिहास उजेडात आणण्याबरोबरच त्यांचा मानवी कल्याणाचा विचार महात्मा जोतिराव फुल्यांनी महाराष्ट्राच्या मातीत रुजवला. रायगडावरील छत्रपतींची समाधी शोधून जगातील पहिली जयंती त्यांनी साजरी केली. शिवरायांवरील पहिला पोवाडाही म. फुल्यांनी लिहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्र लिहिताना पत्राची सुरुवात जयशिवराय या शब्दाने करत असत. त्यामुळे छ. शिवराय समजून घ्यायचे असतील तर म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधी वाचले पाहिजेत,’ असे प्रतिपादन साहित्यिक अरुण जावळे यांनी केले.
महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
वरकुटे येथे युवाराजे युवक मंडळाच्या वतीने शिवजयंती कोरोनाच्या सावटाखाली मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
गडकरी आळी येथील जय भवानी विकास मंडळ व शिवगणेश ग्रुपमार्फत शिवजयंतीचे औचित्य साधून कोरोना महामारीच्या या काळामध्ये खर्या अर्थाने ज्यांनी मोलाची कामगिरी बजावली अशा कोरोना योद्ध्यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी मंडळातील युवकांचे कार्य आदर्शवत असल्याचे सपोनि विशाल वायकर यांनी सांगितले.
माण तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तालुक्यातील मुख्य शहर असणार्या दहिवडी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली आकर्षक मूर्ती, अतिभव्य व्यासपीठ, डोळे दिपवणारी होते. फटाक्यांची आतषबाजी व शिवभक्तांचा अलोट उत्साह अशा जबरदस्त वातावरणात दहिवडी व परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी झाली.
प्रतिवर्षाप्रमाणे निमसोड येथे सोनारसिद्ध नवरात्र उत्सव मंडळ व शिवगर्जना प्रतिष्ठान निमसोड यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
कोरोना विषाणूचे सावट आज सर्वच ठिकाणी दिसून येत आहे. शिवजयंती सारखा उत्सव ही त्याला अपवाद कसा ठरेल. खटाव परिसरात आज शिवजयंती उत्सव कोरोना सावटाखाली पण उत्साहात साजरा झाला.
‘छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुभाव या तत्त्वांवर उभे होते आणि म्हणूनच जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी शिवइतिहास कोरला गेला,’ असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले.