मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला शंभर रुपयांमध्ये एक किलो पामतेल, एक किलो साखर, एक किलो रवा आणि एक किलो डाळ असा शिधा संच 100 रुपयात देण्याची योजना जाहीर केली होती.
पन्नास खोके... या सरकारचं करायचे काय... शिंदे सरकार हाय हाय...शेतक-यांना दिलासा देत नाय.. अशा घोषणा देत खटाव तालुक्यातील वडूज येथे शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आलं. शिवसैनिकांनी वडूज तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुजलेल्या शेतातील पिकाचे तोरण बांधून सरकारचा निषेध नोंदवला.
गेल्या अडीच वर्षात एकही निर्णय शिवसैनिकाच्या न्यायासाठी झाला नाही. राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर युती करून सरकार स्थापन केले. त्यांनी शिवसेना खाऊन टाकली. शिवसेना पक्ष संपवण्यासाठीच या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कामे केली असल्याची टीका राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केली.
शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारल्याने महाविकास आघाडीत शिवसेनेची अडचण झाली आहे. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. ठाकरे सरकार अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे.
सरकार सर्वसामान्य लोकांसाठी, तसेच त्यांचा विकास करण्यासाठी असते. महाराष्ट्राचा विकास गतीने होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंत्री प्रयत्न करत आहेत. सरकार म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्र्यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोचवून शिवसैनिकांनी पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
२०१८ ते २०२१ या कालावधीमध्ये सातारा तालुका वन विभागातील वनरक्षकका पासुन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा केला आहे. त्याबाबत माहिती अधिकाराखाली माहिती मागवली असता ती अपूर्ण स्वरूपात दिली जात असल्याच्या निषेधार्थ शिवसेना सातारा विधानसभा यांच्यावतीने आज सातारा येथील वनभवन येथे गांधीगिरी आंदोलन करत अधिकाऱ्यांना गुलाब पुष्प दिले.
एसटी बसेसवर होणाऱ्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर खटाव तालुका शिवसैनिकांच्या संरक्षणात पुसेगावातून पहिली एसटी रवाना करण्यात आली. उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव आणि सहकाऱ्यांनी एसटीवर दगडफेक कराल तर गाठ शिवसैनिकांशी आहे, असा इशाराही समाजकंटकांना दिला आहे.
सांगली शहरामध्ये शिवसेनेच्या पुढाकाराने सांगली- मिरज मार्गावर एसटी बसेस धावल्या. शहरी वाहतूकीच्या प्रवासी बस आगारातून बाहेर पडल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. बस रोखून दाखवा जशास तसे उत्तर देवू, असे आव्हान पदाधिकाऱ्यांनी केले.