राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्रातील ललित पाटील ड्रग्स प्रकरणातील नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टी चे प्रदेश सदस्य तुषार मोतलिंग यांनी केली आहे.
यशोधन संस्थेने वृद्ध व निराधार लोकांना चांगला आधार दिला असून हे रचनात्मक काम समाजासाठी दिशादर्शक आहे. ज्येष्ठ नागरिकांना लागू असणार्या योजनांचे लाभ यशोधन पर्यंत पोहचवू, असे प्रतिपादन उत्पादन शुल्क मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एकही आमदार नाराज नाही. उलट राष्ट्रवादीकडील काही मंडळी आमच्या संपर्कात असून, त्यांना अडविण्यासाठी जयंत पाटील असे वक्तव्य करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आजपर्यंत झाला नाही, असा प्रचंड दसरा मेळावा होईल, असा टोला उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला.
सातारा येथील प्रस्तावित मेडिकल कॉलेज साठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा प्रकल्प मोठा असल्यामुळे त्यामध्ये काय- काय अंतर्भूत करायचे आहे. यामध्ये वेळ गेल्यामुळे हे काम रेंगाळले होते.
मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी बुधवारी सातारा शहरात फेरफटका मारुन पोलीस बंदोबस्ताची पाहणी केली. यावेळी व्यवसायिकांशी चर्चाही त्यांनी केली.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न राहणार असून जिल्ह्याच्या विकासाची परंपरा अधिक वृद्धींगत करणार असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा दिल्ली दौरा केला. महाराष्ट्रात जे सत्तांतर झाले आणि विकास कामांची जी आव्हाने आहेत. त्याकरिता त्यांनी नीती आयोगाकडे प्राधान्य क्रमाने करावयाच्या कामांसाठी अठरा हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले शंभुराज देसाई यांनी गुवाहाटीमध्ये बसून सातारा जिल्ह्यातील सुत्रे हलवत असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी आपला कारखाना बिनविरोध करून दाखवला आहे.
सत्ता आणि पदे मिळूनही शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या शंभूराज देसाई यांच्या विरोधात त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला विश्वासाने मंत्रिपद दिले, त्यांच्याकडे बोट दाखवता आणि तुम्ही काय करता ? मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून अडीच वर्षात किती वेळा तोंड दाखवले ? असे उघड सवाल मतदारांकडून त्यांना केले जात आहेत.
जिल्ह्यातील डोंगरी भागात जास्त पाऊस होतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने त्यांचे तात्पुरते स्थलांतर शाळांमध्ये करा. याबरोबरच सर्व विभागांनी संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
सातारा जिल्हा शांतताप्रिय असून आज दिवसभरात जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. ज्यांना अशांतता निर्माण करण्याचे काम करायचे होते त्यात त्यांना यश आले नाही अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस सातारा स्थानिक गुन्हे शाखा, सातारा तालुका पोलीस, सातारा शहर पोलीसांनी तपास करुन तातडीने अटक केली. त्याबद्दल या तिन्ही पोलीस पथकास गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज त्यांच्या निवासस्थानी बोलावून त्यांचे विशेष कौतुक केले.
विद्यार्थींनींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयुट ऑफ सायन्स व छत्रपती शिवाजी महाविद्यालय परिसराला अचानक भेट देऊन पाहणी करुन सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थीनींशी संवाद साधला.
राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे तत्पर व धाडसी तसेच तातडीने मदतीला धावून जाणारे मंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. मग तो प्रसंग कोणताही असो. अडचणीच्या काळी ना.शंभूराज देसाई हे मदतीला नेहमी धावून जातात याचा अनेकदा प्रत्यय आला असून असाच अपघाताचा प्रसंग काल मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली येथे घडला.
पळसावडे, ता. सातारा येथील माजी सरपंच रामचंद्र जानकर याने गर्भवती महिला वनरक्षकाला केलेली मारहाणीची घटना ही अमानवीय अशीच आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, राज्याचे गृह विभाग आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई भाष्य करायला तयार नाहीत. त्यावरुन ते आपली जबाबदारी झटकत आहेत, हे स्पष्ट होत असून याप्रकरणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राजीनामा द्यावा
मंगळवारी मंत्री शंभूराज देसाई हे या बंगल्यात काही कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत बसले असताना या बंगल्याच्या आवारात हा बिबट्या आला. त्यानंतर लोकांनी आरडा- ओरडा केल्यानंतर या बिबट्याने त्या ठिकाणावरून धूम ठोकली. मंत्री शंभूराज देसाई हे स्वतः निवासस्थानाच्या शेजारील लाॅनवरती असताना बिबट्याचा निवासस्थानी वावर होता.
राज्यातील काही शहरांमध्ये काल आणि आज काही लोकांनी एकत्र येऊन, जमाव जमवून आज दगडफेक करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे प्रकार केले. कालपासूनच मी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी कायदा हातात घेतला त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
तालुक्यामध्ये गावा-गावांत असलेल्या निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकारमध्ये मानाचं स्थान मिळाले असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.
महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प हे शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थीनी व महिला यांना स्वसंरक्षण करण्यासाठी व त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपयोगी ठरतील, असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी केले.