सातारा जिल्ह्यातील रेशन दुकानदारांच्या विविध मागण्यांना वाचा फोडण्यासाठी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ यांच्या वतीने एक डिसेंबर 2023 रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
लक्ष्मी देवीचे घरी आगमन व्हावे म्हणुन वसुबारस या दिवशी सातारा जिल्ह्यात सुवासिनीनी गाय-वासराची हळद कुंकू वाहत पुजा केली.
सातारा जिल्ह्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाचा अनुशेष प्रचंड असून फलटण, उत्तर कोरेगाव, सातारा, माण-खटाव या तालुक्यांमध्ये पाऊस नसल्यामुळे पाण्याची भीषण परिस्थिती आहे.
ओबीसीमधून राज्यातील मराठा समाजबांधवाना सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या धारदार लढाईला सातारा जिल्ह्यातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने सातारा जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंदला जिल्ह्यातून अत्यावश्यक सेवा वगळता शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी शांततेत धरणे धरणाऱ्या मराठा आदोलकांवर पोलिसांनी जालना जिल्ह्यात लाठी हल्ला केला. त्याप्रकरणी अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहे. त्याविरोधात आज मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्याला कराडमध्ये सकाळच्या टप्प्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्पर्तीने दुकाने व्यव...
सातारा जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांनी स्वतः ची 4 अपत्ये असताना त्यांची माहिती शासनाकडे लपवून ठेवेल्याची तक्रार सामजिक कार्यकर्ते तसेच युवा राज्य फौडेशनचे संस्थापक अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांनी आरोग्य सेवा उपसंचालक यांच्याकडे केली आहे.
मंगेश जंगम यांचे सोबत विवाहास घरच्यांचा विरोध होता म्हणुन पहिला असफल आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता . मंगेश जंगम यांना सोडचिठ्ठी न देता त्यांनी देसाई नामक व्यक्तीशी दुसरा विवाह केला त्या विवाहाच्या वेळी अश्वीनी जंगम यांनी खोटे अँफिडेव्हीट कोर्टा समोर सादर केले , त्यानंतर त्यांची मुलगी एका मुलाबरोबर पळुन गेल्या नंतर दुसऱ्यांदा त्यांनी आत्महत्येचा प्रयल केला होता .
सातारा जिल्ह्यामध्ये बुधवारी वाई, खंडाळा, भुईंज तसेच सातारा तालुक्यातील लिंब, नागठाणे, खिंडवाडी येथे महामार्ग परिसरात सुमारे अर्धा ते पाऊण तास जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे सातारकरांची मात्र चांगलीच पळापळ झाली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या छत्रपतींच्या राजधानीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचै शिलेदार युवराज पवार हे तसे पाहायला गेले तर मितभाषी व्यक्तिमत्व. मात्र याच व्यक्तिमत्त्वाने राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या जबाबदारीची जाण ठेवून सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोपट्याचा वटवृक्ष करून दाखवण्याची किमया केली आहे.
पुणे विभागीय महसूल सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या नेतृत्वाखालील सातारा संघाने सांस्कृतिक गटात विजतेपद पटकावले आहे.
सातारा जिल्ह्यातील सुमारे 2000 खत विक्रेत्यांनी मंगळवारी काम बंद आंदोलन करून जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले.
नागरिकांनी वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर 24 तास राहणार आहे. काही तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांक वर संपर्क साधावा, असे आवाहन सातारा वीज वितरण विभागाची अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांनी केले आहे.
संघटीत गुन्हेगारी अंतर्गत (मोक्का) पोलिसांना पाहिजे असणारा संशयित आरोपी महेश तपासे सातारा जिल्हा न्यायालयात शरण आला आहे. यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी सातारा कारागृहात (जेल) केली असून लवकर पोलिस ताबा घेण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्ह्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार आहोत, असा इशारा भाजपाचे आ. नितेश राणे यांनी दिला. दरम्यान, राज्यात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
सातारा नेव्हल वेटरन्स असोसिएशनच्या माध्यमातून रविवार दिनांक 11 डिसेंबर रोजी नौसेना दिन साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील निवृत्त 80 वयोवृद्ध नौसैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती निवृत्त नौसेना संघटनेचे प्रतिनिधी माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, अश्फाक पटेल, आप्पा पडवळ, वसंत नलावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर, बावधन, खटाव, जावळी, कराड, पाटण या तालुक्यातील शेतकऱ्यांना हळद बियाणे विदर्भ ऍग्रो कंपनीने पुरवले व त्याचा निघालेला माल कच्चा व पक्का खरेदी करून शेतकऱ्यांना त्या खरेदीच्या रकमांचे चेक दिले. या व्यवहारांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार शेतकरी संघटना व किसान मंचचे कार्याध्यक्ष शंकराव गोडसे यांनी जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांच्याकडे केली आहे.
सातारा जिल्ह्यात येणार्या विधानसभा लोकसभा.नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचार विनिमय करण्यासाठी आणि पदाधिकार्यांची नियुक्ती देण्याकरता सातारा शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख मान्यवर प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव भाऊसाहेब वाघ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी संजय माने यांनी येणार्या विधानसभा लोकसभा नगरपालिका निवडणुकीवर चर्चा करत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
येथील गुन्हेगारीला आळा बसवून सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. टीम वर्क हे जिल्हा पोलीस दलाचे वैशिष्ट आहे. ते कायम असेच राहावे, असे मत तत्कालीन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी व्यक्त केले.
राजेंद्र राजपुरे यांनी महाबळेश्वर तालुक्यात बँकेच्या माध्यमातून समाजकारणात व राजकारणात झोकून देऊन काम केले आहे. डोंगराळ व दुर्गम महाबळेश्वर तालुक्याचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. महाबळेश्वरला पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या.
सातारा जिल्हा रुग्णालयाच्या सार्वजनिक स्वच्छते संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही मदत मिळत नाही. गेल्या दहा महिन्यांमध्ये चौदा वेळा पत्रव्यवहार करूनही कोणतीही हालचाल झाली नाही.
सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुरू असणार्या सभासद नोंदणीस आबालवृद्धांसह महिलांनीही प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केलेल्या शिवसेना जिल्हाध्यक्षपदी पुरुषोत्तम जाधव यांची वर्णी लागली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई व कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 72 वी वार्षिक साधारण सभा शनिवार दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता बँकेचे मुख्य कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत येथील यशवंतराव चव्हाण सभागृहांत होणार आहे.
गेली दोन वर्षे करोना आजाराच्या त्रासामुळे राज्यातीलच नव्हे तर सर्व देशातील सण उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांना मोठी अडचण होती. मात्र यावर्षी सर्वच निर्बंध शिथिल झाल्यानंतर यावर्षीची जन्माष्टमी गुरुवारी मोठ्या उत्साहात संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली.
देशातील नऊ राज्यात आता आम आदमी पार्टीने लक्ष केंद्रित केले असून त्यात महाराष्ट्र राज्य आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व निवडणुका आम आदमी पार्टी स्वबळावर आणि ताकदीने लढवणार असल्याची माहिती आप चे महाराष्ट्र संघटन मंत्री विजय कुंभार आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त बँकेचे अध्यक्ष नितिन पाटील यांच्या हस्ते आणि उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालिका सौ. कांचन साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, विविध विभागांचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक तसेच मुख्य कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व सेवक वर्ग यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण उत्साहपूर्ण वातावरणात झाले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ‘एका दशकातील सतत सर्वोत्कृष्ट कामगिरी’बद्दल केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या शुभ हस्ते तसेच सहकार राज्यमंत्री ना. बी.एल. वर्मा, भारतीय रिझर्व्ह बँक आणि नाबार्डचे प्रतिनिधी तसेच इतर मान्यवर यांचे प्रमुख उपस्थितीत ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे स्वागत मंत्री शंभूराज देसाई यांनी सारोळा ब्रिज, शिरवळ जि. सातारा येथे पुष्पगुच्छ देऊन केले. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या आगमनावेळी जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस दलाकडून मुख्यमंत्री महोदयांना मानवंदना देण्यात आली.
भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण राज्यभर आजादी गौरव पदयात्रेचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आजादी गौरव यात्रा निघणार आहे .
केंद्रातील भाजप सरकार सूडबुद्धीने काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांना चौकशीच्या नावाखाली आज 26 जुलै रोजी ईडी कार्यालयात पुन्हा दुसऱ्या वेळी बोलावून त्रास देण्याचा व पोलीसिबल वापरून दडपशाही करणाऱ्या केंद्र सरकार विरोधात सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी, तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज निषेध मोर्चा आंदोलन करण्यात आले.
सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे माझे खरोखर भाग्य आहे. सातारा जिल्हा ऐतिहासिक दृष्ट्या आणि पर्यटनदृष्ट्या अत्यंत समृद्ध आहे. सातारा जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्नांचा अभ्यास करून ते प्रश्न सोडवण्याचा आणि त्यासाठी लागणाऱ्या अंमलबजावणीचा माझा पुरेपूर प्रयत्न असेलम, अशी ठाम ग्वाही सातारा जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मानवता हीच ईश्वर सेवा, या उक्तीचा तंतोतंत अनुभव म्हणजे, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील वेळे गावच्या हाद्दीतील ’यशोधन अनाथ आश्रम’ रवि बोडके या फलटण तालुक्यातील माणुसकीच्या हट्टासाठी झपाटलेल्या माणसाचे तरुणाईतील कर्तृत्व भारारून टाकणारे आहे.
जिल्ह्यातील मुस्लीम समाजबांधवांनी आषाढी एकादशी दिवशीच आलेल्या बकरा ईद या पारंपारिक सणाला फाटा देत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला आहे. त्यांच्या या सौहार्द्रतेचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी जयकुमार शिंदे यांची भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीने होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला चांगलाच फायदा होणार आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. याचबरोबर सातारा जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पश्चिम भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर, पुर्वेकडे पावसाने पाठ फिरवली आहे. असे असतानाही ऐन पावसाळ्यात माण, वाई, पाटण, जावली, सातारा व कराड तालुक्यातील 16 गावे व 39 वाड्यावस्त्यांमध्ये पाणी टंचाई जाणवत आहे.
सातारा शहराजवळील आणि कास पठाराचे सानिध्य लाभलेला देशातील सर्वात उंच असलेला भांबवली वजराई धबधबा पुन्हा एकदा फेसाळून कोसळू लागला आहे. सकाळी सातारा शहरासह जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने थोडी उघडीप दिली तरी पश्चिम भागात मात्र दिवसभर पावसाने जोर पकडला होता.
सातारा जिल्ह्यातील कमी अतिवृष्टीच्या कार्यक्षेत्रातील कराड, फलटण, वाई, रहिमतपूर आणि म्हसवड अशा पाच नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठया आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात मंगळवारी आगमन झाले. पालखीचे साताऱ्यात आगमन होत असताना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना नीरा नदीपात्रात दत्त घाट येथे स्नान घालण्यात आले. नंतर पालखी लोणंदच्या बाजार तळाकडे रवाना झाली.
सातारा जिल्ह्यातून तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
‘अग्निपथ’ या केंद्र शासनाच्या योजनेवरुन काही राज्यात उद्रेक निर्माण झाल्याने सातारा जिल्ह्यातील सोशल मिडीया पोलिसांच्या रडारवर आला आहे. कायदा व सुव्यवस्था निर्माण होतील असे मेसेज फॉरवर्ड करु नयेत. अन्यथा संबंधित व्यक्ती व ग्रुप ऍडमिनवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. दरम्यान, सर्वांनी शांतता राखावी, असे आवाहन एसपी अजयकुमार बन्सल यांनी केले आहे.
तब्बल दोन वर्षाच्या कोरोना च्या कालखंडानंतर बुधवारी सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी सुमारे जिल्ह्यात ठिकाणी उपस्थिती दर्शवून शाळेचा पहिला दिवसाचा आनंद विद्यार्थ्यांनी द्विगुणित केला. शाळेत गुरुजनांनी विद्यार्थ्यांचे पुष्प आणि गोड खाऊ देऊन स्वागत केले.
सातारा पालिकेच्या पंचवीस प्रभागांची आरक्षणं सोडतीद्वारे येथील शाहू कला मंदिर येथे जाहीर झाली. आरक्षणाच्या नियमाप्रमाणे पन्नास जागांसाठी पंचवीस महिला व पंचवीस पुरूषांना प्रतिनिधित्वाची संधी मिळणार आहे.
सातारा पालिकेच्या पंचवीस प्रभागांची आरक्षणं सोडतीद्वारे येथील शाहू कला मंदिर येथे जाहीर झाली. आरक्षणाच्या नियमाप्रमाणे पन्नास जागांसाठी पंचवीस महिला व पंचवीस पुरूषांना प्रतिनिधित्वाची संधी मिळणार आहे.
सातारा जिल्ह्यातील ११ एकात्मिक नागरी सुविधा केंद्र (सेतू) चुकीच्या पद्धतीने टेंडर पद्धती राबविण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर सुट्टीच्या कोर्टासमोर तातडीची सुनावणी सोमवारी (दि.३०) पार पडली.
ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात सातारा जिल्हा ओबीसी संघटनेने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बाहेर धरणे आंदोलन करून सातारा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन पाठवले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला 2021- 22 या आर्थिक वर्षाअखेर 138 कोटी 17 लाख रुपयांचा करोत्तर नफा झाला आहे. बँकेचा निव्वळ नफा हा 67 कोटी रुपये असून राखीव निधीसाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा जिल्ह्यातील पालिका निवडणुकांचे पुन्हा पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सातारा, फलटण, कराड, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, रहिमतपुर, म्हसवड या आठ व मेढा नगरपंचायत अशा नऊ स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी बँकेच्या वतीने सेवा सोसायटी व व्यक्तिगत कर्ज वितरणाच्या व्याजदरांमध्ये एक ते तीन टक्के कपात केल्याची घोषणा केली असल्याची माहिती बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील यांनी पत्रकारांना दिली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे आणि बँकेचे इतर सर्व संचालक उपस्थित होते.
सातारा जिल्हा शांतताप्रिय असून आज दिवसभरात जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. ज्यांना अशांतता निर्माण करण्याचे काम करायचे होते त्यात त्यांना यश आले नाही अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.
प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक असलेली रमजान ईद मंगळवारी सातारा शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी जिल्ह्यात ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी प्रार्थना स्थळांवर सामुदायिक नमाज पठण केले. सातारा शहरातील ईदगाह व मैदानासह विविध मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
जिल्हयातील सर्वसामान्यांचे आणि शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सदैव कार्यरत असलेली व उत्कृष्ठ आर्थिक नियोजनातून सक्षम असणारी माझी बँक, आपली हक्काची बॅंक म्हणून सातारा जिल्हा बॅंकेकडे पाहिले जाते.
कराड, सातारा, उंब्रज व पाटण या चार ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या चार टोळ्यांमधील तब्बल 23 जणांना तडीपार करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिला आहे. संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी घेतलेला हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.
सर्वसामान्य रुग्णांच्या उपचारासाठी एकमेव हक्काचे ठिकाण असणाऱ्या सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना व्यतिरिक्त इतर उपचारांच्या ओपीडी वेळेआधीच बंद होत असल्याने रुग्णांची प्रचंड ससेहोलपट होत आहे. त्यामुळे रुग्णांनी उपचार नक्की घ्यायचे कोठे, असा संतप्त सवाल निर्माण झाला आहे. डॉक्टर नक्की जातात कुठे आणि करतात काय, या विषयावर संशोधन होणे गरजेचे झाले आहे.
डिजिटल सभासद नोंदणीमुळे गाव व खेड्यातील काँग्रेसचा कार्यकर्ता पुन्हा सक्रिय झाला असून सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होईल, असा आशावाद महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी, मसूर, वडूज भागात घरफोडी करणार्या पाच जणांच्या बीड जिल्ह्यातील टोळीला सातारा पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. कसून झालेल्या चौकशीत त्यांनी पाच घरफोड्या केल्याचे मान्य केले असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलीसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
युक्रेन देशामध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी सातारा जिल्ह्यातील एकूण 22 विद्यार्थी हे या देशामध्ये निवासी होते. युध्द काळापूर्वी 3 विद्यार्थी सुखरुप मायदेशी परतले होते. परंतू, 19 विद्यार्थी युध्द काळात युक्रेनमध्ये अडकले होते.
सातारा जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी कोणत्याही परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी ५ केंद्र व उपकेंद्र यांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच परीक्षा केंद्रांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.
युक्रेन देशात सातारा जिल्ह्यातुन वेगवेगळ्या महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या १९ विद्यार्थ्यांपैकी ५ विद्यार्थी आज त्यांच्या घरी सुखरूप परतले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाचे आभार मानले असून उर्वरित १४ विद्यार्थी लवकरच जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
ठाणे, पालघर जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण झाल्याच्या बातम्या येत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. मात्र, आपल्या सातारा जिल्ह्यात अशा प्रकारे कोणत्याही तालुक्यात बर्ड फ्लूचा कोणताही धोका नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अकुंश परिहार यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींची चोरी केल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे सातारा जिल्ह्याच्या विकासाकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. सातारा शहराच्या हद्दवाढीनंतर नगरोत्थान अंतर्गत एक रुपयाचा निधी शहराला प्राप्त झालेला नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव असे प्रयत्न होताना दिसत नाहीत, अशी परखड टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
जिल्ह्यासह सातारा शहरात शुक्रवारी गणेश जयंती सोहळा धार्मिक व भक्तिमय वातावरणात व पारंपारिक पद्धतीने पार पडला. श्री गणेशाच्या दर्शनासाठी ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये भाविकांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी भाविकांनी यंदा सामाईक अंतराचे पालन करत गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले.
सातारा जिल्ह्यात पोलिसांनी ६ दारू अड्डयावर छापा टाकून सुमारे १० हजार रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर सातारा जिल्ह्यात आज ३ हजार ७१३ म्हणजेच ९७.६१ टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यात किती महाविद्यालय सुरू झाली याबाबतची माहिती रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.
सातारा जिल्ह्यात शुक्रवारी मकर संक्रांतीचा सण महिलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. मकर संक्रांतीनिमित्त सुवासिनींनी घराघरात वाण देण्याची पर्वणी साधली. त्यामुळे यावर्षी विविध वाणांची बरसात पहायला मिळाली. ओमायक्रॉनच्या संसर्गातही संक्रातीचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ‘खंडाळा शाखा व विभागीय कार्यालय, खंडाळा ’ या नूतन इमारतीचे नुतनीकरण उदघाटन बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या शुभहस्ते आणि संचालक दत्तानाना ढमाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीवर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. सातारा विभागातील 11 आगारातील सुमारे 397 कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले असून आजपर्यंत 95 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात आठ ठिकाणी सुरू असणाऱ्या देशी दारूच्या अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी १३ हजार ९९५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये पारा घसरल्याने गारठा वाढला आहे. उत्तर भारतातील वाढत्या थंडीच्या तीव्रतेने सातारकर गारठले असून उबदार स्वेटर कान टोपी जर्कीन यांचा वापर वाढला आहे .आज साताऱ्यात किमान 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. फलटण शहरामध्ये आठ दिवसांपूर्वी युगांडा येथून आलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात अखेर ओमायक्रॉनने एन्ट्री केली असून या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
दि. १२ डिसेंबर २०२१ रोजी सातारा शहरामध्ये दोन विशेष कार्यक्रम संपन्न झाले यामध्ये कोरोना नियमांची सर्रास पायमल्ली झालेली काल दिसून आली. सर्वसामन्य नागरिकांना लग्नासाठी ५० तर अंत्यविधीसाठी २० माणसांची मर्यादा टाकून प्रशाशनाने सातारा हिल मॅरेथॉन आणि जोर्तिमय यासाठी विशेष योजनेअंतर्गत कोरोना नियमनाची पायमल्ली करायची परवानगी दिलेप्रमाणे काल दोन्ही कार्यक्रमात वस्तुस्थिती दिसून येत होती, जणू काही प्रशासन दोन्ही आयोजकांचे खिशातच आहे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सर्वसामान्य आणि दुकानदार तसेच व्यापारी यांनी मास्क नाही घातला तर प्रशासन हजारो रुपयांचा दंड आकारते पण काल झालेल्या सातारा हिल मॅरेथॉन आणि जोर्तिमय या कार्यक्रमात कोविड नियमाची पायमल्लीसाठी आता प्रशासन किती दंड आकारणार व कोणती कारवाई करणार यावर सर्वसामान्य जनता, पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते लक्ष ठेवून राहणारच आहेत.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नुतन चेअरमन नितीन पाटील व व्हाईस चेअरमन अनिल देसाई यांनी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या येथील समाधी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन जिल्हा बँकेच्या उज्ज्वल परंपरेची घोडदौड कायम ठेवून बँक यशाच्या उच्च शिखरावर नेण्याची ग्वाही नुतन चेअरमन नितीन पाटील व व्हाईस चेअरमन अनिल देसाई यांनी यावेळी दिली.
सातारा जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सहकार सेना राज्य अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्ह्यातील अनेक ठिकाणावरुन आलेल्या विविध क्षेत्रातील मनसे प्रेमींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा जिल्हाध्यक्ष युवराज पवार होते.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक निकालानंतर आता अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड सोमवार दि. 6 डिसेंबरला होणार आहे. याबाबतचे पत्र बँकेने जिल्हा उपनिबंधकांना दिले आहे. बँकेत विद्यमान अध्यक्ष भाजपचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांचेच नाव अध्यक्षपदासाठी गृहीत धरले जात आहे. तर या पदासाठी राष्ट्रवादीचे नितीन पाटील हेही प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
सातारा जिल्ह्यातील लोणंद कोरेगाव पाटण वडूज खंडाळा दहिवडी या सहा नगरपंचायती चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या सहा नगरपंचायतीसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान तर 22 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी ला सुरवात होणार आहे. या नगरपंचायतीना आचारसंहिता लागू झाली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत सहकार पॅनेलने २१ पैकी १७ जागा जिंकून बँकेत आवाज राष्ट्रवादीचाच हे दाखवून दिले. या निवडणुकीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले, तर आमदार शशिकांत शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई या दिग्गजांचा पराभव झाला. समसमान मते पडल्याने काढण्यात आलेल्या ‘ईश्वरचिठ्ठी’ने शिवसेनेचे शेखरभाऊ गोरे यांची जिल्हा बँकेत दमदार एंट्री झाली.
तालुक्यातील उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मेढा येथे वाद झाला. मतदान केंद्रावर वाद झाल्यानं या ठिकाणी काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या ठिकाणी दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तणाव कायम आहे.
त्रिपुरा राज्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी सातारा यांनी क्रिमीनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारास अधिन राहून संपूर्ण सातारा जिल्ह्यात दि. 17 नोव्हेंबर रोजी 00.00 वा. पासून ते दि. 22 नोव्हेंबर 2021 रोजी 24.00 वा. पर्यंत जिल्ह्यामध्ये घेण्यात येणाऱ्या ग्रामसभा, शासकीय बैठका, शासकीय कार्यक्रम व पोलीस विभागाकडून परवानगी घेऊन करत असलेले कार्यक्रम यांना वगळून या कालावधीत खालील कृत्ये करण्यास प्रतिबंधत्मक आदेश लागू केले आहेत.
सातारा : सातारा व कराड तालुक्यात मटका जुगार जबरी चोरी आणि खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन टोळीतील सहाजणांना एक वर्षासाठी सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी हे आदेश दिले.सातारा शहर व तालुक्यात मटका अड्डा चालविणे, जबरी चोरी करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये हवे असणारी समीर सलीम कच्छी (वय ३९, रा. मोळाचा ओढा), अक्षय अनिल तळेकर (रा....
बँकिंग फ्रंटिअर्स ही एक राष्ट्रीय स्तरावरील अग्रणी मल्टी प्लॅट फॉर्म मीडिया कंपनी आहे. त्यांचे माध्यमातून बँकिंग क्षेत्रामध्ये कामकाज करीत असलेल्या संस्थांनी केलेल्या उल्लेखनिय कामकाजाची दखल घेवून त्या संस्थांचा पुरस्कार देवून गौरव केला जातो.
संभूखेडचा (ता. माण) सुपुत्र जवान सचिन विश्वनाथ काटे (वय 24) यांचा राजस्थानमध्ये देशसेवा करताना मृत्यू झाला आहे. आज (शनिवार) संभूखेड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील प्रमुख अर्थवाहिनी असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. त्यानुसार सोमवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर २१ नोव्हेंबर रोजी संचालकांच्या २१ जागांसाठी मतदान होणार आहे. दि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील पुनर्वसन कार्यालयात आर्थिक लाभासाठी चुकीचा कारभार होत असल्याचे समोर येत आहे. या कार्यालयातून फलटण तालुक्यातील जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. शासकीय गावठाणातील राखीव प्लॉट खातेदाराला वाटप करून त्यांची लगेच विक्रीही करण्यात आली आहे.
सहकार क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या सातारा जिल्हा मध्य.सह.बँकेस भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बँकेच्या ग्राहकांना थेट मेंबरशिपद्वारे NEFT/RTGS ची सुविधा सुरु करणेस मान्यता दिली असून बँकेच्या कार्यपद्धतीवर पसंतीची मोहोर उमटवली आहे.
सातारा : सातारा जिल्हा कृषी बँक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सातारा जिल्हा बँकेचे प्रॉपर्टी विभागाचे अधीक्षक विश्वजित राजुरकर यांची निवड सर्वानुमते बिनविरोध झाली. पतसंस्थेच्या संचालक मंडळाची सभा अध्यासी अधिकारी किरण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अमित काळे, माजी चेअरमन उद्धव देशमुख, संजय मांढरे, यशवंत मेंगडे, विश्वास गायकवाड, ...
जगभरात क्षयरोग (टीबी) झपाट्याने वाढत असून, त्यामध्ये भारताचा अव्वल क्रमांक आहे. जगाच्या तुलनेत 27 टक्के रुग्ण भारतात असून महाराष्ट्रात हे प्रमाण 10 टक्के आहे, अशी सध्याची क्षयरुग्णांची सद्य:स्थिती आहे. असे असताना सातारा आरोग्य विभागाने क्षयरोग निर्मूलनासाठी कंबर कसली असल्याने, त्यांच्याच कार्याची पावती म्हणून क्षयरोग उच्चाटनासाठी करत असलेल्या कार्याबद्दल ब्रॉन्झ पदक भारत सरकारतर्फे प्रदान करण्यात आले असून, ही सातारा जिल्ह्याकरिता अभिमानास्पद बाब असल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश पाटील य
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या शासनाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेंतर्गत आरोग्यसंपन्न महाराष्ट्र घडवण्यामध्ये हातभार लावण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनानेही आरोग्यसंपन्न सातारा जिल्हा घडवण्याचा संकल्प केलेला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्ताने शिक्षकांप्रति सन्मान प्रकट करण्यासाठी दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या म्हसवड शाखेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
‘सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वसामान्य शेतकर्यांच्या हिताचे नेहमीच प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे काम करत आहे. फलटण पंचायत समितीच्या प्रांगणात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एटीएमची सेवा दिल्याने एटीएमची सेवा ग्राहकांच्या हिताचे ठरणारी आहे,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.
सातारा जिल्ह्यात कोरोनाची स्थिती अत्यंत क्रिटीकल फेजवर आहे. संक्रमणाचा आतापर्यंतचा दर 18 टक्के आहे तर या आठवड्यातील दर तब्बल 22 टक्क्यांवर आहे. यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध होईनासे झाले आहेत. ही परिस्थिती भयावह आहे. स्टेडियमवर चारशे बेडच्या जंबो हॉस्पिटलचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांनी राज्य शासनाला दिला आहे. मात्र, त्यास विलंब योग्य नाही. सातारा जिल्ह्याच्या संवेदनशील मागण्यांना राज्य सरकारने तत्काळ मंजूरी द्यावी अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल. यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, अशी ग्व