युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांना आडमुठे पणा आणि परावलंबी धोरणाचे परिणाम आताचे घडीला संपूर्ण युक्रेन ला भोगायला लागत आहे. चर्चेतून सुटू शकणाऱ्या बाबीसाठी आज महायुद्ध सुरु झाले आहे. भारत स्वतंत्र काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नेतृत्वाखाली आझाद हिंद सेना हल्ले करत होते परंतु पाश्चिमात्य देश जपान हल्ले करत आहे अश्या बातम्या पेरत होते तसेच सद्यस्थितीला मीडिया तसेच सर्वत्र युक्रेनच्या पराक्रमाच्या बातम्या येत असल्या तरी वास्तवामध्ये रशियाने आतापर्यंत केलेले हल्ले आणि त्यातून युक्रेनचे झालेले नुकसान भरून यायला युक्रेनला कमीतकमी २० वर्षाचा कालावधी लागेल असे तज्ञांचे मत असून हे युद्ध असेच सुरु राहिले तर युक्रेन सारखा देश स्वतःचे नामोनिशाण गमवालेशिवाय राहणार नाही.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!