सातारा-रहिमतपूर रस्त्यावर गोडोली परिसरात काही दिवसापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला गळती लागली होती. त्या गळतीचे काम ठेकेदाराकडून करण्यात आले होते. मात्र रविवारी पुन्हा एकदा त्याच जलवाहिनीला गळती लागून लाखो लिटर पाणी वाया गेल्याने ठेकेदाराच्या कामाच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!