महाराष्ट्रातील आळंदी व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व अधिकारी यांच्यासह पाहणी केली.
ब्रिटिशकालीन फलटण- पंढरपूर लोहमार्गासाठी लवकरच निधीची तरतूद करू, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
शनिवारी दुपारी दोन वाजता दहिवडी- पंढरपूर मार्गावरील धुळदेव या ठिकाणी सातारा विभागाच्या बर्निग बस चा थरार पाहण्यास मिळाला. या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
माण आणि खटाव या दोन दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचा समावेश प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेत करुन योजनेच्या उर्वरित कामासाठी ६९७ कोटींचा निधी मिळण्यासाठी तसेच फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाचे काम त्वरित सुरु करावे, या मागणीसाठी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. जयकुमार गोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली.
सतीश धुमाळचा पाठीराखा नक्की कोण ? सतीश धुमाळ सारखा भ्रष्ट अधिकारी पुनर्वसन विभागात असताना अनेक कामांत भ्रष्टाचार केला . भूसंपादन विभागात बदली झाल्यानंतर ही फक्त तडजोडी करून शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसे लुबाडण्याचा कायम प्रयत्नात असताना. धुमाळच्या या कर्मकांडाच्या बातम्याही माध्यमांतून प्रसिद्ध होत असूनही वरिष्ठ अधिकारी सतीश धुमाळच्या करणामांकडे सोईस्करपणे कानाडोळा करताना दिसत आहेत. दिलीप ननावरे यांच्या प्रकरणात धुमाळने कृषी आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन बेकायदेशीर काम करत आहे. सतीश धुमाळवर कारवाई कोणाचा जीव गेलेवरच कारवाई होणार का असा प्रश्न जनमानसात उमटताना दिसत आहे.
पंढरपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आता आषाढवारीनंतर पंढरपूरची (Pandharpur Maghi Wari) माघीवारीही रद्द करण्यात आलं आहे. कोरोनामुळे पंढरपूर शहरासह 10 गावांमध्ये संचारबंदी देखील करण्यात आली आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. (Pandharpur Curfew for 23rd February,Maghi wari also cancelled) कोरोनामुळे आषाढी वारीनंतर आता माघी वारीही रद्द करण्यात आलीये. पंढरपूर शहरासह शेजारच्या दहा गावांमध्ये संच...
करोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा करोनाने गाठल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांना प्राणास मुकावे लागले आहे. पुण्यात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.