महाराष्ट्र राज्यासाठी लागू असलेली BPMS प्रणाली म्हणजे असून अडचण नसून खोळंबा या प्रमाणे राम भरोसे चालू आहे. त्यामुळे सर्वसामान्याबरोबर व्यावसायिकांना आर्थिक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
भाविकांना घरबसल्या विठ्ठल रुक्मिणीच्या विविध पूजा बुकिंग करता याव्यात यासाठी सुरू करण्यात आलेली ऑनलाईन बुकिंग काल (26 डिसेंबर ) पहिल्याच दिवशी बुक झाल्या आहेत.
सातारा : ऑनलाईन आर्थिक फसवणूक प्रकरणी अज्ञातावर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑनलाईन रमी खेळण्यासाठी पैसे उपलब्ध व्हावेत याकरिता सातारा शहर औद्योगिक वसाहतीमध्ये तब्बल 36 बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या आरोपीस सातारा शहर पोलीस ठाण्याने ताब्यात घेतले आहे.
येथील तामजाई नगर परिसरात वास्तव्य करणाऱ्या एका महिलेची चार जणांनी ५ लाख ५ हजार ६६२ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा पालिकेने स्वतःच्या खात्याचा क्यूआर कोड विकसित केला असून सातारकरांना घरपट्टी आणि पाणीपट्टी ची बिले ऑनलाईन भरण्याची सोय उपलब्ध झाली आहे. हद्दवाढ क्षेत्रातील नागरिकांना या सुविधेचा लाभ होणार आहे. अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांच्या हस्ते या सुविधेचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.
गोंदी, ता. कराड येथील एका सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याला सुमारे दीड लाखांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. बँकेचे अॅप्लिकेशन बंद पडल्याची सबब सांगून त्यांच्या खात्याची माहिती घेऊन चोरट्याने फसवणूक केली आहे.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अथक जीवन कार्य म्हणजे असामान्य कर्तृत्वाचा दीपस्तंभ आहे. त्यांच्या विचार कार्याने मानवी जगण्याला नवी उमेद आणि सामर्थ्य प्राप्त होते आहे,’ असे मत आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ अभ्यासिका डॉ. दीपा श्रावस्ती यांनी व्यक्त केले.
‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. समाजाच्या सर्व घटकातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने शासनाने विविध शिष्यवृत्ती योजना राबवलेल्या असून, त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,’ असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले.
जगात कोरोना महामारीनं थैमान घातल्यामुळं संसर्ग टाळण्यासाठी शासनानं ‘लॉकडाऊन’ जाहीर केलं. त्यामुळं गर्दीची ठिकाणं असलेली शाळा-महाविद्यालयं पूर्णतः ‘लॉक’ झाली. या काळात मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शासनानं ‘ऑनलाईन शिक्षण’ सुरू केलं. पण हेच शिक्षण ‘सावरी’ या दुर्गम गावातील मुलांसाठी नेटवर्कअभावी गैरसोईचं ठरतंय. त्याच मुलांची ही खडतर कहाणी...
‘आपल्या समाज व्यवस्थेतील प्रत्येक शिक्षक शिक्षणाबरोबरच आपले सामाजिक उत्तरदायित्व कर्तव्य भावनेने पार पडत असतात. विद्यार्थ्यांच्या मनावर सुसंस्कार, आचार-विचार व संस्कृती या सर्व बाबींचे योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सर्व शिक्षक आपापल्यापरीने योग्य प्रकारे पार पाडत असतात.
सध्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदवी पब्लिक स्कूलची ‘ऑनलाईन’ डिजिटल शाळा सुरू आहे. शिक्षकांनी हातात हात घालून दर्जेदार शिक्षणाची परंपरा अखंडित ठेवल्याने नवीन प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.