आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. भाजपने मुंबई भाजपचा अध्यक्ष बदलला आहे, अमित साटम यांची नियुक्त
Banking Rule Change : बॅंकिंग मध्ये 1 जुलैपासून बदलणार 'हे' नियम; जाणून घ्या सविस्तर
महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे निर्णय: राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील चारचाकी वाहनधारकांच्यादृष्टीने मोठा निर्णय.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता या वर्षीच मिळणार आहे.
Maharashtra Weather News : हवामानासंदर्भातील आताच्या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी.... थंडीचा कडाका वाढत गेला आणि अचानकच राज्याच पाऊस आला. पाहा हवामान विभागानं दिलेला इशारा...
नव्या सरकार स्थापनेसाठी आज (4 डिसेंबर) मुंबईत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. आज भाजपाची केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपाची महत्त्वाची बैठक झाली.
वाकड येथे सोमवारी दि. २५ रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली होती. जयश्री विनय मोरे (वय २७, रा. मारुंजी, हिंजवडी) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे
PAN 2.0 Project : सध्या देशात सुमारे 78 कोटी पॅनकार्ड जारी करण्यात आले आहेत. त्यापैकी 98 टक्के पॅन वैयक्तिक स्तरावर जारी करण्यात आले आहेत.
Weather News : मागील काही दिवसांपासून राज्यासह मुंबई शहरात होणारी तापमानाची घट अद्यापही सुरु असल्याचं स्पष्ट होत आहे. मागील 24 तासांमध्ये मुंबईतील कैक भागांमध्ये तापमान 16 अंशांवर पोहोचलं असून, मागील आठ वर्षांमधील हे सर्वात निच्चांकी तापमान असल्याचं म्हटलं जात आहे. तिथं उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली असून पारा 8 अंशांवर घसरला आहे. राज्यात नाशिक, निफाड, धुळे आण...
सातारा शहराच्या दाट लोकवस्तीच्या ठिकाणी नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेवर अस्तित्वात असणाऱ्या गुरुवार परज येथील जुन्या शॉपिंगसेंटरच्या बाजूला सुसज्य आणि अदयावत शॉपिंग सेंटर उभारणेचा नगरपरिषदेचा प्रस्तावास शासनाने वैशिष्टयपूर्ण योजनेमधुन मंजूरी दिली आहे. त्याकरीता 10 कोटी रुपयांचा निधी देखिल प्राप्त झाला आहे.
हंगामा प्ले, हा हंगामा डिजीटल मीडिया मालकीचा अग्रगण्य ओटीटी प्लॅटफॉर्म असून त्यांच्या वतीने नवीकोरी हिंदी कथासंग्रह मालिका – हसरतें लॉन्च करण्यात आली.
गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांची पदोन्नतीने साताऱ्यात पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. यापूर्वी सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून शेख यांनी धडक कामगिरी बजावली होती. पुन्हा एकदा साताऱ्याच्या होम ग्राउंड वर शेख यांची बदली झाली असून त्यांच्या बदलीचे साताऱ्यात स्वागत होत आहे.
सोनी मराठी वाहिनी सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे. भक्ती, शौर्य, हास्य, थरार, शृंगार अशा सगळ्या प्रकारांत मोडणाऱ्या मालिका प्रेक्षकांना बघायला मिळतात. १८ जुलैपासून प्रेक्षकांना एक नवीकोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. 'जिवाची होतिया काहिली' ही मराठी आणि कानडी यांच्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहे.
जिल्हा परिषदेच्या गट व गणांची सन २०११ च्या लोकसंख्येनुसार नव्याने रचना करण्यात आली असून गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली. आता जिल्ह्यात ६४ ऐवजी ७३ जिल्हा परिषद सदस्य निवडून येणार असून गणांची संख्या १४६ वर पोचली आहे.
महिलांनी आपल्या खंबीर मानसिकतेचा नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये परिचय दिला आहे त्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून स्वतःचा विकास साधला पाहिजे, एवढेच नव्हे तर आपल्या कर्तुत्वाने नवीन मापदंड निर्माण करायला हवेत. यामध्ये त्या कुठेच कमी पडणार नाहीत, अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी व्यक्त केली.
राज्यातील पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4( नवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48) वरील खंबाटकी घाटातील नव्या सहा मार्गिका बोगद्याचे (प्रत्येकी 3 मार्गिका असलेल्या जुळया बोगद्याचे) अंतिम खुदाईद्वारे खुलेकरणाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपन्न झाले.
जाणुन घ्या लाईट बिला संबंधित तुमचे अधिकार; अन्यथा तुमची अशीच लूट होईल..! वीज ही आपली गरज आहे आणि ती आपण त्यानुसार वापरतो. तसेच आपण त्याचे बिलही भरतो. गेल्या काही दिवसांपासून लाईटबिल भरपूर आले आहे. लाइटबिल चे रीडिंग कमी असले आणि तुम्ही वापरत असलेले युनिट देखील कमी असले तरीही, लाइटबिल हे जास्त उकळले जाते आणि याला आपणच जबाबदार देखील आहोत.
कोरोनाचा नवा ओमिक्रॉन स्ट्रेन आढळल्यानंतर दक्षिण आफ्रिका, बोत्स्वाना आणि हाँगकाँग येथून येणाऱ्या प्रवाशांच्या काटेकोर तपासणीचे निर्देश केंद्र सरकारने दिले असतानाच महाराष्ट्र सरकारनेही आज मोठे पाऊल उचलत कोविड नियम अधिक कडक केले आहेत. राज्य सरकारने आज प्रवास व अन्य बाबींसाठी नवी नियमावली जारी केली आहे.
‘काशीळ येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड रुग्णालय कराड व सातारच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. कराड व सातारा तसेच काशीळ परिसरातील नागरिकांना या रुग्णालयाचा लाभ होणार असून, या रुग्णालयामार्फत कोविड रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत,’ असा विश्वास पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
महाराजा मल्हारराव होळकर यांनी मावळा प्रांत जिंकून संपूर्ण भारतभर अटकेपार झेंडे लावले असे शूरवीर सरदार महाराजा मल्हारराव होळकर यांचे जन्मगाव हे फलटण तालुक्यातील मुरूम आहे. हा इतिहास गेली कित्येक वर्ष कोणालाच माहीत नव्हता. मात्र, मध्यंतरी गेल्या सात-आठ वर्षांपासून हे गाव महाराजा श्रीमंत मल्हारराव होळकर यांचे जन्मगाव म्हणून संपूर्ण राज्यामध्ये चर्चेला येऊ लागले. या मुरुम गावच्या विकासासाठी ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून 1 कोटी 61 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
‘महाराष्ट्र औद्योगिक विकास कॉर्पोरेशन अंतर्गत सातारा औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन केंद्राच्या बांधकाम तसेच त्यातंर्गत विविध कामांसाठी 14 कोटी 91 लाख 13 हजार 300 रुपये तर कोरेगाव (मिनी) औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यासाठी 60 लाख 97 हजार रुपयांची मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसीकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे,’ अशी माहिती ‘एमआयडीसी’चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.
जावळी तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. प्रशासन आपापल्या परीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे.
खटाव तालुक्यातील शेनवडी गावात वाढत्या कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन गावच्या युवकांनी आयसोलेशन कक्षाची निर्मिती केली असून, या आयसोलेशन कक्षाचे उद्घाटन चोराडे गावचे आरोग्य अधिकारी डॉ. कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.
सध्या शिक्षणाची गंगा खेडोपाड्यापर्यंत पोहोचल्यामुळे ग्रामीण भागातील मुलीही जिद्द, चिकाटी अन् मेहनतीच्या जोरावर आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवताना दिसताहेत. यातीलच एक उत्तम उदाहरण म्हणजे अनफळेतील स्वातंत्र्यसैनिकाच्या ‘लेकी’नं पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मारलेली मजल...त्याच जयश्री कांबळेंच्या खडतर कहाणीवर टाकलेली ही अल्पशी नजर...
वाढदिवसाचा खर्च टाळून वडूज येथील सामाजिक कार्यकर्ते आकाश जाधव यांनी कोरोना बाधित रुग्णांना मदत करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत हिलदारी मार्फत महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचार्यांना मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या हस्ते ‘सेफ्टी किट’च्या वितरण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे व गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून आणि आ. महेश शिंदे यांच्या माध्यमातून कोरेगाव शहरात अवघ्या पावणेदोन वर्षात 29 कोटींची विकासकामे मार्गी लागली असून, त्यापैकी 7 कोटींची कामे सुरू झालेली आहेत. कोरेगावकरांनी मतांच्या माध्यमातून दिलेला भरभरून प्रतिसाद लक्षात घेऊन कोरेगावात आ. महेश शिंदे यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. केवळ पोकळ घोषणाबाजी नाही, तर प्रत्यक्षात विकासकामे मंजूर करून, त्याचा शुभारंभ करणे आणि विकासकामे दर्जेदार कसे होतील, यासाठी त्यावर लक्ष
गुरसाळे (ता. खटाव) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत असूनसुद्धा कोविड सेंटर सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाकडून चालढकल होत असल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
‘कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांनी संपूर्ण फलटण शहरासह तालुक्यातील 8 गावांत दि. 2 ते 8 मे दरम्यान प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) घोषित करून दवाखाने व औषध दुकाने वगळता दूध, भाजीपाला, किराणा या अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यापार/व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कामगार हा बांधकाम व्यवसायाचा कणा असून, कामगारांच्या प्रती ऋण म्हणून त्याच्या पाल्यांसाठी चड उखढ हा कॉम्प्युटर कोर्स पूर्ण केल्यास त्याला मदत करण्याची भूमिका बिल्डर्स असोसिएशन घेणार आहे. दरम्यान, याद्वारे यावर्षी किमान 50 कामगारांच्या पाल्यांचे प्रशिक्षणासाठी मदत करणार असल्याचे चेअरमन रणधीर भोईटे यांनी सांगितले.
‘केळघर परिसरात कोरोना बाधितांचे प्रमाण वाढू लागले आहे. कोरोनाची साखळी खंडित होण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. प्रशासनास ग्रामस्थांची साथ मिळाल्यास कोरोना हद्दपार होण्यास फारसा अवधी लागणार नाही. केळघर परिसरात कोरोनामुक्तीसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले विचारमंच सामाजिक बांधिलकीतून प्रयत्न करत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनारूपी संकटावर मात करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे,’ असे आवाहन प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांनी केले.
‘सातेवाडी (ता. खटाव) येथील मधुमाला सांस्कृतिक केंद्रात सुरू करण्यात आलेल्या हुतात्मा स्मृती आयसोलेशन कक्षामुळे प्राथमिक अवस्थेतील रुग्णांना चांगला दिलासा मिळेल,’ असे मत गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी व्यक्त केले.
माण तालुक्यातील मलवडी येथील गणपत जगदाळे या 98 वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात करून केवळ दहा दिवसांतच ठणठणीत बरे होऊन घरीही परतले. निढळ येथील श्री सेवागिरी कोविड केअर सेंटर मधील रेमडेसिवीर इंजेक्शन न वापरताही उपचार करणार्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
‘कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वांनी योग्य ती खबरदारी घेतल्याने गावच्या वेशीच्या आत कोरोनाला प्रवेश करता आला नव्हता. मात्र, दुसर्या लाटेत आपण सर्वजण काळजी घेत असतानाही गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मात्र, या कोरोनाला परतवून लावण्यासाठी आपण झाशीच्या राणीप्रमाणे लढा देत असून आज संपूर्ण गावात जंतुनाशक फवारणी केली आहे. यापुढेही सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून गावच्या भल्यासाठी सतर्क व कार्यरत राहणार,’ असे प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्या काजल देसाई यांनी केले.
‘येथे कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थ प्रयत्न करणार आहेत. गाव कोरोनामुक्त होऊन पूर्वपदावर येण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थांनी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करावे,’ असे आवाहन सरपंच रवींद्र सल्लक यांनी केले.
माण तालुक्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा कहर सुरू असून, सामान्य रुग्णांना बेड मिळणे फार जिकिरीचे होऊन बसले आहे. जनतेसाठी ब्रम्हचैतन्य देवस्थान गोंदवले या ट्रस्टने उदारहेतूने चैतन्य रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्यासाठी ते रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करून दिले आहे. बेडसाठी बाधित रुग्ण वणवण फिरत असताना माणचे प्रशासन याठिकाणी कोरोना सेंटर सुरू करण्यास दिरंगाई का करीत आहे, हे न समजणारे कोडे असल्याचा उपहासात्मक टोला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी प्रशासनाला प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला
पहिली बायको असताना दुसरे लग्न का केले यातून झालेल्या वादातून पिंप्रद (ता. फलटण) येथे वडिलांनी मुलाचा कुर्हाडीचा घाव घालून खून केल्याची घटना घडली आहे.
जेव्हा पोटाला काहीच मिळणार नाही तेव्हा लोकं माणसाला मारून खातील, असं ऐकीवात होतं. या म्हणीला तंतोतंत खरे ठरावे याची प्रचिती फलटणकरांना बघावयास मिळाली. लॉकडाऊनमध्ये सर्वत्र बंद असल्याने पोटाची भूक शमविण्यासाठी काहीच मिळेना म्हणून एका मनोरुग्णाने सरणावर जळत असलेल्या अर्धवट कोविडग्रस्त मृतदेहाचे लचके तोडून आपली भूक शमविण्याचा प्रयत्न केला आहे. अंगावर शहारे आणणार्या या घटनेला पाहून मन सुन्न होत आहे.
येथील ज्येष्ठ नगरसेविका विमलताई पारठे यांनी आपले संपूर्ण हॉटेल कोरोना बाधित रुग्णांच्या विलगीकरण कक्षासाठी पालिकेच्या स्वाधिन केले आहे तर याच विलगीकरण कक्षात दाखल झालेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या नाश्ता, चहा व दोन वेळच्या जेवणाची सोय नगरसेवक रवींद्र कुंभारदरे हे मोफत करणार आहे. या दोन नगरसेवकांच्या दातृत्वाचे शहरातून कौतुक होत आहे.
माण तालुक्यात कोविड आजाराने थैमान घातले असून, कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक भरच पडत आहे. उपचाराअभावी माणची जनता तडफडत असताना जनतेचा जीव वाचविण्यासाठी माण पंचायत समिती सरसावली आहे. पंधराव्या वित्त आयोगातून कोविड विरुद्धच्या लढ्यासाठी पंचायत समिती सदस्यांनी वीस लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले.
कोरोना संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यसाठी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख हरणाई सहकारी सूतगिरणी व माणदेशी प्रबोधनकार सहकारी सूतगिरणीच्या माध्यमातून वडूज येथे सुसज्ज कोविड सेंटर उभारणार आहेत.
कोरेगाव नगरपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षित कारभारामुळे पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांची कामे रखडली आहेत. नगरपंचायत विविध थातूर मातूर कारणे देऊन लाभार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे, त्याच्या निषेधार्थ शनिवार, दि. 1 मे 2021 रोजी कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर महाराष्ट्राच्या दिनाच्या ध्वजारोहणावेळी धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे.
खटाव तालुक्याच्या उत्तर भागात आलेली कोरोनाची त्सुनामी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, पोलीस पाटील आणि गावोगावच्या ग्राम दक्षता समित्या हातात हात घालून काम करणार आहेत. कोरोनाला पायबंद घालण्यासाठी प्रत्येक गावातील प्रत्येक प्रभागात समाजातील सर्वच घटकांनी योगदान देणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने पुसेगाव पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी गावोगावच्या ग्राम दक्षता समित्या अॅक्टिव्ह करण्यासह सर्वसमावेशक आराखडा ठरविण्यात आला.
कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक रुग्णालयात बेड मिळत नसल्याने रुग्णांची मोठी आबाळ होत असतानाच खटाव तालुक्यातील बोंबाळे (भाग्यनगर) येथील युवकांनी गावातच दहा बेडचे विलगीकरण कक्ष सुरू करत माणुसकीचे पाऊल पुढे टाकले आहे.
मेढा-केळघर भागातील कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांची पाण्याअभावी दैना झाली असून, 1991 पासूनच्या तीन दशकात या भागातून मोठ्या प्रमाणावर शहरात स्थलांतर होत आहे. बर्याच प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडल्या असून, केडंबे येथील हायस्कूल सुद्धा बंद पडले आहे. 60 ते 70 टक्क्यांच्यावर शेती पाणी नसल्यामुळे पडून आहे. जावली तालुका दूध पुरवठा संघ 10 वर्षांपूर्वीच बंद पडला असून, भागातील दुग्धव्यवसाय पूर्णपणे संपलाय. पाण्याअभावी कुठलाच जोडधंदा करणे शक्य नाही. त्यामुळे तरुण वर्ग शहरात स्थलांतरित
‘तारळीचे पाणी खटाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अनफळे गावापर्यंत पोहोचले याचा आनंद वाटतो,’ असे उद्घार माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी काढले.
‘सातेवाडी (ता. खटाव) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून सुरू केलेल्या आयसोलेशन सेंटरचा उपक्रम स्तुत्य असून अन्य गावांनीही याचा आदर्श घ्यावा,’ असे आवाहन परिविक्षाधीन प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी केले.
जिल्हा नियोजनच्या निधीतून प्रत्येक पोलीस स्टेशनला नवीन वाहन देण्यात आले आहे. विविध प्रकारची 24 वाहने आणि 48 मोटारसायकली यांच्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मोठी मदत होणार आहे. जिल्हा नियोजन निधीमधून पोलीस विभागासाठी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. ही वाहने पोलीस विभागाला पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.
फलटण शहरासह तालुक्यात सोमवारी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. अनेक भागात जोरदार गारपीट झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. गारांच्या पावसाचा आनंद अनेकांनी मनमुरादपणे आनंद लुटला तर फलटण शहरात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते तसेच रस्ते जलमय झाले होत.े
‘राज्यासह जिल्ह्यात दुसर्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये सातारा जिल्हा कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयात 78 ऑक्सिजन बेड असून कोरोना रुग्णांवर उपचार होणार आहे. रुग्णांना यामुळे निश्चितच एक दिलासा मिळणार आहे,’ असे प्रतिपादन पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.
गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील ब्रह्मचैतन्य देवस्थान ट्रस्टचे चैतन्य रुग्णालय प्रशासनाने कोविड सेंटरसाठी अधिगृहित केले होते. विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना उपनेत्या ना. डॉ. नीलमताई गोर्हे यांच्या प्रयत्नातून देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी तसेच प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या सहकार्याने आज चैतन्य रुग्णालय लोकांच्या सेवेसाठी कोविड सेंटर म्हणून आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी दिली.
कोरोनाने सर्वत्र हाहाकार उडाला असून, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालयात ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्ण दगावत आहेत. या गंभीर परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेतला असून, त्यांच्या माध्यमातून मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभा राहणार आहे. या प्लांटसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वतःच्या आमदार फंडातून निधी उपलब्ध करून दिला असून, लवकरच या प्लांटच्या उभारणीस प्रारंभ होणार आहे.
जावळी तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला असल्याने चिंता व्यक्त होत आहे. अशातच जावळी तालुक्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी लवकरच तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मेढा येथे सर्व सोयींनियुक्त ऑक्सिजनसह 30 बेडचे सुसज्ज कोविड रुग्णालय उभारण्यात यावे तसेच बामणोली येथेही 10 बेडच्या रुग्णालय उभारणी करावी, असा आदेश राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांना दिल
‘सध्या सर्वत्र सुरू असलेल्या कोरोना वैश्विक महामारीवर मात करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सुरू असलेल्या विविध उपाययोजनांना मदत करण्यासाठी वाई अर्बन बँक परिवाराच्या वतीने 100 बेड कोरोना केअर सेंटरकरिता वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, तहसीलदार रणजितसिंह भोसले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहेत,’ अशी माहिती दि वाई अर्बन को. आँप. बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे यांनी दिली.
लोणंद शहरात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस संख्या वाढत चालली असून, सकाळची 7 ते 11 प्रशासनाच्या वतीने अत्यावश्यक सेवेत चालू असणार्या दुकानांवर गर्दी होत असून येथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्याची गरज आहे, मात्र कारवाई होताना दिसत नाही.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत सर्वत्र रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संकटात माजी पालकमंत्री आ. शशिकांत शिंदे यांनी पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना सेंटरला भेट देऊन वैद्यकीय अधिकार्यांशी चर्चा केली. तसेच उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधत त्यांना मानसिक धीर दिला. डीपीसीमधून पुसेगाव कोरोना सेंटर 30 ऑक्सिजन बेड व इतर सुविधांसाठी 10 लाख निधी दिला आहे. ऑक्सिजन बेडच्या लाईनचे काम पूर्ण झाले असून, लवकरच मशीन कार्यान्वित होतील. तसेच अपुर्या असणार्या सुविधांसाठी आमदार फंड
सातारा येथील ‘भक्ती फाउंडेशन’च्या वतीने डॉ. अशोकराव पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील प्रसिद्ध निवेदिका इंद्रायणी जवळ-मस्के यांना प्रमाणपत्र व डॉ. उज्ज्वला सहाने लिखित प्रेरणा पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
‘भगवान महावीर यांनी आदर्श जीवन पद्धतीची जी तत्त्वे सांगितली आहेत, त्याचा आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वीकार करून समृद्ध आयुष्य जगावे. तसेच आधुनिक युगात भगवान महावीर यांची शिकवण मोलाची आहे,’ असे प्रतिपादन डॉ. प्रमोद गावडे यांनी केले.
पाचगणी डॉन अॅकॅडमी व बेल एअर हॉस्पिटल येथील कोविड केअर सेंटरला आ. मकरंद पाटील यांनी भेट देऊन कोरोना रुग्णांची विचारपूस केली. तसेच त्यांच्या अडचणी समजून घेऊन संबंधित यंत्रणेला तशा सूचना दिल्या. आमदारांच्या भेटीने रुग्णांच्या चेहर्यावर समाधान दिसून आले.
सध्या सातारा जिल्ह्यासह माण तालुक्यातही रुग्णांना लागणार्या ऑक्सिजनच्या अपुर्या साठ्यामुळे अनेक रुग्णांचे जीव धोक्यात आले असून, अनेक ठिकाणी ऑक्सिजन अभावी रुग्णांना प्राण गमवावे लागत असल्याने स्वत:चा व्यवसाय काही दिवस बंद ठेवावा लागला तरी चालेल; परंतु कोविड रुग्णांचे प्राण वाचले पाहिजेत, या सामाजिक बांधिलकीतून गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील व्यावसायिक आत्माराम कदम यांनी ऑक्सिजन सिलिंडर दान करून रुग्णांना वाचवण्यासाठी खूप मोठं काम केलं आहे.
म्हसवड शहरातील कोरोनाबाधित रस्त्यावर फिरत असल्याने कोरोना वाढत आहे. या लोकांच्या वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आरपीआय नेते किशोर सोनवणे यांनी केली आहे. ‘जनता कर्फ्यू’चे तीनतेरा वाजल्यामुळे म्हसवड पालिका व पोलीस यंत्रणेत ताळमेळ जुळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शासनाच्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.
जिल्हाबंदी आदेश झुगारून महाबळेश्वरच्या सहलीवर येणे मुंबई येथील पर्यटकांना चांगलेच महागात पडले आहे. पालिकेच्या विशेष पथकाने पर्यटकांना व पर्यटकांना आसरा देणार्या हॉटेलवर दंडात्मक कारवाई करून 55 हजारांचा दंड शुक्रवारी वसूल केला. पालिकेच्या मुख्याधिकार्यांच्या या धाडसी कारवाईचे शहरातून चांगलेच कौतुक केले जात आहे.
वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर माण आणि खटाव तालुक्यांत ऑक्सिजन सुविधेसह सुसज्ज कोविड सेंटर उभारणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस नेते व कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली.
कोरोनाच्या पूर्वी लग्न थाटामाटात साजरी केली जात होती. लग्न म्हटले की बँड-बाजा आलाच. नाच गाणे आले. लग्न काय पुन्हा पुन्हा होतंय का? हौसेला मोल नाही त्यामुळे लग्नात भरमसाठ खर्च केला जायचा. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळायचा. त्यावर अनेकांची कुटुंब चालायची. मात्र, गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातल्यामुळे बँड व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
दानवली (ता. महाबळेश्वर) येथे शासकीय शिधा वाटपात निकृष्ट दर्जाचे धान्य मिळत असल्याने आज नागरिक संतप्त झाले होते. असले निकृष्ट दर्जाचे धान्य देण्याऐवजी ते देऊ नका, अशा भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
दरे तर्फ परळी येथील महादेव गोविंद तुपे यांचे घर डोंगराला लागलेल्या वणव्याच्या आगीत जळून खाक झाले आहे. यामध्ये दोन कडब्याच्या गंजी तसेच गोठ्यात बांधलेल्या तीन गाई भाजून जखमी झाल्या होत्या. त्यातील दोन गाई मृत झाल्या आहेत. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झाले आहे.
लोणंद येथील पोलाद निर्मिती करणार्या सोना अलॉज कंपनीतील बंद असलेला ऑक्सिजन प्लांट कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरू करण्यात आला.
संपूर्ण देशात व महाराष्ट्रात वाढत्या रुग्णसंख्येवर वेळेत नियंत्रण मिळावे आणि कोरोनाची साखळी लवकरात लवकर खंडित व्हावी, यासाठी म्हासुर्णे कोरोना दक्षता कमिटी व म्हासुर्णे पोलीस पाटील संभाजी माने यांनी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. त्यास गावातील नागरिक आणि व्यापार्यांनी पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे बाजारपेठेसह सर्व रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.
‘कोरोनामुळे अर्थव्यवस्था अडचणीत असताना सहकार क्षेत्रातील अग्रेसर असणारी शिवशक्ती सहकारी पतसंस्था लि., शिवथरने सन 2020-2021 या आर्थिक वर्षात चांगली कामगिरी केली आहे. विविध अडचणीवर मात करत शिवशक्ती पतसंस्थेने आपला प्रगतीचा आलेख उंचावत ठेवून संस्थेची परंपरा कायम राखली आहे. सन 2020-2021 या आर्थिक वर्षात संस्थेत ढोबळ नफा 2 कोटी 4 लाख झाला असून निव्वळ नफा 1 कोटी 18 लाख झाला आहे,’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रभाकर साबळे यांनी दिली.
कोरेगाव विधानसभा मतदार संघातील कोरेगाव, सातारा व खटाव तालुक्यांतील विविध गावांमधील मूलभूत सुविधांच्या कामासाठी 25/15 मधून पाच कोटी रुपयांची तरतूद ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. आ. शशिकांत शिंदे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शहरातील लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना घरी स्वतंत्र विलगीकरणाची सोय नाही, अशा नागरिकांसाठी पालिकेच्या वतीने विलगीकरण कक्षाची सोय करण्यात आली आहे. यासाठी पालिकेने दोन हॉटेल ताब्यात घेतली असून, ही सोय नाममात्र शुल्कात देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया काल पार पडली. या प्रक्रियेत राष्ट्रवादी चिन्हावर निवडून आलेले पांडुरंग जवळ यांची नगराध्यक्षपदी तर कल्पना जवळ यांची उपनगराध्यक्षपदी निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सोपान टोंपे यांनी केली. निवडणूक प्रक्रियेसाठी त्यांना तहसीलदार राजेंद्र पोळ व मुख्याधिकारी अमोल पवार यांनी सहकार्य केले.
सातारा-लातूर महामार्गावर शहरातील साखळी पुलानजीक बाबुलाल लुणिया यांच्या चप्पल-बूट विक्री दुकानाला दुपारी 4च्या सुमारास आग लागली. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. आगीमुळे दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग वेळीच आटोक्यात आली. लगतची सर्व दुकाने आगीपासून वाचली.
सातारा जिल्ह्यातील हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने कोरोना बाधित रुग्णांना उपचार मिळणे अवघड झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल्सला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत झाला पाहिजे, याची काळजी जिल्हा प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी वजा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे.
कारी (ता. सातारा) येथील विलास जगन्नाथ भातुसे (वय 45) यांच्या घराला सुमारे 2.30 ते 3च्या दरम्यान अचानक आग लागल्याने संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी आले. घरातील दस्तऐवजासह गहू, ज्वारी, हरभरा यांसह जवळपास 100 कोंबड्या आगीत जळून खाक झाल्या. सदर घटनेत विलास भातुसे यांच्या पायाला भाजले असता अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
‘वनांना वारंवार लागणारी आग (वणवे) रोखण्यासाठी विविध ठिकाणी जाळ रेषा निर्मिती करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वनांचे किती महत्त्व आहे, हे समाजाला वनविभागाने पटवून देऊन वारंवार लागणारे वणवे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात,’ अशा सूचना पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
‘कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी लोकांनी स्वत:ला शिस्त लावून घेतल्यास या संकटावर मात करणे अवघड नाही. ग्रामस्तरावर लोकांनी स्वत:हून पुढाकार घेतल्यास संसर्गाची चेन ब्रेक होण्यास मदत होईल. परंतु, हे काम करत असताना कोणी गावचे राजकारण पुढे आणू नका, असे करणार्याला पाप लागेल,’ असे मत खटावचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी व्यक्त केले.
‘मेढा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून देण्याबरोबरच या नगरीचे सर्वप्रकारचे प्रश्न ज्या-त्या वेळी सोडवले आहेत. सातारा-महाबळेश्वर रस्त्यावरील प्रमुख शहर असलेल्या मेढा नगरीचा कायापालट करण्यासाठी यापुढेही प्रयत्न करणार असून, या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
काटवली (ता. जावली) दापवडी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नुकतेच सुरू करण्यात आले आहे. या उपकेंद्राला इमारतीसाठी निधी उपलब्ध व्हावा व या उपकेंद्रात आरोग्य अधिकार्याची नेमणूक करावी,अशी मागणी काटवली व दापवडी ग्रामस्थांनी आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना महामारीच्या संकटा बरोबर महागाईचा सामना करावा लागतं आहे. गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या दरात गत दिवाळीपासून सत्तर टक्याने वाढ झाली असून, सध्याचे दर सामन्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने मासिक किराणा साहित्य व महिलांचे बजेट कोलमडले आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करताना, सामन्यांना महागाईला सामोरे जावे लागत आहे.
विटा-महाबळेश्वर राज्यमार्गाचे केळघर बाजारपेठेत रुंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू असून, पावसाळ्यापूर्वी रुंदीकरणाचे काम मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय बेलोशे यांनी दिला आहे.
‘सातारा जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेमध्ये सध्या मनुष्यबळ खूप कमी आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने आरोग्य विभागास काम करण्यास अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. त्यापेक्षा नागरिकांनीच स्वतःची काळजी घ्यावी, हाच कोरोनावर एकमेव उपचार,’ असा सल्ला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिला आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजअखेर कोणताही न्याय सवलत व इतर सुविधा न मिळणारा समाज म्हणजे महाराष्ट्रातील घडशी समाज असून, सध्या कोरोनामुळे आमच्या समाजातील लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल पवार यांनी केली आहे.
‘कोरेगाव तालुक्यातील एकंबे, बिचुकले आणि नलवडेवाडी (बिचुकले) या गावांची वाटचाल कोरोना हॉटस्पॉटकडे होती, मात्र आमदार शशिकांत शिंदे यांनी या गावातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी संपूर्ण औषधोपचाराची कीट, ऑक्सिजन सिलिंडर आणि ऑक्सिजन मशीन व्यवस्था उपलब्ध करून देत चांगला निर्णय घेतला आहे,’ असे प्रतिपादन पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.
कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेमुळे संपूर्ण देशात हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मृत्यूच्या प्रमाणातही चिंताजनक वाढ झाली आहे. जम्बो कोविड केअर सेंटर, सातारा जिल्हा रुग्णालयासह सर्वच खासगी रुग्णालयांमध्येही बेड शिल्लक नसल्याने रुग्ण दगावत आहेत. या भयावह परिस्थितीला कुठेतरी आळा बसावा, रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत या उदात्त हेतूने आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले व कुटुंबीयांनी पुष्कर मंग
‘जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढवाव्यात तसेच ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, असा रुग्ण ऑक्सिजनपासून वंचित राहणार याची खबरदारी घ्यावी,’ अशा सूचना विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केल्या.
उपविभागीय अधिकारी माण-खटाव यांच्या आदेशान्वये वडूज शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर वडूज नगरपंचायत व प्रशासकीय अधिकार्यांनी शहरामध्ये शुक्रवार, दि. 23 ते 30 एप्रिलअखेर ‘जनता कर्फ्यू’ जाहीर करण्यात आला असून, याबाबतचा निर्णय हुतात्मा स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला.
‘गेल्यावर्षी आपण सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाला हरवलं होत. त्यावेळी हा अनुभव पूर्णपणे नवा होता. अनपेक्षित शत्रूशी दोन हात करत असताना शासकीय यंत्रणा आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोनाला हद्दपार करण्यात यश मिळाले होते. आपल्यावर पुन्हा एकदा तीच वेळ आली असून स्थानिक प्रशासन, नागरिकांनी कोरोनाबद्दल संवेदनशील राहून कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे,’ असे मत आ. महेश शिंदे यांनी व्यक्त केले.
येथील ग्रामीण रुग्णालयातील अपुर्या कर्मचारी वर्गाचा फटका आता कोरोना संसर्ग परिस्थितीमध्ये चांगलाच बसू लागला आहे. कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित मृतदेह उचलण्यासाठी कर्मचारीच नसल्याने याठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकार्यांनाच अन्य कर्मचार्याला सोबत घेऊन कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह उचलावे लागत आहेत.
महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने मंगळवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, फलटण येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास 43 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कर्तव्य केले आहे.
कोरोनाच्या नव्या व्हायरसचा प्रादुर्भाव तसेच लोकांच्या बेफीकीरपणामुळे कोरोनाचा नवा स्ट्रेन जोरात फैलावतोय. बाधित रुग्णांचे प्रमाण दररोज वाढत असल्याने त्याला वेळीच रोखण्याकरिता पाचगणी नगरपरिषद शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये नगरपालिकेने तयार केलेल्या दहा आरोग्य पथकांमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची ऑक्सिजन लेव्हलची तपासणी केली जाणार असून, काही लक्षणे दिसून आल्यास अशा लक्षणे असलेल्यांची नावे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास देऊन त्यांची तपासणी करून पाचगणी शहरात वाढणार्या कोरोनाला प्रतिबंध घातला जाणार आहे.
‘सोना अलाईज कंपनीच्या माध्यमातून 21 टन ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येत असून, लवकरात लवकर किमान 3 जिल्ह्यांतील गरजूंना याचा उपयोग होणार आहे,’ अशी माहिती विधान परिषदचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांंनी दिली.
‘कोविड लसीकरणासाठी रजिट्रेशन करणे महत्त्वाचे आहे, अजूनपर्यंत तरी लसीकरणासाठी रजिट्रेशन करण्याची टक्केवारी कमी आहे. लस संपली म्हणून कर्मचार्यांनी न थांबता लसीकरणासाठी शंभर टक्के रजिस्ट्रेशन केलेच पाहिजे, असे म्हणत ‘हागणदारी मुक्त गाव’ या अभियानासारखे ‘कोरोनामुक्त गाव’ असे फलक गावाबाहेर लागावेत,’ अशी आशा प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी व्यक्त केली.
‘कडक निर्बंध लावूनही राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. निर्बंध लावूनही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत, अशांवर कारवाई करून शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी राज्यात करा,’ अशा सूचना गृह (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज पोलीस विभागाला केल्या.
‘खा. उदयनराजे भोसले यांनी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासत समाजकारण केले आहे. लिंब गावातील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी त्यांनी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याने रस्त्याचे काम मार्गी लागले असून, आतापर्यंत खा. उदयनराजे भोसले यांनी गावातील विकासकामांसाठी 70 लाख रुपयांचा निधी दिला आहे,’ अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोसावी यांनी दिली.
माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून सर्वश्रूत अन् परिचित आहे. कधी सुकाळ तर कधी दुष्काळ अशा निसर्गाच्या लहरीवर इथला शेतकरी जगत आहे. केवळ लहरी शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा म्हणून संकरित गाई जोपासून दुग्ध व्यवसाय सुरू ठेवला आहे. या व्यवसायावर अनेकांचे संसार उभे आहेत. मात्र, सध्या अघोषित दुधाचे दर खाली आले असल्याने शेतकर्यांचा जोडधंदा तोट्यात जाणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे पशुधन जोपासले असून ते धोक्यात आले आहे.
‘कोरोना काळात महसूल विभागाच्या कर्मचारी व अधिकार्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. केळघर येथे मंडलाधिकारी म्हणून काम करत असताना प्रशासकीय कामाबरोबरच कोरोना काळात राबविण्यात आलेल्या योजनांमध्ये मंडलाधिकारी ए. ए. मेमन यांचा सहभाग कौतुकास्पद होता. त्यांचा आदर्श महसूल विभागातील कर्मचार्यांनी घ्यावा,’ असे आवाहन प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांनी केले.
आयुर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दिगंबर आगवणे हे फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी कायमच धावून येतात व सर्वसामान्यांच्या मदतीसाठी कायम उभे राहत असतात. सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांना उपचार करण्यासाठी बेड्स उपलब्ध होत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणूनच दिगंबर आगवणे यांनी फलटण-सातारा रोडवरील पूर्वीच्या शाईन एक्स्प्रेस लाँड्री येथे 100 ऑक्सिजनचे बेड्स तयार करीत आहेत. सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. फलटण तालुक्यात ऑक
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून यात खटाव तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. सध्या गावोगावी विविध उपाययोजना करून देखील रुग्ण आटोक्यात येण्याचे प्रमाण कमी होत नसल्याने खटाव तालुका कोरोनाचा हॉट स्पाट बनतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यत: भोसरे, खटाव, वडूज, पुसेगाव, औंध आदी गावांत कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून कोरोना थोपवण्यास पुढाकार घेतला पाहिजे.
जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. बाधितांचा आकडा वाढू लागल्याने ग्रामीण भागांतील लोकांची झोप उडाली आहे. वाढत्या संख्येने मन धास्तावले आहेत. गजबजणार्या बाजारपेठा सुद्धा नि:शब्द होऊ लागल्या आहेत. बाधितांचा जिल्ह्याचा रोजचा आकडा हजाराच्या घरात जाऊ लागला आहे. गावे सुद्धा हॉटस्पॉट बनू लागली आहेत. एकीकडे गावागावांत ही संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहेत. तर दुसरीकडे रोजी रोटीचे साधन बंद झाल्याने छोटे-मोठे व्यावसायिक परिस्थितीने निरुत्तर झाले आहेत.