लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अवघ्या 17 जागा जिंकता आल्या आहेत. तर मविआने 30 जागांवर विजय मिळवला आहे. हेच समीकरण विधानसभानिहाय लागू केल्यास आगामी निवडणुकीत मविआ 150 जागा जिंकू शकते.
डिजिटल सभासद नोंदणीमुळे गाव व खेड्यातील काँग्रेसचा कार्यकर्ता पुन्हा सक्रिय झाला असून सातारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होईल, असा आशावाद महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गावगुंडासारखे, गांजाड्या नानांचा धिक्कार असो अशा घोषणा देत आक्रमक होऊन भाजपा कार्यकर्त्यांनी पोवई नाका येथे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार यांच्या नेतृत्वाखाली नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले.
देशाचे प्रधानमंत्री हे आदरणीय व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचा भाजपने विपर्यास केला. खरेतर, पटोले यांनी पंतप्रधानांचे नाव वापरलेले नाही. केवळ त्यांना बदनाम करण्यासाठी भाजपने अर्थाचा अनर्थ केला असून त्यांची जनमाणसातील प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न राज्यातील भाजप करत आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!