राज्यात 45 प्लस खासदारांचे स्वप्न पाहणाऱ्या महायुतीला जोरदार धक्का बसल्याचं चित्र असून भाजप तर एक अंकी जागेवर आल्याचं दिसून आलं. राज्यात महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली आहे. त्यामध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेसने पटकावल्या असून काँग्रेसच्या या यशामध्ये विदर्भाचा मोठा वाटा असून विदर्भात काँग्रेसला पाच जागा मिळाल्या आहेत. रा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराड येथील सभा यशस्वी झाल्याची जोरात चर्चा आहे. तळपत्या उन्हात हजारो भाजप कार्यकर्ते, नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांना ऐकण्यासाठी तरुण वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कोल्हापूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवार दिनांक 29 रोजी सैदापूर कराड येथे सभा होत असून या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. सैदापूर येथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या प्रचारासाठी दिनांक 29 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सैदापूर येथे शेतकी मैदानावर सभा होत आहे. ही सभा यशस्वी करून या सभेतूनच उदयनराजे यांच्या विजयाची नांदी होईल, असा ठाम विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
माझे सैनिक बांधव उभे आहेत, ती भूमी एखाद्या मंदिरापेक्षा कमी नाही, असे सांगत पंतप्रधान मोदींनी सीमेवरील जवानांबाबत गौरवोद्गार काढत त्यांच्यासमवेत दिवाळी साजरी केली. त्यांच्या उपस्थितीमुळे सीमेवरील अधिकारी-जवानांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्नी अँड जिजामाला नाईक- निंबाळकर, कन्या ताराराजे, इंदिरा राजे समवेत भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पश्चिम महाराष्ट्रातील 55 दुष्काळी तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भरीव पॅकेजची मागणी केली.
नदीत बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना नागठाणे परिसरात घडली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना काळातील भारतातील मृत्यूंची आकडेवारी नुकतीच जाहीर केली या आकडेवारीत भारतातील सुमारे ४७ लाख नागरिक मरण पावल्याचे दिसून येत आहे. परंतु, प्रत्यक्षात मोदी सरकारने खोटी आकडेवारी प्रसिध्द करून जनतेची फसवणूक केली आहे.
कायदा मोडणाऱ्यांना ब्रिटनमध्ये थारा नाही. आम्ही नीरव मोदी आणि विजय माल्या यांना भारताकडे सोपवण्यास तयार आहोत. त्यासाठी सर्व मदत करण्यास तयार आहोत
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त आज खटाव तालुक्यातील डाळमोडी येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
खटाव तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत असून, तालुक्यातील शेतकर्यांना, लोकांना पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली असल्याने उरमोडीचे पाणी खटाव तालुक्यात सोडावे, अशी मागणी आज नगरसेवक शहाजीराजे गोडसे मित्र मंडळाने केली आहे. याबाबत तहसीलदार किरण जमदाडे यांना लेखी निवेदन दिले आहे.
दिल्ली येथे माढा मतदार संघाचे पाणीदार खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सपत्नीक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मतदार संघातील विविध प्रश्नाच्या संदर्भामध्ये पंतप्रधान कार्यालयामध्ये भेट घेतली. यावेळी त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य अॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर उपस्थित होत्या.
‘आज जगात भारत देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली बलाढ्य देश म्हणून पुढे येत आहे. नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली रोजगार, शेतकरी हिताचे घेतलेले निर्णय, उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्रात देशाने घेतलेली भरारी आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी व त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वांनी व विशेषतः युवा पिढीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन डॉ. सुरभी भोसले-चव्हाण यांनी केले.
उरमोडी धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असून, या भागातील ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पाण्याची आवक वाढल्याने उरमोडीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. उरमोडीचे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असून, 13 रोजी सकाळी आठ वाजता उरमोडी वीज गृहातून 400 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आल्याने नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे.