दरम्यान, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संपर्क फलक दर्शनी भागात का लावले नाहीत? याबाबत चौकशी करून, फलक न लावणाऱ्या पोलीस प्रमुखावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे. तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामध्ये; लाचखोराला कडक शिक्षा होण्यासाठी प्रभावी बदल होणंही आज काळाची गरज आहे. कारण लाचखोराला कडक शिक्षा; हाच मोठा उपाय, भविष्यातील अनेक लाचखोरी प्रकरणांना आळा घालणारा ठरू शकतो आणि राज्यात पोलिसांच्या डागाळलेल्या प्रतिमेला थोडाफार का होईना उजाळा मिळू शकतो.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!