‘केंद्र सरकारची सध्या हुकूमशाही चालली आहे. केंद्राने शिक्षणाचा खर्च आठ टक्के कमी केला आहे. शिक्षण क्षेत्रात क्रांती घडली पाहिजे, ही आमची मागणी असली तरी केंद्र सरकारचे या क्षेत्राकडे दुर्लक्ष आहे,’ असेे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
‘साखर कारखान्यांच्या माध्यमातून सत्तेची फळे चाखणारे शेतकर्यांच्या एफआरपीबद्दल मूग गिळून बसले आहेत. वर्षभर घाम गाळणार्या शेतकर्यांना कायम कर्जबाजारी ठेवून, साखर कारखानदार राजकारणाची पोळी भाजत आहेत, त्यांना शेतकर्यांच्या हक्काची एफआरपी रक्कम द्यावीच लागेल, अन्यथा 28 फेब्रुवारीपासून साखर कारखान्यांच्या विरोधात आंदोलन छेडले
‘बचतगट चळवळीने महिलांना दिलेली शक्ती महत्त्वाची आहे. या शक्तीतून एकत्र आलेल्या भीमजननी बचतगटास भक्कम पाठबळ देऊ. महिलांनी निर्भयपणे आणि एकजुटीने काम करावे. काही अडचण आल्यास पोलीस दल महिलांच्या पाठीशी आहे,’ अशी ग्वाही पोलीस उपअधीक्षक शीतल जानवे-खराडे यांनी दिली.
‘समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन विकासकाम करण्याचे महाविकास आघाडी शासनाचे धोरण आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील रखडलेल्या कामास गती देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काम करणार्या प्रत्येकाला मान-सन्मानाने वागविले जाईल,’ असे ठोस प्रतिपादन सहकार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.
‘शासनाने महिला सक्षमीकरणासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या असून, त्या योजनांचा लाभ घेऊन बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक विकास साधावा,’ असे आवाहन निमसोड एकता महिला संघाच्या अध्यक्षा अॅड. अनुराधा देशमुख यांनी केले.
‘आधुनिक शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी शेतकरी मेळावा मार्गदर्शक ठरेल. याद्वारे शेतकर्यांना फायदा होईल,’ असे मत तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी व्यक्त केले.