‘संत नामदेवांपासून नारायण सुर्वेंपर्यंत समृद्ध साहित्य परंपरा असणारी मराठी अभिजात दर्जाला पात्र आहे. श्रमिक वंचित कष्टकर्यांच्या जगण्याला शब्दरूप देण्याचे व्रत मराठीने अंगीकारले आहे. हे आपल्या भाषेचे व संस्कृतीचे वेगळेपण होय,’ असे प्रतिपादन कवयित्री कुंदा लोखंडे-कांबळे यांनी केले.
‘सध्या हवामानातील बदलामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडत आहे. त्यामुळे उत्पन्नात घट होत आहे. शिवाय शेतीमाल अल्प मोबदल्यात विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी शेती व्यवसायास पूरक समजला जाणारा दुग्ध व्यवसाय वाढवणे गरजेचे आहे. एकमेव दूध व्यवसाय असा आहे की, या व्यवसायात शेतकर्याला दर दहा दिवसांनी दुधाचा योग्य मोबदला मिळतो व यातून शेतकर्यांची शेतकर्यांचा आर्थिक स्तर उंचावला जाऊ शकतो,’ असे प्रतिपादन हिम्मत देशमुख यांनी केले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!