खटाव तालुक्यात चालू सप्ताहात विविध शासकीय कार्यालयासह अनेक गावांत कोरोनाचा घट्ट विळखा पडत चालला आहे. शुक्रवारी एकाच दिवशी तालुक्यातील 41 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना संसर्गजन्य आजारामुळे आठवडाभरात सुमारे 12 जणांचे बळी गेले आहेत.
दिवसेंदिवस खटाव तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, आज एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शास्त्रीनगर येथील बाधित रुग्णांचा परिसर सील केला आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!