कारी (ता. सातारा) येथील विलास जगन्नाथ भातुसे (वय 45) यांच्या घराला सुमारे 2.30 ते 3च्या दरम्यान अचानक आग लागल्याने संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी आले. घरातील दस्तऐवजासह गहू, ज्वारी, हरभरा यांसह जवळपास 100 कोंबड्या आगीत जळून खाक झाल्या. सदर घटनेत विलास भातुसे यांच्या पायाला भाजले असता अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!