सातारा पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर यांच्या गावात त्यांच्याच विचारांची ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीमध्ये सर्वसामान्यांवर अन्याय होत आहे. सरपंच, पदाधिकारी, ग्रामसेवक यांनी अधिकाराचा गैरवापर करुन चुकीच्या ठरावाने घराची नोंद केली आहे. सभापतींचे पती संभाजी इंदलकर हे म्हणतात की दोन्ही महाराज हे माझ्या खिशात आहेत. काहीच कोणी करु शकत नाहीत, याची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे बजरंग श्रावण अंबुले यांनी केली आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!