सध्या सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे येथील पुष्कर तलाव सुमारे 70 टक्के भरला आहे. तलावात साठलेल्या पाण्यामुळे शिंगणापूर गावासह पंचक्रोशीतील शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. तसेच दुष्काळवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासनाच्या मदतीने 2014 पासून ग्रामपंचायतीने केलेल्या जलसंधारणाच्या कामाची पोचपावती मिळाल्याचेही गावकरी सांगत आहेत.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!