दि. १२ डिसेंबर २०२१ रोजी सातारा शहरामध्ये दोन विशेष कार्यक्रम संपन्न झाले यामध्ये कोरोना नियमांची सर्रास पायमल्ली झालेली काल दिसून आली. सर्वसामन्य नागरिकांना लग्नासाठी ५० तर अंत्यविधीसाठी २० माणसांची मर्यादा टाकून प्रशाशनाने सातारा हिल मॅरेथॉन आणि जोर्तिमय यासाठी विशेष योजनेअंतर्गत कोरोना नियमनाची पायमल्ली करायची परवानगी दिलेप्रमाणे काल दोन्ही कार्यक्रमात वस्तुस्थिती दिसून येत होती, जणू काही प्रशासन दोन्ही आयोजकांचे खिशातच आहे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सर्वसामान्य आणि दुकानदार तसेच व्यापारी यांनी मास्क नाही घातला तर प्रशासन हजारो रुपयांचा दंड आकारते पण काल झालेल्या सातारा हिल मॅरेथॉन आणि जोर्तिमय या कार्यक्रमात कोविड नियमाची पायमल्लीसाठी आता प्रशासन किती दंड आकारणार व कोणती कारवाई करणार यावर सर्वसामान्य जनता, पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते लक्ष ठेवून राहणारच आहेत.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!