गेल्या अनेक वर्षांपासून साताऱ्यातील पंडित ऑटोमोटिव्ह कंपनीतील कामगार व कंपनी यांच्यात सुरू असलेल्या वादाचे स्वरूप आता मोठे झाले आहे. कामगार त्यांना हक्क मिळण्यासाठी न्यायालयात गेलेले असताना देखील कंपनीत त्यांना येऊ दिले जात नसल्याने हा वाद चिघळला असून आता या वादात खासदार उदयनराजे यांनीदेखील उडी घेतली असून कामगारांना न्याय द्या, अशी मागणी करत आज थेट कंपनीच्या दारात त्यांनी नेहमीच्या स्टाईलमध्ये आपला राग व्यक्त केला. यावेळी त्यांनी राजेशाही असती तर हत्तीच्या पायाखाली चिरडून टाकले असते, अशा शब्दात भावना व्यक्त करत कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!